Sunday, 19 July 2020

योगविज्ञान मुद्राविज्ञान भाग ३

Saturday 18 July 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
मुद्राविज्ञान भाग ३
      नियमित  आणि सततच्या  मुद्रांच्या सरावाने सुप्तावस्थेत असलेला मेंदूचा जास्तीत जास्त भाग  सक्रिय किंवा जागृत केला जातो. या प्रक्रियेमध्ये मानसिक आणि भावना यांच्यावर  सकारात्मक परिणाम दिसून येतात . जसे भीती,  संकोच, गौणता, उदासीनता, निराशा कमी होते. 
    हात आणि डोक्याशी संबंधित मुद्रा मेंदूतील साधारण पन्नास टक्के भागाशी संबंधित असतात 
    आसनांमध्ये मेंदूचा जो भाग उत्तेजित होतो त्या भागास रक्तपुरवठा वाढतो.  तर  मुद्रा मध्ये मेंदूच्या संबंधित भागास  प्राणशक्‍तीचा प्रवाह  वाढतो.  विपरीतकरणी मुद्रा मध्ये डोपामीन (Dopamine) रसायन हे मेंदूमध्ये तयार होते  व शरीरास उत्साही बनवते तर इतर योगिक मुद्रा मुळे  सिरोटोनिन (Serotonin) हे रसायन मेंदूमध्ये तयार होते  व  शांततेचा परिणाम शरीरावर दिसून येतो त्यामुळे झोपही छान लागते. 
      बहुतेक मुद्रा मध्ये शरीर हे दोन्ही बाजूने ( उजवी व डावी बाजू )  समसमान असते. व मेंदूच्या दोन्ही बाजूस सारखीच चालना मिळते.  त्यामुळे दोन्ही बाजूंचे मेंदू चे कार्य  नियंत्रित, सुसंगत आणि संतुलित राहते.  सतत आणि नियमित मुद्रा च्या अभ्यासाने विश्लेषणात्मक विचार, बुद्धिमत्ता आकलनशक्ती ,ग्रहणशक्ती, अंत:र्ज्ञान  आणि विवेक बुद्धी यामध्ये वाढ होते. आणि वृत्ती शांत व स्थिर होते 
        नासिकाग्र दृष्टी यामध्ये डोळे नाकाच्या टोकावर एकाग्र केले जातात जेथून संवेदना डाव्या व उजव्या दोन्ही बाजूच्या मेंदूकडे समसमान जातात, व दोन्ही बाजू सारख्याच प्रमाणात उत्तेजित होतात. त्यामुळे दोन्ही बाजू तालबद्ध व सुसंगत (Harmonise) झाल्यामुळे  निश्चल शांत व एकाग्रता वाढते. 
    शांभवी मुद्राच्या अभ्यासाने पीनियल ग्रंथि निष्क्रिय होण्याची क्रिया मंदावते म्हणून ही क्रिया लहान मुलांना  वय वर्ष आठ च्या पुढे करण्याची शिफारस केली जाते. शांभवी मुद्रा मध्ये  आज्ञाचक्र सक्रिय होते कारण प्राणशक्ती ही आज्ञा चक्रा च्या वरच्या दिशेने खेचली जाते  व मेंदू चा पुढचा भाग भालीय मेंदू (Frontal cortex) हा उत्तेजीत व सक्रिय होतो . 
   खेचरी मुद्रा  (जिव्हा बंध ) चा प्रभाव  हायपोथॅलॅमस आणि ब्रेन स्टेम (Brain stem)  यामधील मज्जा केंद्रावर पडतो.  या मज्जा केंद्रामधून  शरीरातील अनैश्चिक क्रिया  जसे श्वसनक्रिया, हृदयाचे स्पंदन, भावना, तहान-भूक यावर नियंत्रण होते.  खेचरी मुद्रा मध्ये  तोंडाच्या मागील बाजूस अनेक सूक्ष्म मज्जातंतू (Meridian points) ज्या जीभेच्या दाबामुळे उत्तेजित होतात  ज्याचा संबंध स्वायत्त मज्जासंस्थाशी (Autonomic nervous system) असतो  स्वायत्त मज्जासंस्था शरीरातील अनैश्चिक क्रिया नियंत्रित करते  याचा अर्थ खेचरी मुद्रा चा परिणाम अनैश्चित क्रिया वर होतो  त्यामुळे खेचरी मुद्राने तहान-भूक कमी होते व भावनांवर नियंत्रण येते .
   डोळ्यांच्या हालचालींचा परिणाम मेंदूवर होतो.  जेव्हा डोळ्यांची हालचाल जलद (Rapid eye movement, REM)  असते  त्यावेळी जास्त वारंवारतेच्या (High freuency) बीटा लहरी मेंदूत दिसून येतात.  जेव्हा डोळ्यांची हालचाल कमी होते  त्यावेळी शांततेच्या कमी वारंवारतेच्या अल्फा लहरी दिसून येतात. ध्यानाच्या स्थितीमध्ये मेंदूमध्ये अल्फा लहरी दिसून येतात. शांभवी मुद्रा मध्ये डोळे स्थिर केल्यामुळे डोळ्याची हालचाल कमी होते  त्यामुळे ह्या शांभवी मुद्रेमध्ये अल्फा लहरी दिसून येतात. याचाच अर्थ  ध्यानासाठी ही मुद्रा उपयोगी पडते  म्हणून  ध्यानाच्या वेळी शांभवी मुद्राही लावली जाते.

sharadyogvigyan.blogspot.com

Saturday, 18 July 2020

योगविज्ञान मुद्रा विज्ञान भाग २

Friday 17 July 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)

मुद्राविज्ञान भाग २ 


ज्यामुद्रामध्ये तर्जनी आणि अंगठा जोडलेला असतो त्यावेळी मेंदुमधील आज्ञामेंदू (motor cortex) हा सूक्ष्मपातळीवर व्यस्त असतो.अशावेळी मेंदूपासुन हातापर्यंत व हातापासुन मेंदुपर्यंत एक शक्तिवर्तुळ ( loop of energy) तयार होते आणि जागृत सजगतेमुळे मन अंतर्मुख होते.
     अन्नमयकोष ,प्राणमयकोष व मनोमयकोषात समनव्यय ,नियमितता आणि नियंत्रण राहण्यासाठी प्राणशक्तीचा समतोल असण्याची अत्यंत गरज असते. ह्या प्राणशक्तीवर नियंत्रण मुद्राच्या माध्यमातून साधता येते. याचाच अर्थ मुद्राद्वारे अन्नमयकोष, प्राणमयकोष वं मनोमय कोषावर नियंत्रण व नियमितता आणता येते. म्हणून प्रत्येक मुद्रांचा दृष्टिकोन हा शारीरिक स्थितीतील स्थूलतेतून सुक्ष्मतेकडे वळवण्याचा असतो. ही सूक्ष्मशक्ती विशिष्ट मुद्राद्वारे विशेष शक्तीचक्राकडे वळविली जाते.
    ठराविक मुद्रा विशिष्ठ नाड़ी आणि चक्राना उत्तेजित करण्याचे काम करते.जसे शाम्भवी मुद्रामध्ये डोळे भूमध्याकडे वळवून टक लावून पहातो त्यावेळी डोळ्यांच्या स्नायुची हालचाल होते व डोळ्यांच्या स्नायुवर आणि मज्जातंतुवर ताण येतो. हा ताण कांही वेळ त्याच स्थितिमध्ये रहिल्यानंतर तो जाणवतो त्यामुळे डोळ्याला प्राणशक्ति पुरविणारी नाड़ी उद्दपित होते.तसेच शाम्भवी मुद्रामध्ये दोन्ही डोळे दोन्ही भुवयामध्ये केंद्रित केल्यामुळे सुषुम्ना नाड़ी उत्तेजित होते. तसेच आज्ञाचक्र सक्रिय होते.
    नासिकाग्र दृष्टि मध्ये दोन्ही डोळे नाकाच्या शेंटयावर केंद्रित केली जातात. त्यामुळे वासाशी संबधित मज्जातंतु उत्तेजित होतात आणि मूलाधार चक्र उद्यपित होते कारण दोघांचेही पृथ्वी तत्व आहे.
      विपरितकरणी मुद्रा ज्यास विपरीतकरणी आसन ही म्हणतात. यामध्ये प्राणशक्तिचा प्रवाह हा विरुद्ध दिशेने होतो. म्हणजेच जो प्रवाह खालच्या दिशेने असतो तो वरच्या दिशेने बदलतो.त्यामुळे मेंदूतील उच्चपातळीतील केंद्र उत्तेजित होतात.
  मुद्रा आणि मेंदू संबंध : आपल्या मेंदूमध्ये काहीं केेन्द्र (centers) सुप्तावस्थेत असतात . त्यांना चालना मिळाल्यास ते सक्रीय होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते . मुद्रा द्वारे ह्या मेंदू केंद्रा मध्ये जागृती निर्माण करून बदल करता येतो . आधुनिक न्यूरोफिजिओलॉजीस्ट च्या मते शरीर आणि मेंदू यांचा संबंध अशा प्रकारे असतो की, मेंदूमध्ये पृष्ठभागावर प्रतिकात्मक शरीराचा प्रत्येक भाग दर्शविलेला असतो.  हा भाग संवेदनात्मक आणि आज्ञा मेंदूवर (Motor cortex) दर्शविलेला असतो . मेंदूच्या आज्ञा मेंदूवर इलेक्ट्रोडने एखादा विशिष्ट भाग उत्तेजित केला तर शरीराच्या त्याच्याशी संबंधित भागाची हालचाल होते.  त्याउलट जर आपण हाताची हालचाल केली तर मेंदूतील संबंधित भाग उत्तेजित होतो . अशाप्रकारे शरीराचा प्रत्येक भाग हा आज्ञा मेंदू (motor cortex) वर दर्शविलेला असतो . म्हणून यास  मेंदूतील लहान माणूस (Homunculus "Little man") असे म्हणतात.  मेंदूतील विशिष्ट भागाची हानी झाली तर शरीराचा संबंधित निकामी होतो.  याच तत्वाचा उपयोग मुद्रा मध्ये करून  मेंदूचा संबंधित भाग  सक्रिय केला जातो.
     जेव्हा एखादी मुद्रा करण्याचे ठरवितो  त्यावेळी त्या प्रकाराची मज्जासंस्थे संबंधित हालचाल करण्याची प्रेरणा मेंदूकडे जाते  तिथून संबंधित भागाला आज्ञा मेंदूकडून प्रेरणा दिली जाते.  उदा. डोळ्याची ठराविक स्थिती करण्याचे ठरले  तर मेंदूकडून डोळ्यास त्याप्रमाणे हालचाल करण्याची आज्ञा दिली जाते. अशाप्रकारे मुद्रा मुळे एक वर्तुळाकार परिक्रमा तयार होते  ज्यामधून प्राणशक्ती शरीराकडून मेंदूकडे  व  मेंदूकडून शरीराकडे वर्तुळाकार फिरते.

sharadyogvigyan.blogspot.com

Friday, 17 July 2020

योग्य विज्ञान मुद्रा विज्ञान भाग १

Thursday 15 July 2020
🧘🏻‍♂आ
योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
मुद्रा विज्ञान भाग १ 

मुद्राच्या नियमित अभ्यासाने माणसाच्या वृत्तिमध्ये,मूड किंवा मनाचा कल यामध्ये बदल होतो. त्याची आकलन शक्ती, बोध,समज, जाणीव व जागरूकता यामध्ये वाढ होते.एकाग्रता वाढण्यासाठीही त्याची मदत होते.मुद्रांचा उपयोग उपचारात्मक तसेच मनोविश्लेषनात कार्यशक्तिला पुन्हा सुप्त मनाच्या पातळीत उतरवण्यासाठी करता येतो.
      मुद्राभ्यासाने मन बाह्यजगतातुन आंतर्मुख  होण्यास मदत होते जो एक प्रत्यहाराचाच भाग आहे. प्रत्याहारातून मन एकाग्र होऊन धारणेस प्राप्त होते त्यामुळे सततच्या अभ्यासाने ध्यान सहजतेने लागते.सुप्तावस्थेतील सुक्ष्मशक्ती जागृत होण्यास मदत होते.
   संत,महर्षी व ऋषी यांनी दिलेली ही अतिप्राचीन विद्या असून ती एक गूढ विद्या असल्याचे मानले जात असे.परंतू ते एक मुद्रा विज्ञान असल्याचे आताच्या संशोधनात निष्पन्न होत आहे.
    शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी शरीरातील पंचमहाभूतांच्या घटकांचे प्रमाण समतोल राहणे आवश्यक असते.ते मुद्राच्या अभ्यासातून शक्य होते.
      ज्याप्रमाणे रडणे हे दुःख प्रदर्शित करण्याचे प्रतीक आहे, नाचणे,गाणे,हसणे हे आनंद दर्शविण्याचे प्रतीक आहेत.त्याचप्रमाणे मुद्रा हे आंतरिक भावना, स्वभाव ,मतांची व वृतींची जाणीव करून देण्याचे प्रतीक आहे.
   कोणत्याही मुद्राच्या शारीरिक स्थितीतून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनांचा परिणाम हा मेंदूतील लहरीवर करीत असतो.
   मुद्रा आणि प्राण यांचा संबंध :  यौगिक तत्वज्ञान
आणि चायनीज औषध शास्त्राप्रमाणे आपले शरीर सतत ऊर्जा बाहेर टाकत असते.ती ऊर्जा हात, पाय,डोके यामधून जास्तीतजास्त बाहेर पडत असते. १९७० मध्ये कार्लीयन फोटोग्राफी द्वारे ही ऊर्जा शरीराभोवती आभामंडल (ऑरा) च्या माध्यमातून दिसते हे सिद्ध झाले.ह्या प्राणिक शक्तीचा प्रवाह हात, पाय,डोके याकडे जास्त असल्याचे दिसून आले.मुद्राच्या सरावाने हा प्राणिक प्रवाह बंद करून तो दुसऱ्या मार्गाने पाठविण्याची व्यवस्था केली जाते.अश्याप्रकारे
बाहेर पडणारी प्राणिक ऊर्जा ही वापस शरीरात पाठविली जाते. शरीराच्या वेगवेगळ्या स्थिती वरून व हाताच्या बोटांची वेगवेगळ्या प्रकारे जोडणी करून (हस्तमुद्रा) बाहेर पडणारी प्राणिक ऊर्जा ही परत शरीरात पाठविली जाते.हस्तमुद्रामध्ये शरीर, मन आणि प्राणिक ऊर्जा यांचा संबंध असतो.ज्याप्रमाणे ज्ञानमुद्रा मध्ये हात गुडघ्यावर ठेवून तळ हात जमिनीकडे असतो व तर्जनी आणि अंगुष्ठा यांचे मिलन झालेले असते.त्यामुळे तर्जनी मधून सतत बाहेर पडणारी प्राण ऊर्जा ही अंगठ्या मधून परत शरीरात पाठविली जाते. हेच तत्व चिनमुद्रास लागू होते.अश्यावेळी मन स्थिर होऊन एकाग्र होते, विशेषतः पद्मासन व सिद्धासनामध्ये. म्हणून ध्यानासाठी पद्मासन, सिद्धासन या आसनांचा आणि ज्ञानमुद्रा किंवा चिनमुद्रा यांचा प्रकर्षाने उपयोग केला जातो.
    ज्याप्रमाणे प्रकाश ऊर्जा ही आरस्यातुन परावर्तित होते किंवा ध्वनि ऊर्जा ही एखाद्या ऊंच कड़ा किंवा भींत यावरून वळविन्यात येते त्याचप्रमाणे मुद्राद्वारे प्राणशक्ति ही शरीरात वळवून इच्छित हालचाल घडवून आणण्यासाठी वापरली जाते.तसेच ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी भिंतीवर टोर्चचा प्रकाश टाकल्यानंतर तो पसरतो त्याचप्रमाणे मुद्रामध्ये प्राणशक्तिस मिळालेल्या अडथळ्यामुळे ती शरीरात सर्वत्र पसरते. शरीरातील नाडी आणि शक्तीचक्रे ही टॉर्चप्रमाणे सतत उर्जाप्रवाहाचे काम करीत असतात.यामधील शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा ही मुद्राद्वारे परत शरीरात पाठविली जाते. ज्याप्रमाणे षण्मुखी मुद्रामध्यें आपण डोक्यामधील काही द्वार बंद करतो विशेष करून डोळे.त्यामधून बरीच ऊर्जा खर्च होत असते. डोळे बंद केल्यामुळे ती ऊर्जा खर्च न होता शरीरात पसरते. प्राणशक्ती नियमित आणि नियंत्रित झाल्यामुळे मानसिक क्रिया कमी होतात व मानसिक शांती आणि मानसिक एकाग्रता वाढते.

sharadyogvigyan.blogspot.com


    

Thursday, 2 July 2020

योगविज्ञान योगनिद्रा विज्ञान भाग ३

Thursday 2 July 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगनिद्रा विज्ञान भाग ३
       डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे असलेल्या केनडी संशोधन केंद्रात डॉ.हन्सलोक आणि डॉ. झेयल्स जासेर यांनी नियमित योगनिद्रा करणाऱ्या व्याक्तिंच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंच्या मेंदूचा अभ्यास केला. त्यामध्ये मेंदूचे कार्य दर्शविणाऱ्या मशीनव्दारे (EEG मशीन) जागृत स्थितीतील व्यक्ति, डोळे बंद केल्यानंतर आणिस्वा मी जानकीनंद यांच्या सिडी व्दारे योगनिद्रा करणाऱ्या व्याक्तिंचा अभ्यास केला. योगनिद्रा करणाऱ्या व्यक्तिंमध्ये मेंदूची स्थिती ही शांत, शिथिल व तणावरहित (Deep relaxed stage) दिसून आली. थिटा तरंग (Theta Waves) हे ११% ने वाढलेली दिसून आली आणि अल्फा तरंग (Alpha Waves) हे २% ने कमी झाली होती. याचा अर्थ तो निद्रा मध्ये असून सजग होता. जागृत अवस्थेतील व्यक्तिमध्ये बिटा तरंग (Beta Activity) ही अल्फा तरंगामधे बदलली. जी एक तणावरहित स्थिती आहे. मेंदूमध्ये अल्फा तरंग असतांना मेंदू मधे सिरोटिनिन संप्रेरक तयार होतो ज्यामुळे माणसास शांत वाटते व मूड बदलतो. जस जसा योगनिद्रेचा अभ्यास खोल होत जातो
तसा अल्फा तरंग हे ८-१२ तरंग / सेकंद असतात. त्या थिटा तरंग मध्ये बदलतात. ज्या ४-८ तरंग / सेकंद (4-8 Thoughts/sec.) असतात. ही एक तणावरहित स्वप्नावस्था व खोल ध्यानाची (Deep Meditation) अवस्था असून तो सजग असतो. ज्ञानेंद्रियाचा बाहेरील जगाशी संबंध तुटलेला असतो. त्यामुळे तो बाहेरील जाणिवेच्या बाहेर असतो. योगनिद्रेच्या अभ्यासात या नंतरची अवस्था म्हणजे थिटा
तरंग ह्या डेल्टा तरंग (Delta Waves) मध्ये बदलतात. ज्यामध्ये फक्त (1-4 Waves/sec.) असतात. ह्या अवस्थेमध्ये विचार अजून कमी होतात. ही एक स्वप्नरहित झोपेची (Dreamless Sleep) अवस्था असून बाहेरील कोणत्याही गोष्टीची जाणीव रहात नाही. ह्या अवस्थेमधे पेशींची दुरुस्ती व वाढ (Healing & Regeneration) चांगली होते. लहान मुलांना गाढ झोपेची आवश्यकता असते, त्यामुळे त्यांची वाढ
होते. ह्या अवस्थेमधे तणावपूर्ण संप्रेरक (Stress Harmones) शरिरातून कमी होतात. त्यामुळे ताणतणाव कमी होतो. तसेच शांत व विचार शून्य अवस्थेत असूनही सजग असतो.
        योगनिद्रेमध्ये व ध्यानामध्ये दोन भुवयांच्यामधे (भूकुटी) ज्यास तिसरा डोळा असेही म्हणतात. तेथे लक्ष देण्यास सांगतात. ह्या भूकुटी मागेच पिनियल ग्रंथी (Pineal Gland) असते. जी तेथे लक्ष केंद्रित केल्यामुळे उत्तेजित होते आणि त्यामधून मेलॅटोनिन (Melatonin) नावाचा संप्रेरक तयार होतो. हा मेलॅटोनिन संप्रेरक हा तणाव कमी करणारा (Stress reducing hormone) असून त्यामुळे शांत झोप लागते. रोग प्रतिबंधक शक्ति वाढते. तसेच पेशींची दुरुस्ती व वाढ होते. त्यामुळे रोग होण्यास प्रतिबंध होतो.

