Monday 22 June 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग ३
जर्मनीच्या एका वैज्ञानिकाने एक अजब प्रयोग केला. त्याने जगातील मुख्य भाषांची जी वर्ण लिपी आहे त्या वर्ण लिपीतील वर्णाक्षर हे स्टीलचा पोकळ पाईप वापरून तयार केले आणि त्यानंतर त्या वर्णाक्षराच्या पोकळ पाईपमधून एका बाजूने यंत्राव्दारे हवा आत सोडण्याची व्यवस्था केली अशी की, ती हवा वर्णाक्षरातून फिरून दुसऱ्या मोकळ्या टोकाने बाहेर पडेल. जसे A किंवा B मधून हवा पास केली. बाहेर निघालेली हया सऽऽऽस हा आवाज कारीत बाहेर पडली. सर्वच इंग्रजी लिपी बद्दल तसे झाले. परंतु जेंव्हा त्याने देवनागरी लिपीतून तोच प्रयोग केला त्यावेळी त्याला
अतोनात आश्चर्य वाटले. कारण बाहेर पडणारी हवा त्या वर्णाक्षराचा ध्वनी करीत बाहेर पडायची म्हणजे 'म' मधून हवा गेली की, बाहेर येताना ध्वनि 'म' चा असेल. वर्णाक्षर 'स' असेल तर 'स' चा आवाज असेल. अशी वैशिष्तपूर्ण देवनागरी लिपी. ज्यामध्येच देव आहे. कदाचित हे सुक्ष्म शरीर व चक्रांचे रहस्य आहे.
लहान मुलाला त्याची आई उभे करते आणि तोंडाने आवाज काढते श-शशssssशू. जगातील कोणतीही स्त्री असो, महाराष्ट्रीयन असो, मद्रासी असो की पंजाबी, भारतीय असेल वा चीन, जपान, इंग्लंडची. मुलाला संडास करण्यासाठी
वेगवेगळा आवाज काढत नाही, जसा कोणी कू कू किंवा हू-हू असे वेगळे आवाज काढत नाहीत. सर्वजण एकच आवाज काढतात आणि तो म्हणजे श-श-शऽऽऽशू. असे का ? संडासच्या जागी गुदद्वाराच्या ठिकाणी सुक्ष्म शरीरातील मुलाधार चक्र आहे. या चक्राला चार पाकळ्या आहेत. त्यावरील वर्णाक्षरे श, ष, स आणि व अशी आहेत. चार पैकी तीन वर्णाक्षरे 'श'कारात्मक आहेत. त्या शिशूमधील सुक्ष्म शरीरातील चक्रे अद्याप बंद झाली नाहीत, मिटलेली नाहीत, उघडी आहेत. 'श'कारात्मक आहेत. त्या शिशूमधील श काराच्या ध्वनीने त्या चक्रात कंपन होते. पाकळ्या थरारतात
आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी असलेल्या स्थुल शरिरातील नाडी केंद्रावर होतो. तेथे कंपन होऊन, क्रियाशिलता येते आणि मुलास शौचास होते. मोठ्या माणसांमध्ये चक्रे बंद झालेली असतात, मिटतात त्यामुळे त्यांच्यावर ' शू ' उच्चारनाचा परिणाम होत नाही.
आधुनिक विज्ञानानेपण ध्वनीतरंग विस्फोटाने जगदुप्तती झाल्याचे मान्य केले आहे. हा ध्वनी अनाहत नाद आहे.
मंत्रात आणि बीज मंत्रातपण फरक आहे. मंत्रापेक्षा बीज मंत्र अधिक प्रभावशालीअसतात.
