Thursday 15 July 2020
🧘🏻♂आ
योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मुद्रा विज्ञान भाग १
मुद्राच्या नियमित अभ्यासाने माणसाच्या वृत्तिमध्ये,मूड किंवा मनाचा कल यामध्ये बदल होतो. त्याची आकलन शक्ती, बोध,समज, जाणीव व जागरूकता यामध्ये वाढ होते.एकाग्रता वाढण्यासाठीही त्याची मदत होते.मुद्रांचा उपयोग उपचारात्मक तसेच मनोविश्लेषनात कार्यशक्तिला पुन्हा सुप्त मनाच्या पातळीत उतरवण्यासाठी करता येतो.
मुद्राभ्यासाने मन बाह्यजगतातुन आंतर्मुख होण्यास मदत होते जो एक प्रत्यहाराचाच भाग आहे. प्रत्याहारातून मन एकाग्र होऊन धारणेस प्राप्त होते त्यामुळे सततच्या अभ्यासाने ध्यान सहजतेने लागते.सुप्तावस्थेतील सुक्ष्मशक्ती जागृत होण्यास मदत होते.
संत,महर्षी व ऋषी यांनी दिलेली ही अतिप्राचीन विद्या असून ती एक गूढ विद्या असल्याचे मानले जात असे.परंतू ते एक मुद्रा विज्ञान असल्याचे आताच्या संशोधनात निष्पन्न होत आहे.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी शरीरातील पंचमहाभूतांच्या घटकांचे प्रमाण समतोल राहणे आवश्यक असते.ते मुद्राच्या अभ्यासातून शक्य होते.
ज्याप्रमाणे रडणे हे दुःख प्रदर्शित करण्याचे प्रतीक आहे, नाचणे,गाणे,हसणे हे आनंद दर्शविण्याचे प्रतीक आहेत.त्याचप्रमाणे मुद्रा हे आंतरिक भावना, स्वभाव ,मतांची व वृतींची जाणीव करून देण्याचे प्रतीक आहे.
कोणत्याही मुद्राच्या शारीरिक स्थितीतून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनांचा परिणाम हा मेंदूतील लहरीवर करीत असतो.
मुद्रा आणि प्राण यांचा संबंध : यौगिक तत्वज्ञान
आणि चायनीज औषध शास्त्राप्रमाणे आपले शरीर सतत ऊर्जा बाहेर टाकत असते.ती ऊर्जा हात, पाय,डोके यामधून जास्तीतजास्त बाहेर पडत असते. १९७० मध्ये कार्लीयन फोटोग्राफी द्वारे ही ऊर्जा शरीराभोवती आभामंडल (ऑरा) च्या माध्यमातून दिसते हे सिद्ध झाले.ह्या प्राणिक शक्तीचा प्रवाह हात, पाय,डोके याकडे जास्त असल्याचे दिसून आले.मुद्राच्या सरावाने हा प्राणिक प्रवाह बंद करून तो दुसऱ्या मार्गाने पाठविण्याची व्यवस्था केली जाते.अश्याप्रकारे
बाहेर पडणारी प्राणिक ऊर्जा ही वापस शरीरात पाठविली जाते. शरीराच्या वेगवेगळ्या स्थिती वरून व हाताच्या बोटांची वेगवेगळ्या प्रकारे जोडणी करून (हस्तमुद्रा) बाहेर पडणारी प्राणिक ऊर्जा ही परत शरीरात पाठविली जाते.हस्तमुद्रामध्ये शरीर, मन आणि प्राणिक ऊर्जा यांचा संबंध असतो.ज्याप्रमाणे ज्ञानमुद्रा मध्ये हात गुडघ्यावर ठेवून तळ हात जमिनीकडे असतो व तर्जनी आणि अंगुष्ठा यांचे मिलन झालेले असते.त्यामुळे तर्जनी मधून सतत बाहेर पडणारी प्राण ऊर्जा ही अंगठ्या मधून परत शरीरात पाठविली जाते. हेच तत्व चिनमुद्रास लागू होते.अश्यावेळी मन स्थिर होऊन एकाग्र होते, विशेषतः पद्मासन व सिद्धासनामध्ये. म्हणून ध्यानासाठी पद्मासन, सिद्धासन या आसनांचा आणि ज्ञानमुद्रा किंवा चिनमुद्रा यांचा प्रकर्षाने उपयोग केला जातो.