Sharadyogvigyan.blogspot.com

Tuesday, 30 June 2020

योगविज्ञान योगनिद्रा विज्ञान भाग २

Wednesday 1 July  2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगनिद्रा भाग २
        मनाचे प्रशिक्षण : योगनिद्रेमध्ये जेव्हा विश्रांतीची अवस्था प्राप्त होते त्यावेळी अवचेतन व अचेतन स्तरांचे व्दार उघडतात. अवचेतन व अचेतन मन हे मानवांचे सर्वाधिक शक्तिचे केंद्र आहेत. योगनिद्रेच्या साधारण अभ्यासाने माणूस मनाच्या खोलवर प्रवेश करु शकतो. मानवाचे अवचेतन मन सर्वाधिक आज्ञाधारी शिष्याप्रमाणे असते.
या अवस्थेमध्ये जी आज्ञा दिली जाते ती तत्परतेने पाळली जाते.
        लहान मुलांमधील चंचलता अभ्यासाची अरुची, अशांती, अनिद्रा तसेच तरुण मुलांमध्ये तंबाखू, सिगारेट, दारु, मादक पदार्थांचे व्यसन सुटण्यासाठी योगनिद्रा अभ्यासाची मदत होते. वेदने पासून मुक्ति मिळते, तसेच काही लोकांना वेदना विनाशक गोळ्या खाण्याची लत असते. ती कमी होते. शरिरातील पियुशी ग्रंथी ही वेदना आणि पिडा यांची संवेदन वाहक ग्रंथी असून योगनिद्रामध्ये पियुशी ग्रंथी उत्तेजित होते आणि त्यामधून वेदना विनाशक रस जसे एन्डॉर्फीन (Endorphin) आणि एन्सेफेलीन्स (Encephelins) सारखे Endogenous Morphines चा खाब निर्माण होतो. तो केंद्रीय मज्जासंस्थाच्या सर्व बाजूने असणाऱ्या मज्जारज्जूमधील द्रवपदार्थामध्ये (Cerebrospinal Fluid) जाऊन मिळतो व मनुष्यास वेदनेपासून आराम मिळतो.
        जेंव्हा एखादी माता भयंकर तणावामध्ये असते त्यावेळी तणावजन्य संस्प्रेरक (Hormone) जसे Adrenaline नामक ग्रंथीच्या माध्यमातून आणि NoradrenaIne संप्रेरक प्लासेंटा मधून अर्भकाच्या (शिशुच्या) रक्तप्रवाहात मिसळतो. त्याचा विषारी परिणाम बाळाच्या शारिरीक व मानसिक विकासावर होतो. अशावेळी योगनिद्रेचा फायदा मातेस उपयुक्त ठरतो.
     दमा, यामध्ये श्वासनलिका आकुंचन पावल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. योगनिद्रेच्या अभ्यासामुळे श्वासनलिकेच्या स्नायुंचे शिथिलीकरण, मानसदर्शन आणि संकल्पाद्वारे श्वासास होणारा अवरोध दूर केला जातो व व्यक्तिस सुखानुभूती होते.
       योगनिद्रामध्ये हायपोथैलॅमस परानुकंपा नाडी संस्थान व्दारा हृदयाकडे तणावमुक्त संवेदना पाठवते, परिणाम स्वरुप हृदयाचे ठोके कमी होतात, रक्तदाब कमी होतो व हृदयावर पडणारा अतिरीक्त भार कमी होतो. कोरोनरी व्हासोस्पाजम (Coronary vasaspasm)) कमी होतो. भावनात्मक आणि आत्मिक तणावामुळे कोरोनरी आर्टरी आकुंचन पावते व कोरोनरी व्हासोस्पाजम होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो.
      योगनिद्रामुळे कमी होणारा रक्तचाप हा १२ महिनेपर्यंत टिकून राहतो. रक्तदाबासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळीचा परिणाम २४ तास राहतो.
       योगनिद्रामध्ये मेंदुत होणारे विद्युत लहरीतील बदल हे साधारण ध्यान साधनेत दिसणाऱ्या बदला सारखेच असतात.योगनिद्रामध्ये थिटा विद्युत लहरी ह्या ११ % ने जास्त तर अल्फा विद्युत लहरी ध्यान साधनेपेक्षा कमी दिसतात.

Sharadyogigyan.blogspot.com

योगविज्ञान योगनिद्रा विज्ञान भाग १


 Tuesday 30 June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)


योगनिद्रा विज्ञान भाग १
      बुध्दी आणि मन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बुध्दीचा विकास झाल्यास तो चांगली आणि बाईट ह्या गोष्टीतला फरक समजू शकतो. परंतु बौध्दिक विकास याचा अर्थ असा नाही की, तो एखाद्या वाईट गोष्टीचा  अंगिकार करणार नाही. उदा.- एकदा माझी भेट एका सुशिक्षित पोलिस ऑफिसरशी झाली. जो दररोज मदिरा सेवन करीत होता. त्याला ही गोष्ट माहित होती की, दारुमुळे शरिराची हानी होते. तरीही तो रोज दारा पीत होता. त्याला बऱ्याच लोकांनी दारु सोडण्याबद्दल समजावले. परंतु दारु सुटली नाही. एकदा तो योग-शिक्षकाला भेटला, त्याने त्यास योग केंद्रात येण्याचा सल्ला दिला. तो योग केंद्रात येऊ लागला. जस जसा तो आसन, प्राणायाम, ध्यान व योगनिद्रा यांचा अभ्यास करु लागला, त्याचे मन त्यामध्ये रमु लागले. शवासन, ध्यान व योगनिद्रा यांच्या माध्यमातून त्याच्या चेतन व अवचेतन मनावर जो प्रभाव पडू लागला त्यामुळे त्याने स्वतःहून मदिरा सोडण्याचा निर्णय घेतला व त्यात त्याला यश आले.याचा अर्थ माणूस कितीही विद्वान असला तरी त्याचे मन स्थिर ,शांत, नियंत्रणात किंवा ताब्यात असेलच असे नाही.त्याला यश आले. याचा अर्थ माणूस कितीही विद्वान असला तरी त्याचे मन स्थिर, शांत, नियंत्रणात किंवा ताब्यात असेलच असे नाही.
        योगनिद्रामध्ये साधकास योग्य विचार, सात्विक संस्कार हे अवचेतन मनाच्या स्तरावर जाऊन देता येतात. ज्यामुळे त्याच्या मनःस्थितीमध्ये योग्य बदल करता येतो.
       योगनिद्रामध्ये जेंव्हा मन खोलवर अवचेतन स्तरावर जाते त्यावेळी मन शांत आणि स्थिर होते. अशावेळी त्यास काही सकारात्मक संकल्प दिले जातात. या स्थितीमध्ये दिलेले विचार किंवा संकल्प हे अवचेतन मनाच्या स्तरावर सहजपणे स्विकृत केले जातात. जागृत किंवा चेतन अवस्थेमध्ये मन अशांत, अस्थिर व चंचल असते. अशा स्थितीमध्ये घेतलेले संकल्प हे फलीभूत किंवा यशस्वी होणे कठीण असतात. धृढ संकल्पाब्दारे घेतलेला निर्णय मनुष्यास यशस्वी होण्यास मदत करतो. संकल्प आणि योगनिद्रा यांचा जवळचा संबंध आहे. अवचेतन मनाच्या अवस्थेत घेतलेला संकल्प कभी विफल होत नाही. योगनिद्राचा अभ्यास करण्यापूर्वी संकल्प घेण्याचे लक्ष निर्धारित असाये. संकल्प हा सकारात्मक व योग्य संस्कारित असावा जेणेकरुन जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल.
       योगनिद्रामुळे साधकाच्या चित्तावर अनेक वृत्तीचा लेप चढलेला असतो तो निवृत्त होऊन चित्त निर्मल बनते.तसेच ध्यानाचा मार्ग सहज व सोपा बनतो
      निद्रा ( झोप ) ही पूर्ण अचेतन (अबोध) अवस्था नसून त्याच्यामध्ये एक अंतःशक्ती कांही प्रमाणत जागृत स्थितीत असते.जी बाहेरील परिस्थितीनुसार जागरूक राहुन त्यास प्रतिक्रिया देत असते आणि असे आढळून आले आहे की, ह्या मनाच्या अवस्थे मध्ये प्रशिक्षण दिल्यास त्याचा जास्त परिणाम व उपयोग होतो. ज्याप्रमाणे झोपेमध्ये एखादा डास चावल्यास त्यास आपण हाकलतो, मोठा आवाज आल्यास दचकतो. याचा अर्थ तुम्ही झोपेत जरी असाल तरी कांही प्रमाणात सजग असता. तुमचा आत्मा जागृत असतो.

Sharad yogi gyan.blogspot.com

Thursday, 25 June 2020

योगविज्ञान मंत्र विज्ञान भाग ४

Tuesday 24 June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग ४
      ध्वनी (नाद) हा मंत्राचा पाया असल्यामुळे त्यातून अद्भुत ऊर्जा निर्माण होते.ज्याप्रमाणे मंत्र व स्तोत्राचे उच्चारण सतत चालू ठेवल्याने ध्वनी ऊर्जा ही विद्युत ऊर्जेत (Electrical energy) किंवा कंपनात बदलते.ह्यामध्ये मन्त्र म्हणताना भावनांचा सहभाग असेल तर त्याचा परिणाम जास्त प्रमाणात होतो.
       ध्वनी कम्पन ऊर्जा : ( Power Sound Vibration):  ग्रैहम आणि नेल या डॉन शास्त्रज्ञानी ऑस्ट्रेलिया मधील मेलबोर्न येथे ध्वनी कम्पन वरील ऊर्जेवर एक प्रयोग करून दाखविला.त्यामध्ये त्यानी एका कारवर प्रयोग केला. त्यानी कार समोर 'स्टार्ट' म्हणताच ती सुरु झाली आणि हॉल्ट म्हणताच बंद झाली. सर्वाना आश्चर्य आणि जादू वाटली. परंतु यामागे ध्वनी कंपनाच्या ऊर्जेचे विज्ञान आहे.
       ग्रॅहमच्या हातात ट्रान्समीटर (Remote) होता. त्या रिमोटमध्ये शब्दांच्या आवाजाची (verbal Sound) वारंवारता ही विद्युत उर्जेत (Electrical Power)
बदलण्याची क्रिया होते. ही विद्युत शक्ति कारच्या कंट्रोल युनिटला पोहोचली जाते जी कारच्या डॅशबोर्डमधे असते. दुसरे युनिट कारमध्ये "Car Radio" चे असते. रिमोट मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग, कारच्या कन्ट्रोल युनिटकडे पाठविल्याने कार स्टार्ट होते. व हॉल्ट म्हंटल्याने बंद होते. ह्या शब्दांच्या ध्वनी लहरी कारच्या कन्ट्रोल युनिटशी मैच होतात.
     मंत्र ध्वनि हा Ultra Sonic Sound ॐकार वर आधारित आहे. जो आपण पाहू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही. त्यामुळे आता पर्यंत त्याचे वैज्ञानिक विश्लेषण किंवा मिमांसा होऊ शकली नाही, परंतु योग्य पध्दतीने त्याचे उच्चारण  आवाजासहित झाल्यास चमत्कार किंवा आश्चर्य घडू शकते.
       मंत्र हा शब्दांचा समुह असून तो एकाग्रतेने पवित्र व उदात्त भावनेने उच्चारल्याने त्याचे सकारात्मक परिणाम मंत्र उच्चारणाऱ्याच्या स्थुल व सूक्ष्म देहावर होतात. प्रत्येक
मंत्र हा एखाद्या देवतेशी संबंधीत असतो.
    ओम् हा सर्वात पहिला मंत्र असून अनेक धर्मात यास मान्यता आहे. ओम् ही एक वैश्विक शक्ति असून त्यामध्ये सर्व ध्वनी समावलेले आहेत, ओम् चा आध्यात्मिक प्रभाव (Spiritual Efficacy) हा कानांनी ऐकता येत नाही तर तो हृदयाने समजला जातो. ओम ची वारंवारता ७.८३ Hz असते जी आपण कानाने ऐकू शकत नाही. मानवाचा DNA हा  २ धाग्यांनी (Strand) जोडलेला असतो व तो २० पेक्षा कमी वारंवारतेचा आवाज ऐकू शकत नाही. पक्षी, कुत्रा व इतर प्राणी २० Hz पेक्षा कमी वारंवारतेचा आवाज ऐकू शकतात.
     कांही धर्मा मधे ओम् चा अवलंब आमेन, ओमकार, ओंकार व शालोम असा केला जातो. परंतु या सर्वाचा परिणाम ओम् सारखा दिसत नाही. ओम् च्या उच्चाराने मेंदूमध्ये नायट्रीक ऑक्साईड (Nitric Oxide) तयार होते तसे आमेन, ओमकार, ओंकार व शालोन ने होत नाही तर फक्त ध्वनीच ऐकण्यास येतो.
      मंत्रापेक्षा बीज मंत्राचा परिणाम जास्त होतो. बीज मंत्राची जसे ओम् (Om)7.83 Hz, गम् (Gam)-14Hz, ल्हीम (Hleem) 20 Hz, र्हीम (Hreem) 26
Hz, क्लीम (Kleem) 33Hz, क्रौन (Krown) 39 Hz, श्रीम (Shreem) 45Hz, हे वैश्विक ध्वनी (Cosmic Sound) १२ धाग्यांच्या DNA ने ऐकू शकतो. पौराणिक
काळात महर्षि ऋषी अध्यात्मिक समाधीच्या स्थितीत संवेदनाचा विस्तार करुन हे वैश्वीक ध्वनी ऐकत असत. मानवी मेंदू असे ध्वनी ऐकू शकत नाही. परंतु या आवाजांचे
मेंदूमधील कंपन ई.ई.जी. वर नोंद करता येतात.
    काही मंत्रांचा (स्वरांचा) परिणाम ठराविक चक्रांवर होतो. जसे मुलाधार (Lam), स्वाधिष्ठान (vam), मणिपूर (Ram), अनाहत (Yam), विशुध्दी (Ham), आज्ञा
 (om), शांत (No Sound), सहस्त्रार.(शांत No Sound)
      नैसर्गिकरित्या शरिरात नायट्रीक ऑक्साईड तयार होण्याचे लाभ :  अनुस्वार युक्त नाकातून घुमणारा ' म ' च्या (Nasal Sound mmmm) आवाजामुळे शरिरात नायट्रीक ऑक्साईडची (Nitric Oxide) वाढ होते. प्रत्येक बीज मंत्रामधे प्रत्येक अक्षरावर अनुस्वार असतो. त्यामुळेच मंत्रापेक्षा बीज मंत्र जास्त प्रभावशाली असतात. ही वस्तुस्थिती भारतीय ऋषीमुनींना ७००० वर्षापूर्वी माहित होती. पूर्वीच्या काळी नादस्वरम (शहनाई) ही प्रत्येक उत्सवात, कार्यात वाजवली जायची, ज्यांच्यामधून अनुस्वार युक्त नाकातून आलेला आवाज येतो.
      बीजमंत्रामुळे शरिरात नायट्रीक ऑक्साईड मध्ये वाढ होते. ह्या रसायनामुळे शरिरातील ५० ट्रिलीयन पेशी एकमेकांना संवेदने मार्फत जोडतात व संपूर्ण शरिरात
संवेदना पसरते.
     मधुमेहाच्या व्यक्तींमध्ये मधुमेह नसलेल्या व्यक्तिपेक्षा नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मधुमेह अती वाढल्यास संवेदना (Diabetic Neuropathy) वाहून नेण्याची क्षमता कमी होते.
    झाडाची पाने, फुले, खोड़ तोडून बाजुला ठेवले व त्यांना नायट्रीक ऑक्साईडचा पुरवठा केला तर ते जास्त दिवस टिकून राहतात.
      नायट्रोग्लिसरीन (Nitroglycenne) अमाईल नायट्राईटचा (Amy/ Nitrite) यांचे परिणाम रक्तवाहिन्यांचे प्रसरण (vasodilation) होण्यासाठी होतो. कारण शरिरात
त्याच्यापासून नायट्रीक ऑक्साईड तयार होते. त्यामुळे नायट्रोग्लिसरीन व अमाईल नायट्राईटच्या गोळ्या हृदय विकाराच्या वेदनेत (Angina Pectoris) देतात.
     रक्तामध्ये नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण योग्य प्रमाणांत राहिल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. म्हणून ओम् सच्चाराने शरिरात नायट्रीक ऑक्साईडची वाढ झाल्याने रक्तदाब नियंत्रित होतो.
    आयुष्यात वयाच्या २७ ते ४२ वर्षापर्यंत नायट्रीक ऑक्साईडचे प्रमाण सर्वोच्य असते. त्यानंतर हळूहळू कमी होत जाते.

Sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान मंत्र विज्ञान भाग ३

Monday 22 June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग ३
    जर्मनीच्या एका वैज्ञानिकाने एक अजब प्रयोग केला. त्याने जगातील मुख्य भाषांची जी वर्ण लिपी आहे त्या वर्ण लिपीतील वर्णाक्षर हे स्टीलचा पोकळ पाईप वापरून तयार केले आणि त्यानंतर त्या वर्णाक्षराच्या पोकळ पाईपमधून एका बाजूने यंत्राव्दारे हवा आत सोडण्याची व्यवस्था केली अशी की, ती हवा वर्णाक्षरातून फिरून दुसऱ्या मोकळ्या टोकाने बाहेर पडेल. जसे A किंवा B मधून हवा पास केली. बाहेर निघालेली हया सऽऽऽस हा आवाज कारीत बाहेर पडली. सर्वच इंग्रजी लिपी बद्दल तसे झाले. परंतु जेंव्हा त्याने देवनागरी लिपीतून तोच प्रयोग केला त्यावेळी त्याला
अतोनात आश्चर्य वाटले. कारण बाहेर पडणारी हवा त्या वर्णाक्षराचा ध्वनी करीत बाहेर पडायची म्हणजे 'म' मधून हवा गेली की, बाहेर येताना ध्वनि 'म' चा असेल. वर्णाक्षर 'स' असेल तर 'स' चा आवाज असेल. अशी वैशिष्तपूर्ण देवनागरी लिपी. ज्यामध्येच देव आहे. कदाचित हे सुक्ष्म शरीर व चक्रांचे रहस्य आहे.
        लहान मुलाला त्याची आई उभे करते आणि तोंडाने आवाज काढते श-शशssssशू. जगातील कोणतीही स्त्री असो, महाराष्ट्रीयन असो, मद्रासी असो की पंजाबी, भारतीय असेल वा चीन, जपान, इंग्लंडची. मुलाला संडास करण्यासाठी
वेगवेगळा आवाज काढत नाही, जसा कोणी कू कू किंवा हू-हू असे वेगळे आवाज काढत नाहीत. सर्वजण एकच आवाज काढतात आणि तो म्हणजे श-श-शऽऽऽशू. असे का ? संडासच्या जागी गुदद्वाराच्या ठिकाणी सुक्ष्म शरीरातील मुलाधार चक्र आहे. या चक्राला चार पाकळ्या आहेत. त्यावरील वर्णाक्षरे श, ष, स आणि व अशी आहेत. चार पैकी तीन वर्णाक्षरे 'श'कारात्मक आहेत. त्या शिशूमधील सुक्ष्म शरीरातील चक्रे अद्याप बंद झाली नाहीत, मिटलेली नाहीत, उघडी आहेत. 'श'कारात्मक आहेत. त्या शिशूमधील श काराच्या ध्वनीने त्या चक्रात कंपन होते. पाकळ्या थरारतात
आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी असलेल्या स्थुल शरिरातील नाडी केंद्रावर होतो. तेथे कंपन होऊन, क्रियाशिलता येते आणि मुलास शौचास होते. मोठ्या माणसांमध्ये चक्रे बंद झालेली असतात, मिटतात त्यामुळे त्यांच्यावर ' शू ' उच्चारनाचा परिणाम होत नाही.
     आधुनिक विज्ञानानेपण ध्वनीतरंग विस्फोटाने जगदुप्तती झाल्याचे मान्य केले आहे. हा ध्वनी अनाहत नाद आहे.
मंत्रात आणि बीज मंत्रातपण फरक आहे. मंत्रापेक्षा बीज मंत्र अधिक प्रभावशालीअसतात.
     मंत्र हे विज्ञान असून मंत्र म्हणणाऱ्यास त्यापासून अदभूत शक्ति किंवा उर्जा प्राप्त होते. प्रत्येक गोष्टीला कंपनामुळे वारंवारता (vibratary Frequency) असते. मग ते विचार (Thought) असो, शब्द असो अथवा भावना असोत. आपणांस कसे वाटते, कसा विचार करतो व कसे बोलतो. या सर्वाना ठराविक कंपन (Vibrations) असतात. अशा गोष्टीतून आपण आपले विश्व (World) परिसर (Suroundings) तयार करीत असतो. ध्वनी हा आश्चर्यकारक शक्तिशाली कंपन आहे.मंत्रातला मन
म्हणजे लक्ष, 'त्र' म्हणजे तरंग म्हणजे (Wave) किंवा प्रक्षेपण (Projection) म्हणून मंत्र याचा अर्थ मनाचा ध्वनी तरंग रुपात प्रक्षेपण. (Projection of Sound vibrations)
     विश्वाचे अस्तित्व हे अणू (Atom) आहे आणि शरीराचे अस्तित्व (Basic Structure) हे पेशी आहे. प्रत्येक पेशी ही सुध्दा अब्जावधी अणूनी तयार झाली आहे. प्रत्येक अणू हा धन केंद्रक (+ve Neucleus) आणि त्याच्या भोवती फिरणारे ऋण इलेक्ट्रॉन (-ve Electrons) ने बनले आहे. ज्याप्रमाणे इंजिनमध्ये किंवा डायनेमो भोवती चुंबकीय क्षेत्र (Electre Magnetic Field) तयार होते तसेच केंद्रका भोवती फिरणाऱ्या - ve Electrons मुळे अणू भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. प्रत्येक अणूचे त्याच्या वारंवारते प्रमाणे कंपन होत असते. मग ते धातू असो, पाणी असो, पेशी असो किंवा कोणताही पदार्थ असो. म्हणून विश्वातील प्रत्येक पदार्थ हा कंपायमान असतो असे विज्ञानाने स्पष्ट केले आहे.
      ज्याप्रमाणे एखाद्या संथ तलावामध्ये लहान, गुळगुळीत दगड फेकल्यानंतर तलावात दूर पर्यंत जाणारे तरंग तयार होतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या शब्दाचे उच्चारण करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये कंपन व तरंग तयार होतात. ज्यामुळे सूक्ष्म शरीर (Subtle Body) जागृत होते व तेथे उर्जा निर्माण होते. अशा प्रकारे आपण ज्या कोणत्याही शब्दांचे ध्वनी उच्चारण करतो त्याचे परिणाम स्वतःवर,
समाजावर व सृष्टीवर (Universe) दिसून येतात.
       ध्वनी मधे अद्भुत शक्ति, उर्जा असते. ही सत्यस्थिति आपल्या पौराणिक ऋषींना माहित होती. त्यामुळे संगीत आणि ध्वनी याचा उपयोग जैविक उपचारासाठी मंत्रातून व स्तोत्रातून (Collection of Mantra Group) विश्वातील सूक्ष्म शरीर यावर केला जो की हा परिणाम स्थूल शरीरापेक्षा कित्येक पटीने जास्त असतो.

sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान मंत्र विज्ञान भाग २

Monday 22 June  2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)

मंत्र विज्ञान भाग २ 
वर्तमानकालीन अत्याधुनिक यंत्रसामुग्रीवरून असे ज्ञात झाले आहे की, गर्भावस्थेमध्ये सातव्या महिन्यात श्रवनकेंद्र (Auditory center) मेंदूमध्ये विकसित होते.महाराष्ट्रामधील लोणावळा येथील मनःशक्ती केंद्र येथे गर्भवती मातावर विविध मंत्र ऐकवण्याचा प्रयोग करून बालकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला गेला.त्यामध्ये मंत्रोचारण करून माताची नाडी गति व बालकाचा हॄदयस्पन्दन आलेख घेण्यात आले . या मंत्रोच्चारण मुळे बालक पुढील भविष्यातील जीवनात विविध कार्यामध्ये निपुण होतो व या विधानास कॅलिफोर्निया येथील डॉ एफ.जे. बांडेकर  यांनीही ह्या संशोधनास पुष्टी दिली आहे.
     विशिष्ठ शब्दांच्या (वर्णाक्षरांच्या) उच्चारनाने मग ते उच्चारन उच्चस्तर (वैखरी) किंवा मानसिक असो त्याचा विशिष्ठ परिणाम चक्रावर होऊन ते उत्तेजित होतात. वर्णाक्षरे कोणत्याही भाषेत संस्कृत , इंग्रजी ( vovels Syllable)असो,ह्याचा परिणाम चक्रावर होतो.
      देवनागरी लिपीची वर्णाक्षरे संस्कृतमध्ये एकूण ५० वर्णाक्षरे आहेत. सहा चक्रे मिळून ५० पाकळ्या आहेत. मुलाधार ४, स्वाधिष्टान ६, मणिपूर १०, अनाहत १२, विशुध्दी १६, आज्ञा २ असे एकूण ५० पाकळ्या.
        ऋषी मुनींनी समाधी अवस्थेत ही चक्रे पाहिली. त्यावरच्या आकृत्या पाहिल्या. समाधी अवस्थेतून उठल्यावर त्या आकृत्या मातीत जमिनीवर काढल्या. त्यानंतर
वेगवेगळ्या त-हेचे ध्वनी उच्चारत कोणत्या ध्वनीने कोणती पाकळी कंपित होते याचे निरीक्षण करुन त्या पाकळीवरील आकृतीचा तो उच्चार नक्की करुन अशा रितीने वर्णाक्षर व त्यांचा उच्चार नक्की झाला. कोणत्या अक्षराने कोणती पाकळी कंपन पावते त्याचा उच्चार नक्की झाल्यावर वेगवेगळी वर्णाक्षरे विशिष्ठ रितीने मांजून त्यापासून होणारे फायदेपण अभ्यासले. त्यांचे शरिरावर व मनावर होणारे परिणाम यांची अनुभूती घेतली. अशाप्रकारे मंत्र तयार झाले. आपणांस तेलगु, मल्याळम, तामिळी भाषा जरी येत नसेल किंवा कळत नसेल तरी त्या भाषेत कोणी भजन गात असेल तर आपल्याला जाणवते की, ते देवाचे भजन गात आहेत. कुणी शिव्या देत असेल तर काही तरी वाईट बोलत आहे. भाषा कळत नसली तरी होणारी त्याची अनुभूती त्या त्या शब्दांच्या ध्वनी कंपनाने हाते. ऋषी मुनींनी मानवाच्या कल्याणासाठी उत्पन्न होणारी कंपने, त्याने होणारा शारिरीक, मानसिक व आंतरिक लाभ, प्रसंगी रोगनिवारणार्थ त्यांचा प्रयोग केला आणि वेगवेगळे मंत्र निर्माण झाले.
      ऋषी मुनींनी मंत्राचे उच्चारण योग्य पध्दतीने व्हावे याला महत्व दिले. मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हे एकट्याने करण्यापेक्षा सामुहिकरित्या एकत्रितपणे केल्याने त्याचा परिणाम कांही पटीत चांगला होतो, जास्त प्रमाणात होतो. ते मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हे एकाच सुरात असावेत जेणे करुन त्यांचा ध्वनितरंग (Resonance) सारखे असावे.
      संगीतातील ध्वनिमुळे होणारा चक्रावरील परिणामापेक्षा कंठस्थ ध्वनि (मंत्रोच्चार, स्तोत्र) याचा परिणाम चक्रावर जास्त प्रमाणांत व चांगला दिसून येतो.
      ओंकार, गायत्री मंत्राच्या उच्चारणाने इष्ट चक्रस्थानावर कंपन जास्त प्रमाणांत प्रयोगांती आढळून आले. म्हणून त्यास श्रेष्ठ मंत्र ही समजतात व मानतात.
        ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वर्णाक्षरांच्या उच्चारणाने चक्रावर परिणाम होतो, तसेच वेगवेगळ्या वाद्यांच्या ध्वनींचा परिणाम वेगवेगळ्या चक्रावर होतो. जसे ड्रमचा मुलाधार
चक्रावर परिणाम होतो. लहान व मोठे ड्रम यांचा परिणाम मुलाधार ते स्वाधिष्ठान चक्रावर होतो, मोठे हवा वाद्य (Wind Instruments) जसे ट्रॅम्पेट, शहनाई, पिपानी, यांचा परिणाम स्वाधिष्ठान ते मणिपूर चक्रावर होतो. मेटॅलिक (धातु वाद्य) आवाजाचा परिणाम मणिपूर ते अनाहत चक्रावर होतो. जेंव्हा तो नाद आपण ऐकतो त्यावेळी आपल्या पोटात कसेतरी (बेंबी जवळ) ह्याची जाणीव काहींना झालीच असेल. काही वेळेस घर्षणाचा खर्र ssss र असा आवाज येतो त्यावेळी अंगावर शहारे, मुंग्या आल्यासारखे होते व तो नकोसा वाटतो. तारेचा (तंतू वाद्य किंवा (Spring
Instrument) परिणाम अनाहत चक्र (Heart Chakra) वर होतो. जसे विणा,  सितार, मौतारंग, पियानो, हारमोनियम सारखे (Flute Instrument) चा परिणाम अनाहत व विशुध्दी चक्रायर होतो. तसेच घंटीचा नाद, पाण्याचा आवाज (जल नाद), पक्षांचे आवाज अशा नाजूक आवाजांचा परिणाम विशुध्दी व आज्ञा चक्रावर होतो.सहस्त्रार चक्रावर ध्यानाचा तसेच सर्वच वाद्यांचा एकाच वेळी वाजल्याने होतो. म्हणून मंदीरामध्ये ड्रम, नगारा एकदम दूर बाजूला ठेवतात. तर हवा वाद्य त्यापेक्षा थोडे जवळ व त्यापेक्षा घंटी अजून जवळ ठेवतात. मात्र गाभाऱ्यात एकदम निरव शांतता असते. कोणताही आवाज शांततेतून निर्माण होतो व शांततेत पूर्ण होतो.

Sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान मंत्र विज्ञान भाग १

Sunday 21 June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
  मंत्र विज्ञान भाग १
श्वासामुळे घस्यातील स्वरतंतु कंपन पावल्यामुळे ध्वनि लहरी निर्माण होतात.या ध्वनीचे घस्यांमध्ये व नाकामध्ये वेगवेगळ्या स्वरात रूपांतर होते.याचाच अर्थ आपणास बोलता येते.ही क्षमता किंवा वरदान हे परमेश्वराने मानवासच दिले आहे. जगातील इतर प्राणी आवाज काढू शकतात.परंतु मानवाप्रमाणे ते बोलू शकत नाहीत किंवा त्यांना मन व बुद्धी दिलेली नाही. मानवाची वाक् शैली ,वैचारिक शक्ती ,मन व बुद्धी यामुळे त्याचे स्थान जगात परमश्रेष्ठ आहे. वाक् शैलीतून भाषेची निर्मिती झाली. ज्याच्यामुळे मानवाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. वैदिक काळात  भारताने भौतिक शास्त्रातच नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रातही प्रगतीचे अत्युच्य शिखर गाठले आहे.
       ध्वनी कंपनाचा शरिराच्या विविध भागावर उत्तेजन निर्माण करणाऱ्या परिणामाचा योगीक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या मंत्रोच्चारामध्ये चपलखपणे व चतुरपणे उपयोग करण्यात
आला आहे. फक्त साडे तीन अक्षराव्दारे निर्माण होणाऱ्या "ओम" (ॐ) मंत्रामध्ये सर्व ३ स्थिती, ३ रचनारुपे, आणि जाणिवेच्या ३ पातळी उत्तेजित करण्याचे सामर्थ्य आहे, वैदिक ऋषींनी स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे की, मानवाच्या गर्भावस्तेमध्ये मेरुदंडामध्ये (Vertebral Column) ध्वनीची निर्मिती होते.
    मान, पाठ. कंबर सरळ ठेऊन बसणे किंवा उभे राहिल्याने ऐकण्याच्या प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त नियंत्रण प्राप्त होते आणि मेंदू पूर्ण जाणीवावस्थेत उत्तेजित होतो.
    ओम् चा जप केल्याने षट्चक्रांना ज्या आपल्या शरिरातील मूळ उर्जा आहेत त्यांना विशिष्ट शाक्तिच्या ध्वनिलहरीव्दारे उत्तेजित करता येते.
     आपण जे ध्वनी ऐकतो ते साधारण २५० ते ४००० या वारंवारतेचे (Frequency) असतात. परंतु २५० च्या खाली व ४००० Hz च्या वर असलेल्या ध्वनीलहरी ऐकण्यास येत नाहीत, परंतु त्याचा आपल्या शरिरावर परिणाम होतो.
आपण जे बोलतो त्याची वारंवारता साधारण २५० ते ४००० Htz असते.
    डॉ. आल्फ्रेड टोमॅटीस फ्रेंच इ.एन.टी. स्पेशालिस्ट यांनी श्रवण प्रणालीच्या दीर्घ अभ्यासाब्दारे सांगितले की, ४००० ते 1000Htz- किंवा यापेक्षा अधिक अशा उच्च कंपन शक्तिचे ध्वनी विचारशक्ती, आकलन, स्मरणशक्ती यासारख्या
कार्यावर परिणाम करतात. ७५० ते ३००० Hz - कंपनशक्तीचे ध्वनी हृदय, फुफ्फुसे व भावना उत्तेजित करतात. तर १२५ ते ७५० Hz  पेक्षा कमी कंपनशक्तीचे ध्वनी शारिरीक चलन चलनावर परिणाम करतात.
    ओंकारामधे 'अ' चा जागृत अवस्थेत स्थुल शरिरावर परिणाम होतो. 'उ' अक्षराचा स्वप्नावस्थेत सुक्ष्म शरिरावर परिणाम होतो. तर 'म' अक्षराचा परिणाम गाढ निद्रावस्तेत कारण शरिरावर परिणाम होतो.
   ज्याप्रमाणे प्रकाशातील कांही किरण आपणास दिसत नाहीत जसे क्ष किरण (X ray ) ,इन्फ्रारेड (Infrared),अल्ट्राव्हायोलेट ( Altraviolet) परंतु या किरणांचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आपणास दिसतात .तसेच १२५ हर्ट्स पेक्षा कमी व ४००० हर्ट्स पेक्षा जास्त हर्ट्स असलेल्या ध्वनी आपणास ऐकू येत नाहीत परंतु त्यांचे परिणाम आपल्या शरीरावर (स्थूल देह -ग्रॉस बॉडी),सूक्ष्म देह (Subtle Body) , कारण शरीर (Causal Body) यावर होतो.

sharadyogvigyan.blogspot.com

Thursday, 11 June 2020

योगविज्ञान कपालभाती भाग २

Thursday 11th June  2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)