मंत्र हे विज्ञान असून मंत्र म्हणणाऱ्यास त्यापासून अदभूत शक्ति किंवा उर्जा प्राप्त होते. प्रत्येक गोष्टीला कंपनामुळे वारंवारता (vibratary Frequency) असते. मग ते विचार (Thought) असो, शब्द असो अथवा भावना असोत. आपणांस कसे वाटते, कसा विचार करतो व कसे बोलतो. या सर्वाना ठराविक कंपन (Vibrations) असतात. अशा गोष्टीतून आपण आपले विश्व (World) परिसर (Suroundings) तयार करीत असतो. ध्वनी हा आश्चर्यकारक शक्तिशाली कंपन आहे.मंत्रातला मन
म्हणजे लक्ष, 'त्र' म्हणजे तरंग म्हणजे (Wave) किंवा प्रक्षेपण (Projection) म्हणून मंत्र याचा अर्थ मनाचा ध्वनी तरंग रुपात प्रक्षेपण. (Projection of Sound vibrations)
विश्वाचे अस्तित्व हे अणू (Atom) आहे आणि शरीराचे अस्तित्व (Basic Structure) हे पेशी आहे. प्रत्येक पेशी ही सुध्दा अब्जावधी अणूनी तयार झाली आहे. प्रत्येक अणू हा धन केंद्रक (+ve Neucleus) आणि त्याच्या भोवती फिरणारे ऋण इलेक्ट्रॉन (-ve Electrons) ने बनले आहे. ज्याप्रमाणे इंजिनमध्ये किंवा डायनेमो भोवती चुंबकीय क्षेत्र (Electre Magnetic Field) तयार होते तसेच केंद्रका भोवती फिरणाऱ्या - ve Electrons मुळे अणू भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. प्रत्येक अणूचे त्याच्या वारंवारते प्रमाणे कंपन होत असते. मग ते धातू असो, पाणी असो, पेशी असो किंवा कोणताही पदार्थ असो. म्हणून विश्वातील प्रत्येक पदार्थ हा कंपायमान असतो असे विज्ञानाने स्पष्ट केले आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या संथ तलावामध्ये लहान, गुळगुळीत दगड फेकल्यानंतर तलावात दूर पर्यंत जाणारे तरंग तयार होतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या शब्दाचे उच्चारण करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये कंपन व तरंग तयार होतात. ज्यामुळे सूक्ष्म शरीर (Subtle Body) जागृत होते व तेथे उर्जा निर्माण होते. अशा प्रकारे आपण ज्या कोणत्याही शब्दांचे ध्वनी उच्चारण करतो त्याचे परिणाम स्वतःवर,
समाजावर व सृष्टीवर (Universe) दिसून येतात.
ध्वनी मधे अद्भुत शक्ति, उर्जा असते. ही सत्यस्थिति आपल्या पौराणिक ऋषींना माहित होती. त्यामुळे संगीत आणि ध्वनी याचा उपयोग जैविक उपचारासाठी मंत्रातून व स्तोत्रातून (Collection of Mantra Group) विश्वातील सूक्ष्म शरीर यावर केला जो की हा परिणाम स्थूल शरीरापेक्षा कित्येक पटीने जास्त असतो.
sharadyogvigyan.blogspot.com
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग ३
जर्मनीच्या एका वैज्ञानिकाने एक अजब प्रयोग केला. त्याने जगातील मुख्य भाषांची जी वर्ण लिपी आहे त्या वर्ण लिपीतील वर्णाक्षर हे स्टीलचा पोकळ पाईप वापरून तयार केले आणि त्यानंतर त्या वर्णाक्षराच्या पोकळ पाईपमधून एका बाजूने यंत्राव्दारे हवा आत सोडण्याची व्यवस्था केली अशी की, ती हवा वर्णाक्षरातून फिरून दुसऱ्या मोकळ्या टोकाने बाहेर पडेल. जसे A किंवा B मधून हवा पास केली. बाहेर निघालेली हया सऽऽऽस हा आवाज कारीत बाहेर पडली. सर्वच इंग्रजी लिपी बद्दल तसे झाले. परंतु जेंव्हा त्याने देवनागरी लिपीतून तोच प्रयोग केला त्यावेळी त्याला
अतोनात आश्चर्य वाटले. कारण बाहेर पडणारी हवा त्या वर्णाक्षराचा ध्वनी करीत बाहेर पडायची म्हणजे 'म' मधून हवा गेली की, बाहेर येताना ध्वनि 'म' चा असेल. वर्णाक्षर 'स' असेल तर 'स' चा आवाज असेल. अशी वैशिष्तपूर्ण देवनागरी लिपी. ज्यामध्येच देव आहे. कदाचित हे सुक्ष्म शरीर व चक्रांचे रहस्य आहे.
