Tuesday 30 June 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
योगनिद्रा विज्ञान भाग १
बुध्दी आणि मन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बुध्दीचा विकास झाल्यास तो चांगली आणि बाईट ह्या गोष्टीतला फरक समजू शकतो. परंतु बौध्दिक विकास याचा अर्थ असा नाही की, तो एखाद्या वाईट गोष्टीचा अंगिकार करणार नाही. उदा.- एकदा माझी भेट एका सुशिक्षित पोलिस ऑफिसरशी झाली. जो दररोज मदिरा सेवन करीत होता. त्याला ही गोष्ट माहित होती की, दारुमुळे शरिराची हानी होते. तरीही तो रोज दारा पीत होता. त्याला बऱ्याच लोकांनी दारु सोडण्याबद्दल समजावले. परंतु दारु सुटली नाही. एकदा तो योग-शिक्षकाला भेटला, त्याने त्यास योग केंद्रात येण्याचा सल्ला दिला. तो योग केंद्रात येऊ लागला. जस जसा तो आसन, प्राणायाम, ध्यान व योगनिद्रा यांचा अभ्यास करु लागला, त्याचे मन त्यामध्ये रमु लागले. शवासन, ध्यान व योगनिद्रा यांच्या माध्यमातून त्याच्या चेतन व अवचेतन मनावर जो प्रभाव पडू लागला त्यामुळे त्याने स्वतःहून मदिरा सोडण्याचा निर्णय घेतला व त्यात त्याला यश आले.याचा अर्थ माणूस कितीही विद्वान असला तरी त्याचे मन स्थिर ,शांत, नियंत्रणात किंवा ताब्यात असेलच असे नाही.त्याला यश आले. याचा अर्थ माणूस कितीही विद्वान असला तरी त्याचे मन स्थिर, शांत, नियंत्रणात किंवा ताब्यात असेलच असे नाही.
योगनिद्रामध्ये साधकास योग्य विचार, सात्विक संस्कार हे अवचेतन मनाच्या स्तरावर जाऊन देता येतात. ज्यामुळे त्याच्या मनःस्थितीमध्ये योग्य बदल करता येतो.
योगनिद्रामध्ये जेंव्हा मन खोलवर अवचेतन स्तरावर जाते त्यावेळी मन शांत आणि स्थिर होते. अशावेळी त्यास काही सकारात्मक संकल्प दिले जातात. या स्थितीमध्ये दिलेले विचार किंवा संकल्प हे अवचेतन मनाच्या स्तरावर सहजपणे स्विकृत केले जातात. जागृत किंवा चेतन अवस्थेमध्ये मन अशांत, अस्थिर व चंचल असते. अशा स्थितीमध्ये घेतलेले संकल्प हे फलीभूत किंवा यशस्वी होणे कठीण असतात. धृढ संकल्पाब्दारे घेतलेला निर्णय मनुष्यास यशस्वी होण्यास मदत करतो. संकल्प आणि योगनिद्रा यांचा जवळचा संबंध आहे. अवचेतन मनाच्या अवस्थेत घेतलेला संकल्प कभी विफल होत नाही. योगनिद्राचा अभ्यास करण्यापूर्वी संकल्प घेण्याचे लक्ष निर्धारित असाये. संकल्प हा सकारात्मक व योग्य संस्कारित असावा जेणेकरुन जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल.
योगनिद्रामुळे साधकाच्या चित्तावर अनेक वृत्तीचा लेप चढलेला असतो तो निवृत्त होऊन चित्त निर्मल बनते.तसेच ध्यानाचा मार्ग सहज व सोपा बनतो
निद्रा ( झोप ) ही पूर्ण अचेतन (अबोध) अवस्था नसून त्याच्यामध्ये एक अंतःशक्ती कांही प्रमाणत जागृत स्थितीत असते.जी बाहेरील परिस्थितीनुसार जागरूक राहुन त्यास प्रतिक्रिया देत असते आणि असे आढळून आले आहे की, ह्या मनाच्या अवस्थे मध्ये प्रशिक्षण दिल्यास त्याचा जास्त परिणाम व उपयोग होतो. ज्याप्रमाणे झोपेमध्ये एखादा डास चावल्यास त्यास आपण हाकलतो, मोठा आवाज आल्यास दचकतो. याचा अर्थ तुम्ही झोपेत जरी असाल तरी कांही प्रमाणात सजग असता. तुमचा आत्मा जागृत असतो.
Sharad yogi gyan.blogspot.com
Very nice article sir-Sachin Kale
ReplyDelete