कपालभाती भाग २ 
   ३) कपालभातिमध्ये हृदयाचे उत्पादन (Cardiac Output) वाढते. त्यामुळे मेंदूचे भालीय प्रदेशात (Frontal Cortex) रक्तप्रवाह वाढतो. कपाळावर ओज, तेज,
आभा आणि चमक वाढते. यास भाल भाति असेही म्हणतात. त्याचप्रमाणे सुक्ष्म पातळीवर
पाहिल्यास मेंदूमध्ये प्राणशक्तिचा प्रवाह वाढतो. श्वसन संस्था आणि पचन संस्था चांगली कार्यान्वित रहाते.
   ४) कपालभातिमध्ये पोटांच्या स्नायुंची हालचाल झाल्यामुळे पाटातील महत्त्वाचे अवयवांचा सौम्य मसाज होतो व ते सक्रीय रहातात.
    ५) सामान्य शासनामध्ये श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. ऍन्ड्रे व्हॅन स्वेथ यांच्या प्राणायामावरील "The Yoga of Breathing" या पुस्तकात श्वासाचा परिणाम मेंदूवर होतो असे सांगितले आहे. मेंदूच्या भोवती जो द्रव (Cerebrospinal Fluid) असतो, ज्यामुळे मंदूचे संरक्षण होते. प्रत्येक शासाबरोबर (Inhalation) ह्या द्रवाचे आकुंचन होते आणि मेंदूवर सुक्ष्म दाब येतो आणि प्रश्वासाबरोबर रेचक (Exhalation) द्रवाचे प्रसरण होते. मेंदूवरील दाब कमी होतो. हा एक यांत्रिक प्रभाव असून प्रत्येक श्वास प्रश्वासाच्या क्रिया चक्राबरोबर हा
परिणाम दिसून येत असतो. कपालभातिमधील सक्रिय आणि प्रभावी रेचकाच्या क्रियेमुळे मेंदूवरील परिणाम सामान्य श्वसन क्रियेच्या काही पटीत वाढतो. त्यामुळे मेंदूचे कार्य
आणि सर्व मेंदू केंद्र सक्रिय होतात.कपालभातीमधील 50 ते 100 आवृत्तीबरोबर मेंदू ३ ते ७ पट उत्तेजित होतो.त्यामुले मन शांत, निर्विचारी आणि आकलनव ग्रहणशक्ती वाढते.
   ६)कपालभाती मध्ये प्राणवायूंचा वापर १.१  ते १.८ पट वाढतो. त्याचप्रमाणे मेंदूला ऑक्सिजन पूरवठा वाढतो.परानुकम्पा मज्जासंस्थाचा परिणाम अनुकंपा.          मज्जासंस्थेपेक्षा जास्त प्रभावी होतो.त्यामुळे मानसिक शांती  आणि भावनिक स्थिरता प्रदान होते.
     ७) कपालभातिमधील जलद हालचालीमुळे आम्ल आणि अल्कली यांचे प्रमाण (Acid base balance) समतोल रहाते.
      ८) कपालभातिमध्ये पायाभूत चयापचय दर (BMR) हा वाढतो. त्यामुळे शरिरात मेद (Fat) जमा होणे कमी होते. तसेच यकृतामध्ये Lipoprotein Lipase ची वाढ होते. ज्यामुळे रक्तामधील Triglycerides चे प्रमाण कमी होते. पोटाच्या हालचालीमुळे स्वादुपिंडाची मसाज होते. त्यामुळे Pancreatic Cell पून: निर्माण होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
    ९) सामान्य श्वसनामध्ये मेंदुमधील लम्ब मज्जा मध्ये  ( Medulla Oblongata) ज्याप्रमाणात काम करीत असतात त्यापेक्षा कपालभतीच्या श्वसनाच्या अभ्यासाने जास्त सक्रिय बनतात.
  १०) सामान्य स्वसनामध्ये श्वास घेताना (पूरक) स्वासपटल ,बरगड्यांचे स्नायु , श्वासनाचे स्नायु हे सक्रिय असतात.तर हेच स्नायु श्वास सोडताना (रेचक) निष्क्रिय किंवा शिथिल असतात. याचाच अर्थ श्वास घेताना प्रयत्न करावे लागतात.तर श्वास सोडताना प्रयत्नाविना ही क्रिया स्वयंचलित होते. वातक्रम कपालभाति मध्ये ही क्रिया उलट होते.याचा अर्थ रेचक प्रयत्नपूर्वक करावा लागतो,व पूरक आपोआप प्रयत्नाविना होतो. ह्या बदललेल्या क्रियेमुळे मेंदुमधील संवेदना मज्जातंतु व आज्ञामज्जातन्तु यांचा मार्ग बदलतो. त्यामुळे मेंदुतिल सुप्त मेन्दूकेंद्रे जागृत होतात.
   ११) सामान्य श्वसनामध्ये साधरण एक मिनीटाला पंधरावेळेस श्वास घेतला व सोडला जातो. कपालभाति मध्ये तो एका मिनिटाला ५० ते १०० वेळेस श्वास घेतला व सोडला जातो. त्यामुळे ही क्रिया सामान्य श्वसनापेक्षा ३ ते ७ पटीने होते. त्यामुळे जास्तीत जास्त कार्बन डाय ऑक्साइड व अनावश्यक वायु फुफ्फुसातुंन व शरीरातील पेशी पासून बाहेर फेकला जातो.

Sharad yog vigyan.blogspot.com

योगविज्ञान कपालभाती प्राणायाम भाग १

 Wednesday 10 th June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)

कपालभाति प्राणायाम भाग १
      कपालभातिचे शरिरावर होणारे परिणाम : सामान्य श्वसनात प्रत्येकवेळी ४५० ते ५०० मि.ली. हवा घेतली जाते व सोडली जाते. तर कपालभातिमध्ये फक्त १५० ते २०० मि.ली. हवा अर्ध्या सेकंदात घेतली व सोडली जाते. कपालभातिमध्ये श्वसन उथळ होते. परंतु श्वसनाची गती वाढल्याने दर मिनिटात घेतल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण जवळ जवळ तिप्पट होते. सामान्य श्वसनात दर मिनिटाला ७.५ ते ८ लिटर हवा घेतली जाते व कपालभातिमध्ये २० ते २१ लिटर हवा दर मिनिटाला घेतली जाते. त्यामुळे श्वसनतंत्राचे काम वाढल्याने प्राणवायु जास्त घेतला जातो. कर्बाम्लवायुही भरपुर प्रमाणात बाहेर टाकला जातो. कर्बाम्लबायु जास्त प्रमाणात बाहेर टाकला जात असल्याने कर्बाम्लवायुचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कपालभाति नंतर मेंदूतील श्वसनकेंद्र उत्तेजित होऊ शकत नाहीत.
         कपालभाति नंतर बराच वेळ पर्यंत साधकास श्वास घेण्याची किंवा सोडण्याची गरज पडत नाही. यासच 'केवल' कुंभकाची स्थिती म्हणतात. त्यामुळे कपालभाति
नंतरचा आंतरकुंभक ३० ते ४५ सेकंद सहजतेने होतो. तर सामान्यतः कपालभाति न करता केलेला आंतरकुंभक १० ते १५ सेकंदाचा होतो. छातीचा भाग थोडा वर उचलून, फुलवून त्याच अवस्थेत कायम ठेवल्याने प्रत्येक रेचकाच्या वेळी मिळणाऱ्या धक्क्याचा दाग बरोबर फुफ्फुसावर वरच्या देशेने
सरळ रेखेत पडतो व श्वसनमार्ग प्रभावी रितीने स्वच्छ होतो.
कपालभाति सुरु असतांना हृदयाची गती १५ ते २५ ठोके प्रति मिनिट याप्रमाणे वाढते. सिस्टॉलिक (Systolic) रक्तदाब १० ते १२ मि.मी. ने वाढतो. हृदयाच्या खालच्या बाजूस श्वासपटलाच्या धक्क्याने दाब वाढण्याचाही संभव असतो. म्हणून उच्च रक्तदाब व हृदय रोग असणाऱ्यांनी कपालभाति हळुवार व योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा.
कपालभातिमधील पोटाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे मुलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्रावर विशेष दाब पडतो.
     ज्या लोकांना तीर्व दमा किंवा दिर्घकालीन जुनाट फुफ्फुसांचे आजार असतात त्यांना सामान्य श्वसनाच्या वेळीही बरगड्यांच्या स्नायुंची जोरात हालचाल करावी
लागते. श्वसनाच्या स्नायुंना श्वास जोरात घेण्यासाठी जास्त शक्ती खर्च करावी लागते. त्यामुळे हे स्नायु लवकर थकतात. अशा लोकांनी दम्याचा त्रास नसतांना कपालभाति
सराव केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन :
    १) कपालभातिचा अभ्यास जर शक्तिपूर्ण स्वरुपात १ ते ५ मिनिटासाठी केला तर शरिरातील जवळ जवळ प्रत्येक पेशीत कंपन निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक अवयव सक्रिय बनतात.
      कपालभातित निर्माण केलेली स्पंदने रोहिणी, निला व केशरक्तवाहिन्यांपर्यंतही पोहोचतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये जमलेल्या रक्ताच्या गाठी (Thrombus) विरघळतात, कपालभातिमुळे हृदयातील रोहिणीतील (Coronary Artery) अवरोध (Blockage) दूर होतो. ही क्रिया आपणांस अशाप्रकारे समजून घेता येईल की, जेंव्हा मोटरकार उभी असते आणि गाडीचे इंजिन सुरु असते. त्यावेळी गाडीची नैसर्गिक कंपने (Frequency) आणि इंजिनची शक्ती कंपने लयबध्द झाल्याने मोटरकारमधे कंपने येतात. या कंपनास गाडीतील प्रवाशी सहजपणे अनुभवतात. ज्याप्रमाणे गाडीतील प्रवाश्यांना ही कंपने जाणवतात त्याच प्रमाणे कपालभातिमुळे झालेल्या कंपनांचा परिणाम शरिरातील रक्तवाहिन्यांमध्ये जर रक्तांच्या गाठी असतील तर त्यावर होतो. या कंपनामुळे त्या गाठी विरघळतात. अशाप्रकारे कपालभातिमुळे हदयातील रोहिणीमधील अवरोध दूर होतात आणि हार्टएटॅकचा धोका टळतो.
   २) सामान्य शासनामध्ये श्वास घेण्याची क्रिया ही सक्रीय असते तर श्वास सोडण्याची क्रिया ही निष्क्रीय असते. परंतु कपालभातिमध्ये ही नैसर्गिक क्रिया विरुध्द होते. म्हणजेच श्वास सोडण्याची (रेचक) ही क्रिया सक्रीय असते आणि श्वास घेण्याची (पूरक) ही क्रिया निष्क्रीय होते. ह्यामुळे संवेदना मज्जातंतु (Sensary nerve) आणि आज्ञा मज्जातंतु (Motor nerve) या मध्ये बदल होतो. ह्यामुळे मेंदूत लंब मज्जामधील श्वास आणि प्रश्वास केंद्र सक्रीय बनतात.

Sharad yog vigyan.blogspot.com

योग विज्ञान उज्जायी प्राणायाम भाग १

Monday 8th June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)

उज्जयी प्राणायाम भाग १
  वैज्ञानिक दृष्टीकोन:
  १) उज्जायीत श्वासावाटे घेतलेली हवा जास्त वेगाने व दाबाने आत जाते.त्या मुळे बंद वायुकोष कार्यान्वित होतात. त्यामुळे दम्याच्या विकाराने पिडीत असलेल्यांना आराम मिळतो. कारण त्यांच्या वायुकोषांची तोंडे सूज आल्यामुळे आकुंचित होतात.त्यामुळे आत जाणारी हवा वातावरणातील दाबामुळे वायुकोषाची तोंडे पाहिजे तेवढ्या प्रमाणांत उघडू शकत नाहीत. त्यामुळे उश्वास करतांना सूं सुं असा आवाज येतो. उज्जायी केल्याने वायुकोषाच्या तोंडाची सूज कमी होते व तोंडे उघडली जाऊन दम्याचा त्रास कमी होतो.
  २) उज्जायी करताना श्वासावर लक्ष केंद्रीत केल्याने मनातील बाह्य विचार कमी होतात, मन शांत व संतुलित झाल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते व हृदय रोग टाळता येतो.
  ३) घश्याचे काही प्रमाणात आकुंचन झाल्यामुळे पुरक करतेवेळी फुफ्फुस जास्त प्रमाणांत प्रसरण पावते आणि रेचक करताना पोट आणि छाती जास्तीत जास्त प्रमाणांत आकुंचन पावते. त्यामुळे फुफ्फुसाला जास्तीत जास्त क्षमतेने काम केल्याने जास्तीत जास्त ऑक्सिजनची देवाण-घेवाण होते.
  ४) फुफ्फुस जास्त प्रमाणात प्रसरण पावल्यामुळे रक्ताभिसरण नेहमीपेक्षा जास्त प्रमाणांत होते, व्यायामामध्ये किंवा पळल्यामुळे जेवढा परिणाम होतो, तेवढाच परिणाम
कोणत्याही स्नायुंचा सहभाग किंवा आकुंचन न होता मिळतो.
  ५) घश्याचे आकुंचन केल्यामुळे पूरक आणि रेचक दीर्घकाळ करावा लागतो. हळूवार व दीर्घ श्वास घेतल्यामुळे परानुकंपा मज्जा संस्थेशी संबंध येतो व शांत भाव निर्माण होतो.
  ६) घश्याच्या आकुंचनामुळे सौम्य दाब कॅरॉटीड सायनसवर पडतो. त्यामुळे रक्तदाब, नियमित होतो. ताणतणाव (Tension) कमी होतो. तसेच निर्विचार होण्यास
मदत होते.
  ७) उज्जायी प्राणायामात गळ्यावरील स्वरयंत्रातील (Larynx, Voice box) कंपनामुळे आतील संवेदनात्मक मज्जा पेशी (Sensory Receptors) उत्तेजित होतात
आणि व्हेगसला (Vegus Nerve. 10th Cranial Nerve) संवेदना पाठवतात. व्हेगस नर्व्ह ही हृदयाशी संबंधीत असल्यामुळे हृदयाचे स्पंदन कमी होते. हृदयास आराम मिळतो. त्यावरील ताण कमी होतो. त्याचा Inhabitory Effect हृदयावर होतो. त्यामुळे शांत (Calming effect) वाटते.
  ८) उज्जायी प्राणायामाला Psychic Breathing असेही  म्हणतात,कारण मेंदूवर सूक्ष्म परिणाम होतो.
  ९) उज्जायी मधे पूरक करतांना घश्याच्या आकुंचनामुळे श्वसननलिका व हवेचे घर्षण होवून तेथे एक प्रकारचा ध्वनी निर्माण होतो. तो ध्वनी स्वरतंतुच्या (Vocal Cords)
खाली गेल्यानंतर Ultrasound rays मध्ये बदललो. जी एका सरळ रेषेत बदलते. त्यामुळे त्या ध्वनीचे रुपांतर उर्जेत होते व वायुकोषामधे (Sonoluviscent effect)
होतो. ज्यामुळे हवा आणि रक्त यामध्ये Churning होते (घुसळते) आणि तेथे अति सुक्ष्म बुडबुडे (Fine Bubbles) तयार होतात. त्यामुळे ऑक्सिजन आणि कार्बन-डायऑक्साईडची देवाण घेवाण जलद होते. भ्रामरी नाद व ओंकार नाद मुळेही हीच क्रिया होते.
  १०) उज्जायी प्राणायामामध्ये कार्डीयाक आउटपूट (Cardiac output) १७ % ने वाढते.
  ११) २००६ मधे योग रिसर्च फाऊंडेशन भोपाळमध्ये उज्जायी प्राणायामावर एक अभ्यास झाला. त्यामध्ये २२ दम्याचे, ११ उच्च रक्तचाप व ७ स्वस्थ व्यक्तिंवर रोज ५ मिनीट असा १ महिना उज्जायी प्राणायाम केला. दम्याच्या रोगींना जास्त फायदा झाला. त्यांच्या रक्तात O2 मात्रा 075% वरुन ५% ने वाढली होती. घश्याच्या आकुंचनामुळे श्वसन नलिकेतील वायुमार्गात दाब निर्माण होतो. त्यामुळे रेचकानंतर लहान श्वासनलिका बंद होण्यापासून वाचतात. त्यामुळे दम्याच्या पेशंटमध्ये O2 चा पुरवठा अधिक प्रमाणात होतो. हे श्वसन नलिकेचे आकुंचन झाल्यामुळे होते.
       उच्चरक्तचापाच्या पेशंटमध्ये उज्जायी प्राणायामानंतर वरील ब्लडप्रेशर (Systolic BP) 20mmHq. ने तर खालील ब्लडप्रेशर (Diastolic BP) 5mmHg. ने कमी
झाल्याचे दिसून आले.

sharadyogvigyan.blogspot.com

योगविज्ञान। शवासन भाग २

Sunday 7th June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
शवासन विज्ञान भाग २