लहान मुलाला त्याची आई उभे करते आणि तोंडाने आवाज काढते श-शशssssशू. जगातील कोणतीही स्त्री असो, महाराष्ट्रीयन असो, मद्रासी असो की पंजाबी, भारतीय असेल वा चीन, जपान, इंग्लंडची. मुलाला संडास करण्यासाठी
वेगवेगळा आवाज काढत नाही, जसा कोणी कू कू किंवा हू-हू असे वेगळे आवाज काढत नाहीत. सर्वजण एकच आवाज काढतात आणि तो म्हणजे श-श-शऽऽऽशू. असे का ? संडासच्या जागी गुदद्वाराच्या ठिकाणी सुक्ष्म शरीरातील मुलाधार चक्र आहे. या चक्राला चार पाकळ्या आहेत. त्यावरील वर्णाक्षरे श, ष, स आणि व अशी आहेत. चार पैकी तीन वर्णाक्षरे 'श'कारात्मक आहेत. त्या शिशूमधील सुक्ष्म शरीरातील चक्रे अद्याप बंद झाली नाहीत, मिटलेली नाहीत, उघडी आहेत. 'श'कारात्मक आहेत. त्या शिशूमधील श काराच्या ध्वनीने त्या चक्रात कंपन होते. पाकळ्या थरारतात
आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी असलेल्या स्थुल शरिरातील नाडी केंद्रावर होतो. तेथे कंपन होऊन, क्रियाशिलता येते आणि मुलास शौचास होते. मोठ्या माणसांमध्ये चक्रे बंद झालेली असतात, मिटतात त्यामुळे त्यांच्यावर ' शू ' उच्चारनाचा परिणाम होत नाही.
आधुनिक विज्ञानानेपण ध्वनीतरंग विस्फोटाने जगदुप्तती झाल्याचे मान्य केले आहे. हा ध्वनी अनाहत नाद आहे.
मंत्रात आणि बीज मंत्रातपण फरक आहे. मंत्रापेक्षा बीज मंत्र अधिक प्रभावशालीअसतात.
मंत्र हे विज्ञान असून मंत्र म्हणणाऱ्यास त्यापासून अदभूत शक्ति किंवा उर्जा प्राप्त होते. प्रत्येक गोष्टीला कंपनामुळे वारंवारता (vibratary Frequency) असते. मग ते विचार (Thought) असो, शब्द असो अथवा भावना असोत. आपणांस कसे वाटते, कसा विचार करतो व कसे बोलतो. या सर्वाना ठराविक कंपन (Vibrations) असतात. अशा गोष्टीतून आपण आपले विश्व (World) परिसर (Suroundings) तयार करीत असतो. ध्वनी हा आश्चर्यकारक शक्तिशाली कंपन आहे.मंत्रातला मन
म्हणजे लक्ष, 'त्र' म्हणजे तरंग म्हणजे (Wave) किंवा प्रक्षेपण (Projection) म्हणून मंत्र याचा अर्थ मनाचा ध्वनी तरंग रुपात प्रक्षेपण. (Projection of Sound vibrations)
विश्वाचे अस्तित्व हे अणू (Atom) आहे आणि शरीराचे अस्तित्व (Basic Structure) हे पेशी आहे. प्रत्येक पेशी ही सुध्दा अब्जावधी अणूनी तयार झाली आहे. प्रत्येक अणू हा धन केंद्रक (+ve Neucleus) आणि त्याच्या भोवती फिरणारे ऋण इलेक्ट्रॉन (-ve Electrons) ने बनले आहे. ज्याप्रमाणे इंजिनमध्ये किंवा डायनेमो भोवती चुंबकीय क्षेत्र (Electre Magnetic Field) तयार होते तसेच केंद्रका भोवती फिरणाऱ्या - ve Electrons मुळे अणू भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. प्रत्येक अणूचे त्याच्या वारंवारते प्रमाणे कंपन होत असते. मग ते धातू असो, पाणी असो, पेशी असो किंवा कोणताही पदार्थ असो. म्हणून विश्वातील प्रत्येक पदार्थ हा कंपायमान असतो असे विज्ञानाने स्पष्ट केले आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या संथ तलावामध्ये लहान, गुळगुळीत दगड फेकल्यानंतर तलावात दूर पर्यंत जाणारे तरंग तयार होतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या शब्दाचे उच्चारण करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये कंपन व तरंग तयार होतात. ज्यामुळे सूक्ष्म शरीर (Subtle Body) जागृत होते व तेथे उर्जा निर्माण होते. अशा प्रकारे आपण ज्या कोणत्याही शब्दांचे ध्वनी उच्चारण करतो त्याचे परिणाम स्वतःवर,
समाजावर व सृष्टीवर (Universe) दिसून येतात.
ध्वनी मधे अद्भुत शक्ति, उर्जा असते. ही सत्यस्थिति आपल्या पौराणिक ऋषींना माहित होती. त्यामुळे संगीत आणि ध्वनी याचा उपयोग जैविक उपचारासाठी मंत्रातून व स्तोत्रातून (Collection of Mantra Group) विश्वातील सूक्ष्म शरीर यावर केला जो की हा परिणाम स्थूल शरीरापेक्षा कित्येक पटीने जास्त असतो.
sharadyogvigyan.blogspot.com
खुप छान 👌
ReplyDelete