     शवासन व झोप (निद्रा) : सामान्य माणसाच्या दृष्टीने शवासन व झोप हे सारखेच आहेत. परंतु योगिकदृष्ट्या शवासनात जी मनास विश्रांती मिळते आणि त्यामुळे चयापचयाच्या क्रियेवर परिणाम होतो तो जास्त आणि चांगल्या प्रतीचा असतो.
        गाढ झोपेमध्ये साधारणपणे ८ ते १० टक्के ऑक्सिजनची गरज जागेपणीपेक्षा कमी असते. तर शवासनामध्ये ती  २० ते २५ टक्के जागेपणी पेक्षा कमी भासू लागते. झोपेमध्ये आपली जागृत अवस्था (Awareness सजगता) नाहीशी होते, तर शवासनामध्ये जागृत राहणे अत्यंत आवश्यक असते.
     शवासनाच्या स्थितीत मेंदूमध्ये अल्फा तरंग (Waves) येतात, अशी तरंगे ध्यान व समाधी अवस्थेतही येतात.गाढ झोपेमध्ये ही अल्फा तरंगे येतीलच असे नाही.
     शवासनामध्ये झोपू नये : कारण - शवासनामध्ये आपली सजगता किंवा लक्ष हे वेगवेगळ्या अवयवांवर व श्वासावर केंद्रीत केलेले असते. जर मध्येच झोप लागली तर तो अर्धबोध (Semiconscious) किंवा अबोध (Unconscious) स्थितीत जाईल जेथे त्याची सजगता राहणार नाही व तो दिलेल्या लक्ष्यापासून दूर जाईल, मन वेगळ्याच विचारात गुंतून राहील, तसेच शवासनामध्ये योग गुरु किंवा ध्वनिफितीतून दिलेल्या आज्ञा पाळल्या जाणार नाहीत. बऱ्याच वेळेस शवासनातून बाहेर आलेल्या व्यक्ति उठून बसतात, परंतु निद्रावस्थेमधे असणारी व्यक्ति झोपूनच रहाते याचा अर्थ ती व्यक्ति दिलेल्या सुचना पाळत नसते म्हणून शवासनात न झोपता सजग रहाणे आवश्यक आहे.
       शवासनाची स्थिती घेतांना शयन स्थितीमध्ये दोन्ही हाताचे तळवे जमिनीकडे न ठेवता आकाशाकडे करून ठेवतात. हाताचे तळवे हे स्पर्शाच्या संवेदनेसाठी (Touch
Sensation) अति संवेदनशील असतात. तळवे जमिनीकडे केल्यास येणाऱ्या संवेदनेत वाढ झाली की चंचल मन लगेच त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे सजगता
भंग होऊ शकते. हेच स्पष्टीकरण शवासनामध्ये डोळे बंद करुन करण्यामागे आहे. डोळ्यामधून सर्वात जास्त संवेदना मेंदूकडे येतात. एडगर डेल च्या म्हणण्याप्रमाणे ८३ टक्के संवेदना (Senses) ह्या डोळ्यामधून येतात. म्हणून डोळे बंद केल्यामुळे ह्या संवेदना कमी होतात. हा एक प्रत्याहाराचाच भाग म्हणण्यास हरकत नाही.
        शवासनामध्ये बाहेरुन येणारे आवाज टाळणे महत्वाचे असते. यासाठी कान बंद करुन तर ही क्रिया करता येत नाही कारण मिळणाऱ्या सूचना पाळावयाच्या असतात, त्यासाठी जागा निवडतांनाच योग्य शांत जागा निवडणे व वेळ निवडणे
आवश्यक आहे. त्यामुळे योग गुरुकडून मिळणाऱ्या सूचना स्पष्टपणे ऐकावयास येतील. तसेच किटक व मच्छर विरहीत जागा असावी, ज्यामुळे सजगतेत भंग होणार नाही.
      शवासनाच्या वेळी तोंड नेहमी बंद ठेवावे. श्वास हा नाकानेच घ्यावा. योगाच्या सर्व क्रियेत तोंड बंद ठेवून नाकानेच श्वास घेतला जातो.
       शवासनामध्ये जमिनीवर टाकलेले अंथरुण हे फार गादीसारखे मऊ नसावे अथवा फार कडक ही नसावे. अंथरुणाखाली एखादा खडा किंवा दगड आल्यास तो पाठीस टोचतो व हा वेदनादायी संवेदनेमुळे मन एकाग्र होण्यास बाधा येते व सजगता चांगली होणार नाही.
      शवासनामागील मेंदू विज्ञान : शवासनामध्ये मेंदूतील मज्जापेशीमधे वाढ होते. नवीन मज्जापेशी तयार होतात. आसन, ध्यान आणि व्यायामाने मेंदुमध्ये काही रसायन तयार होतात, ज्यामुळे मेंदुच्या पेशीत वाढ होते. तसेच त्या रसायनाने मनाची एकाग्रता, स्मृती आणि संवेदनावरील नियंत्रण वाढते. योगासन, ध्यान आणि व्यायामाने मेंदुचा आकारही वाढतो. फक्त अमिग्डलाची वाढ होत नाही. जो एक मेंदुचाच भाग असून त्याच्यामुळे भावना उत्तेजित होतात. बऱ्याच वेळा अमिग्डलाचा आकार लहान होतो. अमिग्डला जेंव्हा फाईट किंवा फ्लाईट (Fight or Flight) ची तणावपूर्ण स्थिती असते त्यावेळी तो उत्तेजित होतो. दैनंदिन नियमित शवासनच्या सरावाने मेंदुचे नूतनीकरण होते.
       चेतातंतू किंवा मज्जातंतूच्या टोकावर संवेदना वाहून नेण्यासाठी काही रसायन तयार होतात, त्यांना न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmitter) म्हणतात. हे रसायन
एका मज्जापेशींकडून (Neuron) दुसऱ्या मज्ज्यापेशींकडे संदेश पाठविण्याचे कार्य करते. त्यामध्ये सिरोटोनीन (Serotonin) आणि इन्डॉरफीन (Endorphin) नावाचे
रसायन मेंदूत तयार होते. ज्यामुळे उत्साही आणि आनंदाची भावना होते. आसनामुळे मेंदुमध्ये इन्डॉरफीन (Endorphin) तयार होते.
   शवासनामध्ये मेंदुमध्ये (Gamma-Aminobutyric acid, GABA) हे रसायन U अधिक प्रमाणात तयार होते जे एका मज्जापेशीतून दुसऱ्या मज्जापेशीत संदेश
पाठविण्यासाठी अटकाव करते. त्यांना Inhabitary Neurotransmitters म्हणतात. या रसायनामुळे जास्तीचे जाणारे संदेश व संवेदना कमी होतात. त्यामुळे संदेशांची
गर्दी कमी होते. त्यास चांगले वाटते. तसेच इन्डॉरफीन (Endorphin) आणि सिरोटॉनीन (Serotonin) मुळे आनंदी वाटते

Sharadyogvigyan.blogspot.com


योगविज्ञान शवासन भाग १

Sunday 7th June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
शवासन विज्ञान भाग १
     शवासन पाठीवर झोपून केले जाते.कारण शरीर जमिनीशी      समांतर झाल्याने गुरुवाकार्षणाचा परिणाम शरिरावर कमीत कमी होतो. ज्यावेळी मनुष्य बैठक स्थितीत किंवा दंड स्थितीत असतो, त्यावेळी ती स्थिती राखण्यासाठी त्याला गुरुत्वाकर्षणाविरुद्ध लढावे लागते. बैठक स्थितीत गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचत असते, तर पाठीचे स्नायु बैठक स्थितीत बसण्यास मदत करीत असतात, त्यामुळे शरिराचा तोलही सांभाळला जातो. यासाठी जे विशिष्ट स्नायुचे आकुंचन होत असते, त्यासाठी प्रति मिनीट साधारण चार उष्मांकाची (Calaries) गरज भासते. म्हणून बराच वेळ बसल्याने मनुष्य थकतो. ज्यावेळी मनुष्य आडवा होतो, त्यावेळी त्या पाठीच्या स्नायुना आता आकुंचन व्हावे लागत नाही व आडवे झाले की, उष्मांकाची गरज प्रति मिनीट कमी भासु लागते. तसेच जाणीवपूर्वक शरिरातील सर्व स्नायुंचे  शिथिलीकरण (Active Relaxation) केल्याने उष्णिकांची गरज आणखी कमी म्हणजे १-२ कॅलरीज प्रति मिनिट पूर्ण होऊ लागते. बी.एम.आर. (Basal Metabolic rate) ही कमी होतो. त्यामुळे मानसिक स्थिरता येते व श्वासावरील मनाची सजगता चांगली साधता येते. परिणामी इकडे तिकडे जाणारे विचार कमी होऊन मन शांत होऊ लागते.
       हृदयाचे स्पंदन आणि श्वास यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे जसे प्रति मिनिट श्वास संथ, मंद व लयबध्य होईल तसे नाडीचे (हृदयाचे) ठोके प्रति मिनिट कमी पडू लागतात.
       शवासनाने रक्तदाब नियंत्रित होतो. रक्तदाब वाढलेला असेल तर तो नैसर्गिक पध्दतीने कमी होऊ शकतो. साधारणपणे ८ ते १० मिनिट चांगल्या प्रकारे शवासन
करता आले तर श्वसनाचा वेग साधारण १५ ते २० प्रति मिनिट असतो, तो ८ ते १२ पर्यंत खाली येतो. नाडीचे ठोके ७० ते ९० पासून ५० ते ६० पर्यंत, तर रक्तदाब ५ ते १० मि.मि. मर्क्युरीने खाली येतो. त्यामुळे हृदयाला विश्रांती मिळते व शिथलीकरणाचा परिणाम जाणवू लागतो.
        शवासनाने मन शांत व प्रसन्न वाटते. कारण शवासनात ई.ई.जी. (EEG) काढला तर त्यामध्ये अल्फा मेंदू तरंग (Brain waves) आढळून येतात, हे अल्फा
मेंदू तरंग मानसिक शांती व मेंदूच्या प्रसन्नतेचे प्रतिक आहे. शवासनामुळे मन व मेंदू शांत शिथिल व तणावरहीत होतो.
       विज्ञानाने सिध्द झालेले आहे की, सततच्या मानसिक तणावामुळे रक्तदाब, हृदयविकार, पोटांचे विकार (Acidity, ulcerative Colitis) तसेच (Spondylosis, Diabetes, Migraine, Asthma) या सारखे आजार होतात. औषधाबरोबर मन शांतीची गरज असते. ती मनःशांती औषधाने मिळू शकत नाही. गुंगीच्या औषधाने (Sedative व Tranqultsers) मेंदू बधीर होतो, शांत होत नाही व  अशा औषधांचे दिर्घकालीन परिणाम वाईटच होतात. शवासनाने मन शांत होते. त्यामुळे अशा विविध तणाव निर्मित आजारामध्ये नियमित शवासन एक उपचार म्हणून उपयोगी पडू शकतो.
      तणावग्रस्त स्थितीत मेंदूला रक्ताची अधिक गरज असते. साधारणपणे मन ज्यावेळी शांत असते. त्यावेळी रक्ताची गरज २० टक्के असते. पण ज्यावेळी अति तणावाची स्थिती निर्माण होते त्यावेळी हीच मेंदूची रक्ताची गरज २५ ते ३० टक्क्यापर्यंत वाढते. हे मेंदूला जादा लागणारे रक्त मेंदू इतर अवयवाकडून काढून घेतो. विशेषतः जठर, मोठे आतडे, मणक्याभोवतीचे स्नायु यांचे रक्त मेंदूकडे वर्ग होते. त्यामुळे कांही अवयवांचा रक्त पुरवठा कमी होऊ शकतो. जर ही तणाव स्थिती अशीच वारंवार राहू लागली किंवा दिर्घकाळ राहिली तर त्या अवयवांची कार्यक्षमता कमी होऊ लागते आणि मग ऍसिडीटी, अल्सर, मानदुखी, पाठदुखी, रक्तदाब, मधुमेह यासारखे विकार होऊ लागतात.
       शवासनामध्ये आडवे झाल्यामुळे मेंदुचे कार्य मुळातच कमी झालेले असते व मन शांत झाल्यामुळे मेंदुला मिळणाऱ्या २० टक्के रक्ताची गरज भासत नाही. फक्त १२ ते १५ टक्के रक्त पुरेसे होते. तेव्हा हे उरलेले ५ ते ८ टक्के रक्त बाकी अवयवांना बोनस दिल्याप्रमाणे मिळू लागते. त्यामुळे बाकी अवयवांची कार्यक्षमता सुधारु लागते. म्हणून रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश, स्पाँडिलायसिस, मायग्रेन, मधुमेह या मानसिक तणावाशी निगडीत आजारामध्ये शवासनाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
     शवासनामुळे मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवता येतो. अप्रत्यक्षरित्या शवासनात आपण त्याचा अनुभव घेत असतो. शवासन अवस्था म्हणजे गाढ़शांततेचा (Feeling of deep silence) अनुभव आणि मृत्यू म्हणजे ही एक प्रकारची शांतता, परंतु कायमची.

Sharadyogvigyan.blogspot.com

योगविज्ञान ओंकार भाग १

Friday 5th June 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ओंकार विज्ञान भाग १
   योग साधनेत ओमकाराचे फार महत्व आहे. त्याच्या जपाने मनाची एकाग्रता साधन्यास व चित्तसमाधि अवस्थेत जाण्यास मदत होते. योग वशिष्ठ ग्रंथात म्हटलेले आहे की, मन व विचारांची गती आपण वेगळी करु शकत नाही. मात्र एकाची गती रोखली की, दुसऱ्याची म्हणजेच विचारांची गती रोखु शकतो. मन आणि प्राण यांचा फार जवळचा संबंध आहे. चित्तातील वृत्तीमुळे प्राणाला व पर्यायाने मनाला म्हणजेच विचारांना गती येते. प्राणाला नियंत्रित केले तर मनावरही नियंत्रण येते व विचारही थांबतात. प्राणाची गती विशिष्ठ श्वसनाने म्हणजेच प्राणायामाने रोखू शकतो. तद्वत् ॐकार जप केल्यानेही प्राणावर नियंत्रण आणू शकतो. म्हणजेच ऊँ चा उच्चार करणे हा देखील एक प्रकारचा प्राणायाणच आहे.
    ॐ कारावरील संशोधन : ॐ कार जपावर आजपर्यंत बरेच संशोधन झाले आहे. त्याचे निष्कर्ष असे आहेत की, अगदी खालच्या आवाजात (खर्जात) जप १० वेळा केला तर मन आतमध्ये वळते, शांत व एकाग्र होते. याच्या उलट जर ॐ चा उच्चार उच्च स्वरात केला तर मात्र लक्ष बाहेरच अधिक राहते व उत्तेजित अवस्थेत राहते. मेंदूचा आलेख, रक्तदाब, हृदयगती, त्वचेचा विद्युत प्रतिरोध यावरुन असे आढळले आहे की, 'ॐ' कार खालच्या आवाजात व 'म' कार लांबवून केल्याने परानुकंपी स्वायत्तमज्जा संस्थेचा प्रभाव वाढतो. म्हणूनच हृदयगती, रक्तदाब, श्वसनगती कमी होते. मात्र उच्चस्वरात १० वेळा ॐ म्हंटल्यास हृदयगती, श्वसनगती व जबड्यांच्या स्नायुंचे कार्य किंचित वाढते. उत्तेजना वाढते म्हणजे अनुकंपी स्वायत्त मज्जा संस्थेचा पगडा जास्त होतो. खालच्या आवाजात ॐ कार म्हंटल्याने मानसिक शांतीचा अनुभव जास्तीत जास्त मिळतो. अवर्णनीय आनंद व प्रसन्नता अंतर्मनास अनुभवास येते. रोज सकाळ संध्याकाळ २०-२० वेळा मध्यम आवाजात ॐ जप केल्याने नैराश्य (Depression) व चिंतारोग (Anxiety) कमी होते.  मानसिक स्थिरता, संतुलन  वाढते. स्मरणशक्ति, आकलन शक्ति वाढते. ॐ जप केल्याने मतिमंद मुलाची बुध्दी कुशाग्र होते.
          भारतातील दोन शास्त्रज्ञांनी अजय गुर्जर आणि सिध्दार्थ लढाके यांनी ओम् कार (Om Chanting) यावर संशोधन करुन २००८ मधे International Journal of Computer Science and Network Security  मधे एक पेपर लिहिला. त्या पेपरचे  नाव " Time Frequency Analysis of Chanting Sanskrit Divine Sound "Om" असे आहे. दोन्ही शास्त्रज्ञ Electronic Signal Processing मधील तज्ञ असून त्यांनी सांगितले की, ओंकार हा अध्यात्मिक मंत्र असून त्याच्या उच्चाराने मानसिक शांती
मिळते तसेच अनावश्यक विचार कमी होतात. त्यांनी सामान्य माणसाची ओम उच्चारणाच्या वेळी डिजिटल रेकॉर्डिक केली आणि नंतर काही दिवसांच्या  सरावा नंतर डिजिटल रेकॉर्डिंग केली. त्या दोन्हीमध्ये फरक दिसून आला. ओम् उच्चाराने मेंदूतील लहरी अल्फा लहरी प्रमाणे लहान होतात व त्यामुळे मानसिक शांतता मिळते.तसेच योगीमध्ये मानसिक स्थिरता, एकाग्रता , सजगता वाढते. हे सिद्ध झाले.

Sharadyogigyan.blogspot.com

Friday, 5 June 2020

योगविज्ञान भ्रामरी प्राणायाम भाग ४


Sunday, 12 April 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
भ्रामरी प्राणायाम भाग ४
   ब) विद्युत तरंग (Elecrical waves).
एकाच वेळी एक मज्जापेशी (Neuron) दुसऱ्या मज्जापेशिला विद्युत तरंगानी जोडली जाते व संवेदना पाठविल्या जातात,या तरंगाना मेंदू विद्युत लहरी किंवा Brain waves म्हणतात.
        मेंदुच्या वेगवेगळ्या स्थितिमध्ये ,जसे थकवा येणे, जागरुक असणे,राग येणे, आनंदी असणे, शांतचित्त असणे, उदासिन असणे तसेच मेंदूच्या वेगवेगळया रोगामध्ये मेंदुच्या वेगवेगळ्या विद्युत लहरी दिसून येतात. त्यास इ.इ.जी. (E.E.G.Electro Encephaogram) असे म्हणतात. ह्या लहरी हळू (Slow), मध्यम (Moderate). गतीमान (Fast)असू शकतात. व त्या Hertz (Cycles/sec.) या युनिटमध्ये मोजतात.ह्या लहरी E.E.G. मशीनद्वारे मोजता येतात.
       मेंदूत एकंदरीत सहा प्रकारचे विद्युत तरंग आढळून येतात. त्यामध्ये भ्रामरी प्राणायामामध्ये तीन प्रकारचे विद्युत तरंग मुख्यत्वेकरून आढळतात. ज्या अपेक्षित व
चांगले  परिणाम देतात. त्या अशा आहेत.
   १. डेल्टा तरंग (Delta waves) - (0.5 ते 3Htz) हे तरंग कमी वारंवारतेची असतात. ह्या लहरी ध्यानाच्या खोल (Deep Meditation) अवस्थेत व स्वप्नरहित
निद्रा (Dreamless Sleep) सुषुप्ती अवस्था यामध्ये आढळतात. बाहेरील कोणल्याच
गोष्टीची जाणीव राहात नाही. ह्या अवस्थेमध्ये पेशींची दुरुस्ती आणि वाढ (Healings & regeneration) चांगली होते. लहान मुलांना नेहमी गाढ झोपेची आवश्यकता असते, त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. भ्रामरी प्राणायामाच्या सततच्या व योग्य सरावाने ही
स्थिती प्राप्त करता येते.
    २.थिटा तरंग (Theta waves) - (3 ते 8 Htz) ह्या लहरी साधारण झोपेत आढळतात. खोल ध्यानाच्या अवस्थेतही ह्या लहरी आढळतात. या अवस्थेमध्ये ज्ञानेद्रियाचा बाहेरील जगाशी संबंध नसतो व तो स्वप्नावस्थेत असतो. बाहेरील जाणिवेच्या
बाहेर असतो. या लहरी शिथलीकरणामध्ये (Deep Relaxation), हिप्नॉसिस (Hypnosis) शांतपणे विचार करीत असताना, जेव्हा मूड चांगला असतो  व मन स्थिर असते व आनंदी  असताना आढळतात. भ्रामरी प्राणायामामध्ये ह्या लहरी दिसून येतात.
  ३ अल्फा तरंग (Alpha waves) - (8 ते 12 Hz) ह्या लहरी शांतपणे
विचार करताना, ध्यानाच्या काही अवस्थांमध्ये दिसतात. मेंदू पूर्ण विश्रांतीच्या अवस्थेत (Resting state of Brain) असतो त्यावेळी अल्फा तरंग दिसतात. ह्या अवस्थेमध्ये
मेंदूचा समन्वय (Mental Co-ordination) , मनःशांती (Clamness), जागरुकता (Alterness) मन व मेंदूचा समन्वय (Mind, Body Integration) व शिकण्याची पात्रता (Learning) ही वाढते. योगासन व प्राणायामात ह्या लहरी दिसून येतात.
भ्रामरी प्राणायामामध्ये निर्माण झालेल्या कंपनामुळे फुफ्फुसातील वायुकोशाच्या पातळ थरावर कंपन झाल्यामुळे आतील वायुच्या अणूमध्ये हालचाल होते. त्यामुळे
वायुकोषातील (Alveoli) हवा आणि रक्त, ऑक्सिजन (O2)  आणि कार्बन-डाय-ऑक्साईड
(CO2) यांची देवाण-घेवाण जलद होते.
     सन १९९३ मध्ये मुंगेर येथील हॉस्पिटलमध्ये बिहार योग विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ४४८ गर्भवती स्त्रियांवर एक अभ्यास केला. त्या सर्वाची चिकित्सा परिक्षण,आहार संबंधीत व भ्रामरी प्राणायामाच्या सर्वाना सारख्याच सूचना दिल्या. त्यापैकी ११२ गर्भवती स्त्रियांनी (साधारण २५%) गर्भावस्थामध्ये रोज १ ते २ वेळेस ५ ते १० मिनीटे
भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास केला. कंत्रोल ग्रुप व भ्रामरी प्राणायाम केलेल्या स्त्रियांचा ग्रुप यामध्ये खालील बदल दिसून आले.
गर्भपाताची समस्या ८% वरून २% वर आली. कालावधीपूर्व प्रसूतीचे प्रमाण ५% वरून २.६% वर आले. शस्त्रक्रियेचे प्रमाण ४% वरून १% वर आले. नवजात शिशूमध्ये ऑक्सिजन कमीचे प्रमाण १२% वरून ०% वर आले. नवजात शिशूचे वजन २८५० ग्रॅमच्या तुलनेत ३३२५ ग्रॅम भरले. भ्रामरी प्राणायामाने चिंता, तणाव कमी झाल्याचे
दिसून आले.
     भ्रामरी प्राणायामाचा परिणाम हायपोथेलेमस, पिनियल ग्रंथी व पियुषी अंतःस्त्रावी ग्रंथीवर होतो.
      १९५९ मध्ये अमेरिकेतील येल स्कूलमधील मेडीसिनचे डॉक्टर ए.बी. लर्नर ह्यांना त्वचेवरील मेलॅनोमा ह्या कॅन्सरचे कारण शोधताना असे आढळून आले की, हा
त्वचेचा कॅन्सर मेलॅटोनिनचे ( Melatonin Pigment) प्रमाण वाढल्याने होतो. पिनियल ग्रंथीपासून
मेलेंटोनिन हा संप्रेरक रात्रीच्या अंधारात तयार होतो व त्यामुळे आपणास झोप लागते. मेलेंटोनिनचे इंजेक्शन प्राण्यास दिले तर तो गाढ झोपी जातो. भ्रामरी प्राणायामाने पिनियल
ग्रंथीचे नियंत्रण होते.

Sharadyogvigyan.blogspot.com


योग विज्ञान भ्रामरी प्राणायाम भाग 3


Sunday, 12 April 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
          (कान,नाक,घसा तज्ञ)

भ्रामरी प्राणायाम भाग 3
भ्रामरी प्राणायाम मुख्यत्त्वे दोन मुलभूत तत्त्वांवर अवलंबून आहे.
१. नाद (आवाज, ध्वनी), २. कंपन (Vibration)
१. नाद - भ्रामरी प्राणायामात जो ध्वनी निघतो तो अनुक्रमे पूरकाच्या वेळी (नरभ्रमराप्रमाणे) निघणारा आवाज मृदू टाळू (Soft Palate) च्या कंपनामुळे निर्माण होतो व रेचकाच्या वेळी (मादी भ्रमरीप्रमाणे) निघणारा आवाज हा नाकाच्या मागे निघतो व तो ओंकारातील "म्" काराप्रमाणे असतो. पूरकाच्या वेळी निघणारा आवाज हा जास्त वारंवारतेचा (High Frequency) व तारेप्रमाणे असतो. अशा आवाजाचा परिणाम विशुद्धी व आज्ञा चक्राच्या सक्रियतेवर होतो. तसेच रेचकाच्या वेळी निघणारा आवाज हा कमी वारंवारतेचा (Low Frequency) जो "म्" काराप्रमाणे असतो. “म्" कार हा ओंकाराचा तिसरा भाग असून यास आत्म्याची प्राज्ञ अवस्था असे संबोधले असून ही एक सुषुप्तीच स्थिती असून यामध्ये मनास शांत वाटते. हा एक नादानुसंधानाचा भाग असून याचा अष्ट चक्रांवर चांगला परिणाम होतो.वेगवेगळ्या आवाजांचा (Frequencies) वेगवेगळ्या चक्रावर परिणाम होतो. जसे ड्रमच्या आवाजाचा परिणाम मुलाधार चक्रावर, हवेचे वाद्य , जसे बासरी, शहनाई यांचा परिणाम स्वाधिष्ठान ते मणिपूर चक्रावर होतो, मेटॅलिक साऊंड (धातूवाद्य) जसे टाळ,
चिपळ्या यांचा परिणाम मणिपूर ते अनाहत चक्रावर होतो. तंतूवाद्य जसे विणा, सतार यांचा परिणाम अनाहत चक्रावर तर घंटी किंवा पाण्याच्या आवाजाचा परिणाम विशुद्धी व आज्ञा चक्रावर होतो. सर्वच वाद्यांचा परिणाम सहस्त्रार चक्रावर होतो. फार मोठ्या कर्कश्य आवाजाचा उदा. डि.जे., बाँब यांचा परिणाम विकृत होऊ शकतो.
२. कंपन (Vibration) - भ्रामरी प्राणायामामध्ये जे कंपन होते त्याचा मेंदूवर दोन प्रकारे परिणाम होतो.
अ) रासायनिक (Chemical), ब) विद्युत तरंग (Electrical Waves)
अ) रासायनिक परिणाम - हे रसायन मेंदूमध्ये कार्यरत असून ते दोन मज्जापेशी (Neurons) मध्ये संदेश वहनाचे कार्य करतात. यांना न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmitter) असे म्हणतात. भ्रामरी प्राणायामातील कंपनामुळे काही न्यूरोट्रान्समीटर मध्ये वाढ होते. जसे डोपामिन (Dopamine), एन्डॉर्फीन (Endorphin), सिरोटोनिन
(Serotonin), गॅबा (GABA -Gama amino butyric acid) इत्यादी.
     डोपामिन (Dopomine) मुळे साधकास आल्हाददायक, उत्साहवर्धक व आनंददायक वाटते. एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर, मुका घेतल्यानंतर, लॉटरी जिंकल्यानंतर किंवा स्तूती ऐकल्यानंतर जसे वाटते तसे रक्तातील डोपामिनचे प्रमाण वाढल्यानंतर वाटते. या रसायनाला Reward Molecule असेही म्हटले आहे.
    एन्डॉर्फीन (Endorphin) - हे रसायन मेंदूमध्ये जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर किंवा एरोबीक एक्सरसाईज (Aerobic Exercise ) केल्यानंतर जास्त प्रमाणात तयार होतो. भ्रामरी प्राणायामातही ह्या रसायनाची वाढ होते. हे रसायन पियुषी ग्रंथी व हायपोथैलेसमधून तयार होते.त्यामुळे आनंद वाटतो.म्हणून यास आनंद रसायन  (Bliss Molecule) असे ही म्हणतात. हे रसायन नैसर्गिक वेदनाशामक म्हणूनही काम करते. एन्डॉर्फीनमुळे वजनही कमी होते. कारण ते भूकेवर नियंत्रण आणते व सात्विक
अन्न खाण्यासाठी इच्छा निर्माण करते. जेव्हा एन्डॉर्फीनची शरीरात कमतरता असते, त्यावेळी उदासिनता, चिंता, झोपेची
समस्या, व्यसनाधिनता. मूड जाणे, भावनावश वर्तन करणे, स्वत:ला गौण समजणे, असे विकार होतात. भ्रामरी प्राणायामामध्ये एन्डॉर्फीनची वाढ होते, त्यामुळे वरील सर्व
लक्षणे दूर होतात व जीवनात रस निर्माण होतो.
          सिरोटोनिन (Serotonin) - याचे रासायनिक नाव (5 HT - Hydroxy Tryptamine) असून यास (Confidence Molecule) असेही म्हणतात. या रसायनामुळे मन लावून, आत्मविश्वासाने, धडाडीने काम पूर्ण करून दाखविण्याची जिद्द त्याच्यामध्ये तयार होते. त्यामुळे उदासिनता कमी होते. तसेच सिरोटोनिनमुळे न्यूरोजेनेसिस (Neorogenesis) म्हणजे नवीन मज्जापेशींची वाढ होते. भ्रामरी प्राणायाम केल्याने ऑपरेशन नंतर नैसर्गिकरित्या जखम लवकर भरून येते. शरीरात दुरुस्ती (Healing)
होण्यास मदत होते.
      गॅबा (GABA- Gama amino butyric acid) - हे मज्जापेशींचे काम कमी करते. दोन पेशींमधील संवेदनांचे समतोल राखणे. त्यामुळे शांतता, शितलता व स्थिरतेचा
परिणाम दिसून येतो. गॅबाचे प्रमाण योगासनाने, ध्यानाने व शितलीकरणाने वाढविता येते. भ्रामरी प्राणायामा मध्येही मन याच्यामुळेच शांत होते. याच्यामुळे उदासिनता दूर होते,
शांत झोप लागते, स्मरणशक्ती वाढते तसेच पार्कीनसन्स रोगामध्येही भ्रामरी प्राणायामाचा फायदा होतो.

Sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान भ्रामरी प्राणायाम भाग २

Sunday 31 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
भ्रामरी प्राणायाम भाग २
आपण १२५ Hz ते ६००० Htz वारंवारतेचे (Frequencies) आवाज ऐकू शकतो. परंतु १२५Htz पेक्षा कमी व ६००० Htz पेक्षा जास्त वारंवारतेच्या आवाजांचेही परिणाम आपल्या स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारण शरीरावर होत असतात.
षटचक्रावरील पाकळ्यांवर जी वर्णाक्षरे आहेत त्या वर्णाक्षरांच्या उच्चारणाने त्या चक्रांच्या पाकळ्यांवर परिणाम होऊन त्या उत्तेजित होतात. जसे अनेक मंत्रांचा परिणाम
चक्रांवर होतो. देवनागरी लिपीची संस्कृतमध्ये एकूण ५० वर्णाक्षरे आहेत. आणि ६ चक्रांच्या एकूण ५० पाकळ्या आहेत. त्या त्या वर्णाक्षरांचा त्या त्या पाकळीशी संबंध येतो व ते चक्र उद्दिपित होते.
       ध्वनी उर्जा ही इलेक्ट्रीक (Electric) आणि इलेक्ट्रोमॅग्नेटीक (Electromagnetic) उर्जेमध्ये बदलू शकते. जसे रिमोटद्वारे टेप लावणे, टि.व्ही. चालू-बंद करणे,
कार चालविणे. ह्यावेळी ध्वनी हा अल्ट्रासोनिक (Ultra sonic wave) मध्ये बदलतो. ध्वनी हा मंत्राचा आणि भ्रामरी प्राणायामाचा पाया असून त्यातून अद्भूत उर्जा निर्माण होते.
       नाकातून घुमणाऱ्या आवाजामुळे (मकार) शरीरात नायट्रीक ऑक्साईडची (Nitric Oxide) वाढ होते. बीज मंत्रावरील अनुस्वारांचा परिणाम जास्त होतो म्हणून ती
प्रभावशाली असतात. या नायट्रीक ऑक्साईडमुळे शरीरातील ५० ट्रिलीयन (Trillion -१ वर १२ शून्य) इतक्या पेशी एकमेकांना संवेदनामार्फत जोडल्या जातात. त्यामुळे पूर्ण
शरीराला संवेदना पोहोचते. हे फक्त नाकाने श्वास घेतल्यास (Nasal breathing) शक्य असून नायट्रीक ऑक्साईड सायनसेस (Sinuses) मध्ये तयार होते.
        भ्रामरी प्राणायामाने परानुकंपा स्वायत्त मज्जासंस्थेचा परिणाम वाढतो. भ्रामरी प्राणायामात छातीवरील दाब (Intrathorasic Pressure) वाढल्याने कॅरॉटीड (Carotid) सायनस मधील बॅरोरिसेप्टर (Baroreceptor) वर परिणाम होऊन रक्तदाब सामान्य होतो.
         संगीतातील किंवा बाह्य ध्वनीमुळे होणाऱ्या चक्रावरील परिणामापेक्षा कंठस्थ ध्वनीचा परिणाम चक्रावर जास्त होतो. जसे भ्रामरी, उज्जायी, ओंकार उच्चारण, मंत्र उच्चारण
वगैरे.
     ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. जसे घन, द्रव, वायूरुप. या माध्यमाशिवाय आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
जाऊ शकत नाही. आपल्या शरीरात ७०% पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे आपले शरीर ध्वनी कंपनाचे चांगले वाहक आहे. त्यामुळे भ्रामरी प्राणायामात निर्माण झालेल्या ध्वनी
कंपनांचे, संवेदनांचे प्रक्षेपण सर्व शरीरभर पसरते.

Sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान भ्रामरी प्राणायाम भाग १

Saturday 30 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
भ्रामरी प्राणायाम भाग १
वैज्ञानिक तथ्य -
   एकदा सैनिकांचा एक दल कदमताल (मार्च पास्ट) करीत पूलावरून गेला.मा र्च पास्ट पूलावरून पुढे जाताच पूल खाली पडला. त्यावेळी जोराचा वारा किंवा नदीला पूर असे काहीच नव्हते. यावरून एक निष्कर्ष असा निघाला की, जेव्हा दोन किंवा अधिक ध्वनी निर्माण होतात त्यावेळी त्यांच्या ध्वनी तरंगाची आवृत्ती (Frequency) जेव्हा एकरूप होतात त्यावेळी त्याचा परिणाम नवीन उच्च ध्वनी तरंग निर्माण होण्यामध्ये होतो,व त्या नवीन उच्च ध्वनी तरंगाचे परिणाम हे काही पटीत असतात. म्हणूनच सैनिकांच्या पायाच्या कदमतालाने ध्वनीची तरंगे एकरुप झाली व जास्त शक्तिशाली ध्वनीतरंग तयार होऊन पूल खाली पडला. आणि हेच मुलभूत तत्त्व भ्रामरी प्राणायामात अनुभवास येते. एखादा खूप जड पदार्थ दोरीने अनेक लोकांकडून ओढताना एका तालात आवाज करीत तो ओढला जातो. ठराविक वेळेला ठराविक जोर (Force) लावला जातो त्यामुळे सर्वांची शक्ती एकवटल्यामुळे ती जड वस्तू जागेवरून हलते. जर तीच वस्तू प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी ओढली तर ती जागेवरून हलणारच नाही. येथे शक्तीच्या अनुरुपतेचा परिणाम दिसून येतो.
       भ्रामरी प्राणायामामध्ये ध्वनी तरंगाच्या अनुरुपतेचा परिणाम दिसून येतो. संगीतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वाद्यांमधून ध्वनी तरंग निघतात. ते जेव्हा अनुरुप (एकरुप) होतात त्यावेळी निरनिराळ्या वाद्यांमधून निघालेले आवाजही कानास सुश्राव्य वाटतात. माणूस ते ऐकून तल्लीन होतो, शांत होतो, आनंदी होतो. हे ध्वनी तरंगाचे शरीरावरील, मनावरील व मेंदूवरील होणारे परिणाम आहेत. काही ध्वनी स्वरांनी अंगावर
शहारे ही येतात.भ्रामरी प्राणायामामध्ये श्वास आणि प्रश्वासाच्या वेळी जेव्हा मधूर आवाज काढला जातो त्यावेळी ध्वनीची आवृत्ती (Frequency) शरीराच्या स्वाभाविक आवृत्तीशी एकरुप होते व त्याचे अनुरुप गुणात्मक परिणाम दिसून येतात. बरेच साधक ध्वनीच्या तीव्रतेचा
आणि दीर्घतेचा अभ्यास करतात. परंतु त्याचा लय, मधुरता व अनुनाद याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या प्राणायामामध्ये ज्या त्रिमित्तिय सजगतेचा विकास व्हावा तेवढा होत
नाही व ती न्यूयतम राहते.
        आपणांस रेचकाच्या वेळीच आवाज काढण्याचा सराव असतो. रेचकाच्या वेळी छातीतील (फुफ्फुसातील) हवेचा दाब जास्त असतो त्यावेळी श्वास सोडताना स्वरतंतू (Vocal cords) कंप पावतात आणि आपण बोलू शकतो किंवा स्वर काढू शकतो. परंतु पूरक करतेवेळी आपणास आवाज काढण्याची सवय नसते त्यामुळे पूरकाच्या वेळी
नरभ्रमरासारखा आवाज नवीन साधकांना अवघड जातो. त्यासाठी स्वरयंत्र (Larynx), घसा, नाकाची पोकळी येथे आकुंचन निर्माण करून व फुप्फुसामध्ये ऋणात्मक (NegativePressure) दाव निर्माण करून हवा फुप्फुसामध्ये ओढून घ्यावी लागते. त्यावेळी स्वरतंतूचे
कंपन होऊन ध्वनी निर्माण होतो. सततच्या सरावाने इच्छेनुसार ध्यनीच्या कंपनामध्ये
परिवर्तन घडवून आणता येते, जेणेकरून तो आवाज लयबद्ध, मधूर व दीर्घकाळ होईल.
        हे सर्व ज्ञात आहे की, मनुष्य जातीमध्ये स्त्री (नारी) स्वर हा पुरुष स्वरापेक्षा जास्त तारयुक्त किंवा उच्च आवृत्तीचा (High Frequency) आणि मधूर असतो. परंतु
पक्षी, किटक, भुंगा यामध्ये अगदी विरुद्ध आहे. म्हणजेच नर भुंग्याचा (भ्रमर) आवाज उच्च तारयुक्त किंवा अधिक आवृत्तीचा (High Frequency) म्हणजेच मनोहर व मधूर
असतो, तर मादी मुंग्याचा (भ्रमरी) आवाज हा कमी आवृत्तीचा {Lown Frequency or (Low Pitch) असतो. जसा भ्रामरी प्राणायामात रेषकाच्या वेळी आपला आवाज निघतो.
आवाज, नाद, ध्वनी यांचा शरीर, मेंदू व मनावर परिणाम होतो. संगीताने व स्वनिर्मित ध्वनीने मेंदूच्या लहरीमध्ये बदल घडवून आणता येतात. ज्या ध्वनीमुळे मेंदूमध्ये 8-13 Htz मेंदूतरंग निर्माण होतात त्यांना अल्फा तरंग म्हणतात. त्यावेळी शांतता संवेदनाचा अनुभव येतो. दीर्घ व मंद आवाजातील संगीत ऐकताना मनुष्य खोल आणि मंद श्वासाचा अनुभव घेतो आणि मन शांत होते. हृदयाची स्पंदने संगीताच्या विविधतेस प्रतिसाद देतात. डी.जे.च्या कर्णकर्कश आवाजाने, छातीत धडधड होते, कान बधीर होतात, डोके दुखते, मळमळ होते, उलटीही होऊ शकते.

Sharad yog vigyan.blogspot.com

Thursday, 4 June 2020

योग विज्ञान। ध्यान भाग ९

Friday 29 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान  भाग ९
हृदयरोग मुक्तीसाठी ध्यान :
    हृदयरोग हा केवळ रक्तवाहिन्यांचा आजार असतो, असे नसून भावनांचा परिणाम सर्वात जास्त हृदयावर होतो. हृदयरोग बरा करण्यासाठी अहंकार कमी करणे आवश्यक आहे. कारण अहंकार हा हृदयरोगाचे एक कारण आहे, हे संशोधनात लक्षात आले आहे. कॅलिफोर्निया विद्यापिठाचे डॉ.लेरी शेरविट्स आणि ड्यूक विद्यापिठाचे डॉ. रेडफोर्ड विलियम्स यांनी तेरा हजार माणसांचा नऊ वर्षे अभ्यास केला. यामध्ये त्यांना असे आढळले की, बोलताना जे स्वतःचा  मोठेपणा सतत सांगत असतात, अशांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. तसेच इतरांशी शत्रुत्व करण्याची ज्यांना सवय असते,अशांना हृदयरोग अधिक प्रमाणात होतो.
       डॉ.डीन ऑनिश यांनी कल्पनादर्शन ध्यानाचा दोन प्रकाराने विशेष उपयोग केला.
  १) पहिले डायरेक्ट कल्पनादर्शन ध्यान,
  २) दुसरे रिसेप्टिक कल्पनादर्शन ध्यान,
      भितीदायक प्रसंगाचे ध्यान किंवा केवळ स्मरण केले तरी देखील हृदयाकडील रक्तपुरवठा कमी होतो, हे संशोधनातून दिसले आहे. त्याचप्रमाणे अनंददायी प्रसंगाचे
ध्यान केल्याने आपण शरीर-मनातील युद्धस्थिती बदलून शांतता स्थिती आणू शकतो, मानसिक तणाव कमी करू शकतो. हृदयाकडील रक्तपुरवठा वाढवू शकतो असा विश्वास संशोधकांना वाटू लागला.
    पहिल्या डायरेक्ट कल्पनादर्शन ध्यानामध्ये (Direct Visualization) निरोगी हृदयाचे कल्पनाचित्र बंद डोळ्यांनी पाहायचे, हृदयामध्ये नवीन रक्तवाहिन्या तयार होत आहेत हे पाहायचे, रक्ताभिसरणा मधील अडथळे कमी कमी होत आहेत, त्यामधून रक्त योग्यरितीने, कुठेही न अडता वहात आहे असे ध्यान करायचे. काही रुग्ण श्वासाबरोबर पांढरा प्रकाश फुफ्फुसात आणि तेथून हृदयाच्या रक्तवाहिन्यात जाऊन तेथील अडथळेजाळत आहे आणि प्रश्वासाबरोबर त्या अडथळ्यांचा कचरा शरीराबाहेर जात आहे
असे दृष्य पाहू लागले.
      दुसऱ्या प्रकारच्या रिसेप्टिव्ह कल्पनादर्शन ध्यानामध्ये (Receptive Visualization) शरीर शिथिल करून शांत बसायचे आणि डोळे बंद करून आपण एखाद्या रम्य ठिकाणी आहोत अशी कल्पना करायची, पंचज्ञानेंद्रियांनी तसे अनुभवायचे आणि तुमचे हृदय तुम्हाला भेटत आहे अशी कल्पना करायची. तसे केल्यानंतर जे काही चित्र दिसेल किंवा जसा आवाज ऐकू येइल त्याच्याशी संवाद साधायचा. त्याने
आयुष्यभर जी सेवा केली आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, प्रेम व्यक्त्त करायचे आणि पूर्णतः निरोगी होण्यासाठी काय करायला हवे ,असा प्रश्न हृदयालच विचारायचा ,तिचे आभार मानायचे .डॉ अर्निश यांचा असा अनुभव आहे की,अश्या ध्यानाने आपण आपल्या अंतःर्मनाशी संवाद साधू शकतो.या ध्यानात जे रुग्ण असभागी झाले त्यांचा हृदय रोग बरा झालाच, शिवाय ते अधिक आनंदी,समाधानी आणि उत्साही झाले.डॉ डीन अर्निश यांना हेच अपेक्षित होते.

Sharad yog vigyan.blogspot.com

योग विज्ञान ध्यान भाग ८

Tuesday 26 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान  भाग ८
मेंदूलहरी आणि ध्यान :
मानवी मेंदूमध्ये अब्जावधी मेंदूपेशी म्हणजे न्यूरॉन
असतात. एक तिच्या शाखांच्या माध्यमातून दुसऱ्या पेशीशी जोडलेली असते.या पेशीमधून विद्यूतधारा वाहत असते.पायाला काटा टोचताक्षणी मेंदूला ते समजते आणि हात तो काटा काढायला जातो. हे सर्व या पेशींमधून वाहणाऱ्या विद्यूतधारांमुळेच घडते. ही धारा सलग नसते. सलग धारा काही अंतरावर क्षीण होऊ शकते. तसे होऊनये म्हणून दोन मेंदूपेशींच्या मध्ये सूक्ष्म फट असते. त्या मधल्या जागेत मेंदू रसायने म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर असतात. ते मागील पेशीतील संदेश पुढील पेशींपर्यंत नेतात.अशा प्रकारे संदेश वाहन होते.
       आपल्या वैचारिक मेंदूतील विद्युतधारा, त्यांची वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मोजता येते. त्यांचा आलेख काढता येतो. या आलेखालाच इलेक्ट्रोएनसेफेलो ग्राफ (EEG) म्हणतात. या आलेखावरून मेंदूतील लहरींचे वारंवारते (फ्रिक्वेन्सी) वरुन पाच प्रकार पडतात. सर्वात संथ लहरी, डेल्टा लहरी (0 ते 4 Hz) या गाढ झोपेत असताना आढळतात. डेल्टापेक्षा गतिमान थिटालहरी (4 ते 8 Hz) या झोपेच्या काळात असतात किंवा नवीन कल्पना सुचताना आढळतात. अल्फा लहरी (8 ते 12 Hz) च्या जेव्हा आपण डोळे मिटून शांत बसतो त्यावेळी प्रमाण वाढते. जेव्हा मनात पुनःपुन्हा तेच
विचार येत असतात आणि तो बेचैन होतो त्यावेळी त्याच्या मेंदूत बीटा लहरी (12 ते 40 Hz.) जास्त प्रमाणात असतात. तो शांत स्थितीत राहू शकत नाही. समस्येवर उपाय शोधत असतानाही मेंदूत बीटा लहरी असतात. गॅमा लहरी
 (40 ते100 Hz) ह्या अती वेगवान असतात. जागृतावस्थेत तन्मय  होवून शिकत असताना तसेच स्वप्नावस्थेत ह्या गॅमा लहरी जास्त असतात. ह्यावेळी माणूस उत्तेजित आणि उत्साही
असतो, पण अती झाल्यास अस्वस्थतेचे लक्षण असू शकते. या लहरी मेंदूच्या थैलॅमस या भागात निर्माण होतात व सर्व मेंदूत पसरतात.
       आपल्या सजगतेचे मुख्य केंद्र थैलेमस मध्ये असते. तेथे अतिशय अल्प इजा झाल्यास माणूस सजग राहू शकत नाही. तो कोमामध्ये जातो. सजगला आणि तन्मयता असतांना थेलेमसमधून मेंदूच्या सर्व भागात वेगवान लहरी पसरतात. म्हणून प्रत्येक योग क्रिया सजगतेने केल्यामुळे मेंदूवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योगामध्ये सजगतेला जास्त महत्त्व दिले जाते.
       ध्यानामुळे अल्फा लहरी वाढतात आणि शांतता स्थिती निर्माण होते. आणि हे तणाव व्यवस्थापनाचे उत्तम साधन होऊ शकते.
        ध्यान हे फक्त साधू आणि योगी यांनीच करावे असे नसून,सर्व सामान्य संसारी माणसांनीही ध्यान करायला हवे. सर्वसामान्य माणसाने आयुष्य अधिक आनंदी आणि प्रभावी करण्याचे हे एक साधन आहे. हे ध्यान शिकण्यासाठी कोणत्याही देवांवर किंवा ग्रंथावर श्रद्धा आवश्यक नसून, नास्तिक किंवा अज्ञेयवादी देखील हे ध्यान करू शकतात. भावातीत ध्यान (करुणाध्यान) हे आयुष्य जगण्याची कला शिकवते. ह्या फ़क्त ध्यानामुळे सजगता वाढते, आपला आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो, हे समजते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहता येते आणि तसे राहिले तरच सकारात्मक दृष्टीकोन कायम राहतो आणि आपण करीत असलेले काम अधिक प्रभावी होते. ध्यानाचे धडे शाळेतील विद्यार्थ्यांनाही देण्याची गरज आहे. ज्यामुळे त्यांची एकाग्रता, सर्जनशीलता, ग्रहणक्षमता वाढून परिक्षेतील गुण वाढतील. तसेच विद्यार्थ्यांचे भावनिक संतुलन चांगले राहील. त्यांच्यातील तणाव, आपापसातील भांडणे आणि चंचलता कमी होईल. ध्यानाविषयीचे गैरसमज आणि पूर्वग्रह दूर करून त्याचा अभ्यास शाळा-कॉलेजमध्ये सुरू करायला हवा. जे की एक मनाच्याविकासाचे साधन आहे .

sharadyogvigyan.blogspot.com




योग विज्ञान ध्यान भाग ५

Wednesday. 27. May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान भाग ५ 
सजगता ध्यान : (साक्षी ध्यान. Open Unfocused Meditation) :
     हे चवथ्या प्रकारचे व महत्वाचे ध्यान आहे ते म्हणजे साक्षी ध्यान, स्वतःच्या शरीराकडे व मनाकडे साक्षी भावाने किंवा तटस्थपणे पहायचे. अध्यात्मामध्ये हे साक्षी ध्यान सांगितले आहे. हे साक्षी ध्यान आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आणि आवश्यक आहे असे आजचे मानसशास्त्र सांगते, आजचे न्यरोसायन्त असे म्हणते की, साक्षी भाव हा मानवाच्या मेंदूचे एक उपजत कार्य आहे. हा साक्षी भाव विकसिल करावा लागतो. ज्याप्रमाणे आपल्या फोनमधे अनेक कार्य (Functions) असतात पण आपणांस ते सक्रिय (ऍक्ट्विट)  करावे लागतात. ते आत सक्रिय करण्यासाठी जे करावे लागते ते साक्षी ध्यान किंवा सजगता ध्यान, या ध्यानामध्ये स्वत:च्या शरीरामध्ये जे काही होते आहे ते जाणायचे, परंतु त्यास प्रतिक्रिया करायची नाही. परतु आपल्या इच्छेविरुध्द किवा मनाविरुध्द आपला भावनिक मेंदू जो मेंदूच्या लिम्बीक सिस्टीममध्ये असतो. तो आपल्या नकळत प्रतिक्रिया देत असतो. मेंदूतील लिम्बीक सिस्टीम हा भावनिक मेंदू किवा Emotional brain आहे. आपल्या भावनांचे उत्तेजन,सक्रीयता किंवा नियंत्रण या भागामधे केले जाते. तसेच मोठ्या मेंदूमध्ये सर्वात पुढचा भाग असतो त्यास prefrontal cortex म्हणतात. ज्यास वैचारिक मेंदू म्हंटले जाते.
        साक्षी ध्यानामधे भावनिक मेंदू आणि prefrontal cortex ना दिलेले एक प्रशिक्षण आहे. हे ध्यान किंवा हे प्रशिक्षण यासाठी आवश्यक आहे की, भावनिक मेंदू हा सतत प्रतिक्रिया देत असतो आणि भावनिक मेंदूची प्रतिक्रिया जेंव्हा अधिक होते त्यावेळी त्याचा परिणाम म्हणून आपणास राग येतो, चिंता वाटते, वाईट वाटते.आजचे संशोधन असे सांगते की, ज्यावेळी अति राग आलेला असतो, रागाच्या भरात क्रिया करत असतो त्यावेळी मेंदूचा स्कॅन केला तर हा केवळ भावनिक मेंदूच काम करत असतो व prefrontal cortex शांत असतो. जेंव्हा भावनिक मेंदू जास्त उत्तेजित होतो त्यावेळी भावना उफाळून येतात व त्यास सैराट भावना म्हणतात. सैराट भावना म्हणजे मनात भावना आली की, लगेच कृती करणे. जी चुकीचीही असू शकते. ही सैराट कृती जर कमी करावयाची असेल तर ह्या भावनिक मेंदूची प्रतिक्रीया करण्याची सवय कमी करण्यास हवी. आणि prefrontal cortex ला अधिक सजग, अधिक सक्रिय करावयास हवे. ज्या क्रियेमधे हे केले जाते ते म्हणजे साक्षी ध्यान.
       हे साक्षी ध्यान करतांना जर मेंदूचे स्कॅन केले तर लक्षात येईल की, हा भावनिक मेंदू शांत झालेला आहे आणि prefrontal cortex मध्ये सक्रियता आहे. आणि आताचे न्यूरो सायन्स असे सांगते की, एखाद्याचे हे साक्षी ध्यान रोज २० मिनीटे प्रमाणे २ महिने केले तर मेंदूत रचनात्मक बदल दिसून येतात. भावनिक मेंदूचा आकार जर काहींमधे वाढलेला असेल तर तो आकार कमी होतो आणि  prefrontal cortex चा आकार वाढतो व तेथे नवीन पेशींची वाढ होते. ही एक महत्वाची बाब लक्षात आली असून कोणतेही औषध किंवा रसायन न घेता केवळ मनाला ठराविक स्थितीमधे ठेवून मेंदूत रचनात्मक बदल करता येतो. भावनिक मेंदूची सक्रियता कमी होते आणि prefrontal cortex किंवा वैचारिक मेंदूची सक्रीयता वाढते.
         भावनिक मेंदूची सक्रीयता कमी करुन म्हणजेच सैराट निर्णय घेवून काम करण्यापेक्षा स्वतःला शांत ठेवून जे काही करायचे ते योग्य निर्णय घेवून करायचे असेल तर या prefrontal cortex ला जास्त सक्रीय करायला हवं.
        वैचारिक मेंदूला (prefrontal cortex) ला सक्रीय करण्यासाठी ७ ते १० मिनीटे शरीराची हालचाल होऊ द्यायची नाही आणि असे जे आपण ठरवतो ते prefrontai cortex मुळे ठरवतो. परंतु न कळत जी हालचाल होते, जसे एखाद्या ठिकाणी खाजवणे ही हालचाल लिम्बिक सिस्टीम मधील ऍमिग्डला (भावनिक मेंदू) हा prefrontal cortex ला न समजताच ती हालचाल करुन घेते. म्हणून prefrontal cortex ला सक्रीय होण्यासाठी जागृत रहाणे आवश्यक आहे. आपण कुठलीही हालचाल नकळतपणे करणार नाही याकडे लक्ष द्यायचे. म्हणजेच खाज वगैरे आली तर ती फक्त जाणायची, त्यास प्रतिक्रिया द्यायची नाही. ती खाज कमी होते की जास्त होते ते फक्त उत्सुकतेने पहायचे. मग ते खाज असेल, दुखत असेल, जळजळ असेल, धडधड असेल, टोचत असेल, काहीही होत असेल. शरीरात जे जे काही होत असेल ते ते जाणायचे आणि त्याचा स्विकार करायचा, तेही साक्षी भावाने. कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. अशा ध्यानामधे आपण जे काही जाणतो आणि त्याचा स्विकार करतो म्हणजे ज्यावेळी जाणतो त्यावेळी prefrontal cortex ला काम देत असतो आणि स्विकार करतो. त्यावेळी एमीग्डाला (भावनिक मेंदू) चे काम करत असतो. भावनिक मेंदूला शब्दानी सांगणे शक्य नाही. कारण तो सतत संवेदनाच्याच प्रती जागरुक असतो. तो भावनिक मेंदू सतत जागृत असतो. शरीरात काय होते आहे त्याबद्दल, म्हणून आपण राग कमी करायला हवा, माझे ब्लड प्रेशर कमी करायला हवे असे म्हणून उपयोग नाही. कारण ते भावनिक मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून ह्या मेंदूपर्यंत पोहोचायचे असेल तर साक्षी ध्यान (सजगता ध्यान) करणे आवश्यक आहे.)
          सजगता ध्यानामध्ये श्वासाची जाणीव वाढविण्याचा अभ्यास करायचा. श्वास म्हणजे नाकातून हवा आत जाते आणि बाहेर पडते. त्यावेळी तिचा स्पर्श नाकाच्या प्रवेशव्दाराशी होतच असतो, आपण बहिर्मुखी असल्याने नेहमी तो स्पर्श जाणवत नाही. त्यासाठी शांत बसायचे आणि आपले मन वरचा ओठ आणि नाकाचे प्रवेशव्दार येथे एकाग्र करुन तो स्पर्श जाणायचा. श्वास रोखायचा नाही किंवा मुद्दाम जोरात घ्यायचा नाही. नैसर्गिक श्वास कोणत्या नाकपुडीतून आत जातो, कोणत्या बाजूने बाहेर पडतो हे कोणतीही प्रतिक्रिया न देता जाणत राहायचे.
      वैद्यकीय क्षेत्रातील मुख्य प्रवाहाने ध्यान चिकित्सेला मान्यता दिली आहे.अमेरिकन सरकारने ह्या ध्यानाचा उपयोग आपल्या सैनिकासाठी सुरु केला आहे.सैनिकानी दिवसभरात फक्त तेरा मिनिटे सजगता ध्यान केले तर त्यांची एकाग्र होण्याची क्षमता वाढते असे डॉ झा यानी दाखवून दिले आहे.सजगता ध्यान हे एक प्रकारे मानसोपचारच आहे.

Sharad yog vigyan.blogspot.com

योग विज्ञान ध्यान भाग ६

Wednesday 27 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान भाग ६ 
ध्यान आणि भावना
 मानवाच्या मेंदूतील ब्रेनस्टेम् (Brain stem) आणि मेड्यूला (medulla) म्हणजे हा जैविक मेंदू असून तो सर्व अनैश्विक शरीर कियाचे नियंत्रण करत असतो. त्याला प्रेम वगैरे भावना समजत नाहीत. मेंदूतील लिंम्बिक सिस्टिम नावाच्या भागात या गुंतागुंतीच्या भावनांचे नियंत्रण होते. कुत्रा, मांजर, बैल इत्यादी प्राणी आपल्या मालकावर प्रेम करतात, कारण त्यांच्यामधेही हा भावनिक मेंदू असतो. सेरेब्रल कॉर्टेक्स (Cerebral Cortex) हा मोठ्या मेंदूचा भाग वैचारिक मेंदू म्हणता येईल. तो माणसाप्रमाणेच गोरिला, चिंपांझी या सारख्या अधिक उत्क्रांत झालेल्या  माकडांच्या मेंदुलाही असतो. परंतु प्रिफ्रंटल कॉर्टेक्स (Prefrontal Cortex) नावाचा मेंदूचा सर्वात पुढे असणारा भाग हा मानवामध्येच असतो. मानवाच्या प्रगतीचे कारण म्हणजे हा मानवी मेंदूचा वैशिष्टपूर्ण भागच आहे.
          ह्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची कार्ये म्हणजे शरीराचे नियंत्रण, परिसराचे ज्ञान, भावनांचे व्यवस्थापन, चिंतेची जाणीव, प्रतिसाद देण्याची क्षमता, वेळेच भान, दुसऱ्यांच्या भावना समजण्याची क्षमता,नैतिकतेची जाणीव आणि अंत:प्रेरणा ही सर्व कार्ये निरोगी मानवी मनाची लक्षणे असून ती प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मधून घडत असतात. हा भाग इतर सर्व भागाशी जोडलेला असतो. ऐच्छिक दीर्घ श्वास घेणे हे सुध्दा प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचे काम आहे. तो भावनिक मेंदूशी म्हणजे लिम्बिक सिस्टीमशी जोडलेला असतो.
     मेंदू तज्ञांच्या मते ध्यान हे आपल्या मेंदूचेच कार्य आहे. इतर प्राण्यांपेक्षा आपला मेंदू अधिक उत्क्रांत झालेला असल्याने फक्त माणूसच ध्यानाची अवस्था अनुभवू शकतो. इतर प्राणी आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळे, कान, नाक यांनी जाणत असतात.त्यांची इंद्रिये माणसाच्या इंद्रियांपेक्षा तीक्ष्ण असतात. त्यामुळेच माणसाला ऐकू येत नाही. असे आवाज कुत्रा, मांजर ऐकू शकतात, वास ओळखू शकतात. त्यांना परिसराचे भान अधिक चांगले असते. पण मेंदूतज्ञांच्या मते इतर प्राण्यांच्या मेंदूत निओ कॉर्टेक्स, प्री
फ्रनटल कॉर्टेक्स हा मेंदूचा पुढील भाग विकसित झालेला नसतो. हे मानवाचेच वैशिष्ट्य आहे. मतिमंद, लहान मुले किंवा स्किझोफ्रेनिया सारखे मानसिक आजार झालेल्या व्याक्तिचा अपवाद वगळता इतर कोणीही ध्यानाचा सराव करू शकतो. ध्यान हे सहजपणे लागत नाही त्याचा सराव करावा लागतो. माणसात अनेक शारीरीक कृती अजाणतेने, यांत्रिकतेने होतअसतात. आपले शरीर कृती करीत असते पण मन तिथे नसते. ते कोठल्यातरी विचारात, दंग असते. अशावेळी मेंदू ते काम  मज्जारज्जू ( Spinal cord) कडे सोपवतो.
        मेंदू सतत विचार करीत राहिला तर थकतो. भविष्याचे नियोजन करण्यासाठी विचार आवश्यक आहेत, पण ते सतत चालू राहिले तर आपण वर्तमानात जगतच नाही. भूतकाळ आणि भविष्य यांच्या विचारात वहात राहतो. ध्यान म्हणजे मेंदूची सवय बदलणे, त्याला वर्तमानात जगायला शिकवणे. म्हणून एखादी कृती करतांना किंवा शिकतांना ध्यान देऊन ऐकण्यास सांगतात. रागाची तीव्रता अधिक असेल तर रागाच्या भरात आपण काय बोलतो आहोत, काय करतो आहोत याचे भान रहात नाही. कारण भावनिक मेंदूने वैचारिक मेंदूचा ताबा घेतलेला असतो, तो विचारहिन होतो आणि रागाच्या भरात काहीही करतो. सजगता ध्यानाच्या अभ्यासाने वैचारिक मेंदू म्हणजेच प्री फ्रंटल कॉर्टेक्स अधिक सक्रीय होतो. तो भावनिक मेंदूच्या ताब्यात जात नाही. त्यामुळे भावनांची तीव्रता कमी रहाते.

sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान ध्यान भाग ४


Monday 24 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान भाग ४
करुणा ध्यान (Compassion Meditation)  हे तिसऱ्या प्रकारचे ध्यान,जे आपल्या सगळ्या प्रार्थनामध्ये आहे.आपण प्रार्थना म्हणतो," सर्वे भवन्तु सुखिनहै। सर्वे संतु निरामयः।।" हे करुणाध्यान आहे.यामध्ये सर्वांचे भले होवो,सर्व निरोगी होवो हा विचार आणि भावना मनात कांही वेळ धरून ठेवायची आणि त्यावर मन एकाग्र करायचे.याचा उपयोग असा होतो की, आपल्यापैकी बहुतांशी लोकांचा मेंदू हा नकारात्मकतेकडे झुकलेला असतो. काही जणानांच असे वाटते की, माझ्या मनातच भितीचे विचार का येतात? कोणी बाहेर गेलं अणि त्याला येण्यासाठी थोडा उशीर झाला की, पहिल्यांदा आपल्या मनात अक्सिडेंटचाच विचार येतो. असे भितीचे विचार येणे हे स्वाभाविक आहे.शास्त्रज्ञांना असे कळले आहे की, आपला मेंदू हा नकारात्मक घटना जाणण्यास जास्त उत्सुक असतो. मानसशास्त्रानुसार छोट्या छोट्या गोष्टींची भिती असणं हे जन्मल्यापासून उपजतच असतं आणि थोडीफार मिती हे जिवंत राहण्यासाठी आवश्यकही असते. ही भिती वाजवीपेक्षा जास्त किंवा अतिशयोक्ती असेल तर चांगल्या आणि सकारात्मक आठवणी मनात धरून ठेवण्यास हव्यात. तसेच सर्वांचे चांगले होवो, कल्याण होवो असे चांगले विचार मनात धरून ठेवायला हवेत आणि असे सकारात्मक विचार मनात धरून ठेवणे म्हणजे तिसऱ्या प्रकारचे करुणा ध्यान.
       प्रार्थना तोंडाने म्हणतांना मनात त्यातील भाव निर्माण करा. सर्व प्राणी सुखी होवोत. आनंदी, होवोत, निरोगी होवोत, सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो अशा भावना काही काळ मनामध्ये ठेवणे, मनामध्ये आनंद, प्रेम, करुणा निर्माण करणे हेच करुणा ध्यान आहे. ज्ञानोबा माऊलींचे पसायदान अशाच अर्थाचे आहे. बौध्द संस्कृतीमध्ये भवतु सब्ब मंगलम् अशी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये गायत्री मंत्र म्हंटला जातो. अशा प्रार्थना साधारण सर्वच धर्मात सांगितलेल्या आहेत.
         मन आणि मेंदू एकमेकावर परिणाम करतात. म्हणजेच मनाचा परिणाम मेंदूवर होतो. हे संशोधनात लक्षात आले आहे. मनातील भावना प्रयत्नपूर्वक बदलल्या, नैराश्य, क्रोध, मत्सर याऐवजी मनात प्रेम, करुणा, दया असे भाव निर्माण केले तर त्यामुळे मेंदू आणि मेंदूतील रसायने बदलतात. मेंदूतील सेरेटोनीन (Seretonin) हे रसायन वाढते ज्यामुळे औदासिन्य किंवा डिप्रेशन कमी होते. मेंदूचा डावा प्री-फ्रेंन्टल कॉर्टेक्स (Left prefrontal cortex) हा भाग अधिक सक्रीय होतो.
          मेंदूच्या संशोधनातून अजून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आपला मेंदू दुःखद प्रसंग किंवा नकारात्मक गोष्ट ठळकपणे लक्षात ठेवतो, तुमची कोणत्याही व्यक्तिशी झालेली भांडणे किंवा कटू प्रसंग किंवा मानहानीचा प्रसंग सहजपणे आणि लगेच आठवतात त्याचे कारण मानवाची उत्क्रांती होत असतांना स्वत:च्या संरक्षणासाठी धोक्याचे किंवा भितीदायक प्रसंग कायमचे लक्षात राहिल्याने आपले पूर्वज, आदिमानव योग्य ती काळजी घेवू शकत होते. विपरीत परिस्थिती, संकटे टाळण्यासाठी अशी संकटे आणि धोके ध्यानात राहणे आवश्यक होते. त्यासाठी असे प्रसंग माणसाच्या अमायग्डला (Amygdala) आणि हिपोकॅम्पस (Hippocampus) या मेंदूच्या भागात कायमचे कोरले जातात. त्यामुळेच वाघाची डरकाळी ऐकून माणूस पळत सुटत होता. म्हणूनच मरणाची भिती ही मानवास उपजतच जन्मापासूनच असते. ही आपल्या मेंदूची जडणघडण उत्क्रांतीच्या काळात उपयोगी ठरते. परंतु तीच जडणघडण आज नैराश्य आणि औदासिन्य वाढवते आहे. दुःखद प्रसंग, कलह, संकटे आपल्या स्मरणातून लवकर जात नाहीत. आनंदाचे, सुखाचे क्षण मात्र आपण पटकन विसरुन जातो. उत्क्रांतीच्या दृष्टीने टिकून राहण्यासाठी आनंद लक्षात राहणे फारसे महत्वाचे नव्हते. त्यामुळे त्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था मेंदूत नाही. त्यामुळे सुख विसरले जाते
आणि दुःख कायमचे लक्षात राहते. म्हणूनच आनंदाचा, सुखाचा, प्रेमाचा अनुभव, त्याचा कालावधी मनात वाढवावा लागतो. करुणाध्यानाने नेमके हेच केले जाते. आनंद,प्रेम, करुणा अशा भावनांचे मनात काही काळ धारण केले जाते. त्याचा परिणाम मेंदूवर आणि शरीराच्या आरोग्यावर चांगला होतो असे संशोधन एमोरी विद्यापिठाच्या (Emory University) मानसरोग विभागाने केले आहे.
'     ताणतणावामध्ये माणूस युध्दस्थितीत असतो. त्यावेळी त्याच्या रक्तातील कॉर्टीसोल (Cortisol) आणि इंटरल्युकीन - ६ (Interlukin - 6) हे रसायन वाढलेले असते. हे रायसन (Raison) यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या रसायनामुळे रक्त वाहिन्यांचे आजार, मधुमेह, स्मृतिभंश आणि औदासिन्य यासारखे आजार होऊ शकतात. तसेच रोग प्रतिकारक शक्ति दुबळी होते. करुणाध्यानाने युध्दस्थितीतील ही रसायने कमी होतात हे संशोधनाने सिध्द केले आहे
       ह्या करुणा ध्यानाचा परिणाम म्हणून आपला नकारात्मक (Negative bias) मेंदू हळूहळू बदलायला लागतो. या ध्यानाचा परिणाम म्हणून आपल्या मेंदू मधून
सिरोटोनिन, डोपामिन हे निर्माण करणारे रसायन अधिक पाझरतात. त्यामुळे ही डिप्रेशन किंवा उदासिनता वरील एक उपचार पध्दती आहे. कारण डिप्रेशन मध्ये हीच सिरोटोनिन, डोपामीन ही रसायने कमी झालेली असतात.

sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान ध्यान भाग. ७

Saturday 23 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान  भाग  ७
ध्यान आणि मेंदूतील रसायने :
मेंदूतून तयार होणाऱ्या रसायनांना न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmeter) म्हणतात. आपल्या भावना या रसायनांवर अवलंबुन असतात. मेंदूतील सेरेटोनीन नावाचे रसायन कमी झाले तर औदासिन्य (डिप्रेशन) हा आजार होतो. या रसायनांवर ध्यानाचा काय परिणाम होतो याचे संशोधन अनेक ठिकाणी चालू आहे. मेलाटोनिन  (Melatonin) हे मेंदूतील एक महत्वाचे रसायन आहे. हे मेंदूतील पिनीअल ग्रंथीत (Pineal gland) ते तयार होते. ते रात्रीतून किंवा अंधारात असताना पाझरते. त्याचा संबंध आपल्या शरीरातील जैविक घड्याळाशी येतो. दिवस व रात्र यानुसार आपल्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. विमानाने दूरच्या देशातील प्रवास केला तर एक-दोन दिवस 'जेट लाँग' चा त्रास होतो. म्हणजे तिथली वेळ वेगळी असली तरी आपले शरीराचे घड्याळ पूर्वीच्या वेळेशी जोडलेले असते.त्यामुळे भारतातून अमेरिकेत गेलेल्या माणसाला दिवसा झोप येते व रात्र जागवावी लागते. हे सर्व मेलाटोनिनमुळे होते. मेलाटोनिनचा संबंध सेरेटोनीनशी आहे. मेलाटोरिन कमी  झाले तर सेरेटोनीनही कमी होऊ लागते आणि त्यामुळे डिप्रेशन येऊ शकते. ध्यानाने हे टाळता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. मेंदूतील Dehydroepiandrosterone (DHEA) हे रसायन स्मृतीशी संबंधीत आहे. हे कमी झाले तर स्मरणशक्तीवर परिणाम होतो, थकवा येतो. रोगप्रतिकारक शक्तीदेखील या रसायनावर अवलंबून असते. ध्यानाच्या नियमित अभ्यासाने हे रसायन वाढते. मेंदूमध्ये Gamma Amino Butyric Acid (GABA) हे देखिल मेंदूतील एक महत्त्वाचे रसायन आहे. हे रसायन कमी झाल्यास विनाकारण भिती वाटत राहणे पेनिक डिसऑर्डर, दारू, तंबाखू, जुगार याचे व्यसन लागणे, गरज नसताना खरेदी करणे असे प्रकार आढळून येतात. हे रसायन इच्छा नियंत्रित ठेवण्यासाठी व आंतरिक शिस्तीसाठी आवश्यक असते. ध्यानाच्या अभ्यासाने याचेही नियंत्रण होते. ध्यानामुळे शरीर-मन युद्धस्थितीत न राहता शांतता स्थितीत राहते. युद्धस्थितीत पाझरणारी अड्रेनलीन, नॉरोंड्रेनलीन आणि इफिड्रिन ही रसायने ध्यानामुळे कमी होतात आणि शांतता स्थितीतील डोपामाईन (Dopamine), असेटलकोलीन (Acetylcoline) ही रसायने वाढतात. शांतता स्थितीत पाझरणारे असेटलकोलीन (Acetylcoline) स्मृती, ज्ञान, प्रेरणा आणि लक्षकेंद्रित करण्यासाठी हे रसायन आवश्यक असते. याच्या अभावाने
स्मृतीभ्रंश आणि अल्झायमर हा आजार होऊ शकतो. या रसायनाचा आणि वयाचा परिणाम म्हणून मेंदूचा स्मृतीसाठी आवश्यक असणारा सर्वात बाहेरचा थर म्हणजेच कॉर्टेक्स, हळूहळू झिजू लागते व त्याची जाडी कमी होते. ध्यान करणाऱ्या माणसामध्ये अशी झीज दिसत नाही किंवा टाळता येते, असे डॉ. सारा लासार यांना वाटते. २०१४ मध्ये अमेरिकन एजन्सी फॉर हेल्थकेअर रिसर्च यांनी एक अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी २९९३ माणसांवर केलेले संशोधन लक्षात घेतले आहे. त्यानुसार सजगता ध्यान हे चिंता आणि औदासिन्य आजारातील नकारात्मकता कमी करते आणि हा प्रभाव तीन ते चार महिने टिकतो. वेदनांचे दुष्परिणाम कमी करायला देखील हे ध्यान उपयोगी पडते.

Sharad yog vigyan.blogspot.com

Sunday, 31 May 2020

योग विज्ञान ध्यान भाग ३

Monday 25 may 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
  ध्यान भाग ३
कल्पनादर्शन ध्यान :
कल्पना दर्शन ध्यान म्हणजे समोर प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या दृष्याची कल्पना करून बंद डोळ्यांनी ते दृष्य पहायचे, अश्या प्रकारची कल्पना करता येणे हे बहुदा फक्त माणसालाच शक्य आहे. कल्पनादर्शन ध्यानासाठी वापरात येणारी दृश्ये ही आपल्या स्मृतीशी संबंधित मानसिक प्रतिमा असाव्यात,
      कल्पनादर्शन ध्यान म्हणजे अशाच एखाद्या प्रसंगाची किंवा दृष्याची कल्पना करुन ते पाहणे, तसा आवाज अनुभवणे, सुगंधाची, ध्वनीची, स्पर्शाची कल्पना करणे. बऱ्याचदा आपण भविष्यातील संकटाचे किंवा पूर्वी घडून गेलेल्या अपमानास्पद किंवा भांडणाच्या प्रसंगाचे स्मरण करतो त्यावेळी नकळत त्याचे कल्पनादर्शन ध्यान होत असते. त्यावेळी आपल्या शरीरात युध्दस्थितीतील रसायने पाझरतात. नकळत आपला रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाची धडधड, श्वासाची गती. स्नायुवरील ताण वाढतात. शरीरात थकवा येतो, मन अस्वस्थ होते. ही स्थिती बदलायची असेल तर आपल्या शरीरात शांतता स्थितीतील रसायने पाझरायला हवीत. आणि त्यासाठी आपल्या मनाला शांत करणारे एखादे आनंददायी दृश्य, इश्वराची मूर्ती, देवाचे, गुरुचे, निसर्गाचे किंवा प्रिय व्यक्तीचे रुप कल्पना करुन पहायचे हेच कल्पनादर्शन ध्यान होय.
         आपला मेंदू एखादी प्रत्यक्ष कृती आणि त्या कृतीची कल्पना म्हणजेच फक्त विचार यामध्ये फरक जाणत नाही. EMG म्हणजे इलेक्ट्रोमायोग्राफी याच्या मदतीने स्नायूतील इलेक्ट्रीक हालचाल मोजता येते. एका प्रयोगानुसार प्रत्यक्ष धावतांना आपल्या पायाच्या ठराविक स्नायूमुळे इलेक्ट्रीक हालचाल वाढते. गंमत म्हणजे प्रत्यक्ष धावले नाही, परंतु धावत आहेत अशी कल्पना जरी केली, तरी त्याच स्नायूमधील इलेक्ट्रीक हालचाल वाढलेली दिसते. डॉ. श्रीनिवास पिल्लाई यांच्या मते आपण एखाद्या कृतीची कल्पना तसे दृश्य पहातो. त्यावेळी आपल्या मेंदूतील पोस्टेरिअर परायटल कॉर्टेक्स
(Posterier parietal Cartex) हा भाग सक्रीय होतो. दृष्टी, त्वचा आणि इतर ज्ञानेंद्रिये या कडून माहिती घेवून त्यानुसार आवश्यक कृतीची रुपरेषा तेथे तयार होते. त्यानुसार
मेंदूच्या इतर भागातही घडामोडी घडतात.
      एका प्रयोगात पियानो वाजवणाऱ्या माणसांच्या मेंदूचे एम.आर.आय. स्कॅनिंग केले नंतर पियानो वादकांचे दोन गट तयार केले. एका गटाला रोज एक धून दहा मिनीटे वाजवायला दिली. ज्यामध्ये त्याच्या डाव्या हाताची करंगळी अधिक वापरावी लागत होती. दीड महिना रोज दहा मिनीटे असा सराव केल्यानंतर त्यांच्या मेंदूचे पुन्हा स्कॅनिंग केले असता त्यांच्या मेंदूतील कॉर्टेक्समधील डाव्या करंगळीशी संबंधित भाग विकसित झालेला आढळला. नंतर दुसऱ्या पियानो वादकांच्या गटाला तीच धून प्रत्यक्ष न वाजवता, ते ती धून वाजवत आहेत असे कल्पनादर्शन ध्यान रोज दहा मिनीटे करायला लावले. हे वादक त्यांची करंगळी प्रत्यक्ष वापरत नव्हते. पण फक्त तशी कल्पना करीत होते. दोन महिना असे
ध्यान केल्यानंतर त्यांच्या मेंदूचे पुन्हा स्कॅनिंग केले आणि पहिल्या गटातील पियानो वादकांच्या मेंदूतील जो भाग विकसित झाला होता तोच डाव्या करंगळीशी संबंधित
भाग अधिक विकसित झाला होता.
     ह्या ध्यानाचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोण वाढविन्या  साठी नक्कीच करता येतो.

sharadyogvigya.blogspot.com