ज्याप्रमाणे प्रकाश ऊर्जा ही आरस्यातुन परावर्तित होते किंवा ध्वनि ऊर्जा ही एखाद्या ऊंच कड़ा किंवा भींत यावरून वळविन्यात येते त्याचप्रमाणे मुद्राद्वारे प्राणशक्ति ही शरीरात वळवून इच्छित हालचाल घडवून आणण्यासाठी वापरली जाते.तसेच ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी भिंतीवर टोर्चचा प्रकाश टाकल्यानंतर तो पसरतो त्याचप्रमाणे मुद्रामध्ये प्राणशक्तिस मिळालेल्या अडथळ्यामुळे ती शरीरात सर्वत्र पसरते. शरीरातील नाडी आणि शक्तीचक्रे ही टॉर्चप्रमाणे सतत उर्जाप्रवाहाचे काम करीत असतात.यामधील शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा ही मुद्राद्वारे परत शरीरात पाठविली जाते. ज्याप्रमाणे षण्मुखी मुद्रामध्यें आपण डोक्यामधील काही द्वार बंद करतो विशेष करून डोळे.त्यामधून बरीच ऊर्जा खर्च होत असते. डोळे बंद केल्यामुळे ती ऊर्जा खर्च न होता शरीरात पसरते. प्राणशक्ती नियमित आणि नियंत्रित झाल्यामुळे मानसिक क्रिया कमी होतात व मानसिक शांती आणि मानसिक एकाग्रता वाढते.
sharadyogvigyan.blogspot.com
🧘🏻♂आ
योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मुद्रा विज्ञान भाग १
मुद्राच्या नियमित अभ्यासाने माणसाच्या वृत्तिमध्ये,मूड किंवा मनाचा कल यामध्ये बदल होतो. त्याची आकलन शक्ती, बोध,समज, जाणीव व जागरूकता यामध्ये वाढ होते.एकाग्रता वाढण्यासाठीही त्याची मदत होते.मुद्रांचा उपयोग उपचारात्मक तसेच मनोविश्लेषनात कार्यशक्तिला पुन्हा सुप्त मनाच्या पातळीत उतरवण्यासाठी करता येतो.
मुद्राभ्यासाने मन बाह्यजगतातुन आंतर्मुख होण्यास मदत होते जो एक प्रत्यहाराचाच भाग आहे. प्रत्याहारातून मन एकाग्र होऊन धारणेस प्राप्त होते त्यामुळे सततच्या अभ्यासाने ध्यान सहजतेने लागते.सुप्तावस्थेतील सुक्ष्मशक्ती जागृत होण्यास मदत होते.
संत,महर्षी व ऋषी यांनी दिलेली ही अतिप्राचीन विद्या असून ती एक गूढ विद्या असल्याचे मानले जात असे.परंतू ते एक मुद्रा विज्ञान असल्याचे आताच्या संशोधनात निष्पन्न होत आहे.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी शरीरातील पंचमहाभूतांच्या घटकांचे प्रमाण समतोल राहणे आवश्यक असते.ते मुद्राच्या अभ्यासातून शक्य होते.
ज्याप्रमाणे रडणे हे दुःख प्रदर्शित करण्याचे प्रतीक आहे, नाचणे,गाणे,हसणे हे आनंद दर्शविण्याचे प्रतीक आहेत.त्याचप्रमाणे मुद्रा हे आंतरिक भावना, स्वभाव ,मतांची व वृतींची जाणीव करून देण्याचे प्रतीक आहे.
कोणत्याही मुद्राच्या शारीरिक स्थितीतून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनांचा परिणाम हा मेंदूतील लहरीवर करीत असतो.
मुद्रा आणि प्राण यांचा संबंध : यौगिक तत्वज्ञान
आणि चायनीज औषध शास्त्राप्रमाणे आपले शरीर सतत ऊर्जा बाहेर टाकत असते.ती ऊर्जा हात, पाय,डोके यामधून जास्तीतजास्त बाहेर पडत असते. १९७० मध्ये कार्लीयन फोटोग्राफी द्वारे ही ऊर्जा शरीराभोवती आभामंडल (ऑरा) च्या माध्यमातून दिसते हे सिद्ध झाले.ह्या प्राणिक शक्तीचा प्रवाह हात, पाय,डोके याकडे जास्त असल्याचे दिसून आले.मुद्राच्या सरावाने हा प्राणिक प्रवाह बंद करून तो दुसऱ्या मार्गाने पाठविण्याची व्यवस्था केली जाते.अश्याप्रकारे
बाहेर पडणारी प्राणिक ऊर्जा ही वापस शरीरात पाठविली जाते. शरीराच्या वेगवेगळ्या स्थिती वरून व हाताच्या बोटांची वेगवेगळ्या प्रकारे जोडणी करून (हस्तमुद्रा) बाहेर पडणारी प्राणिक ऊर्जा ही परत शरीरात पाठविली जाते.हस्तमुद्रामध्ये शरीर, मन आणि प्राणिक ऊर्जा यांचा संबंध असतो.ज्याप्रमाणे ज्ञानमुद्रा मध्ये हात गुडघ्यावर ठेवून तळ हात जमिनीकडे असतो व तर्जनी आणि अंगुष्ठा यांचे मिलन झालेले असते.त्यामुळे तर्जनी मधून सतत बाहेर पडणारी प्राण ऊर्जा ही अंगठ्या मधून परत शरीरात पाठविली जाते. हेच तत्व चिनमुद्रास लागू होते.अश्यावेळी मन स्थिर होऊन एकाग्र होते, विशेषतः पद्मासन व सिद्धासनामध्ये. म्हणून ध्यानासाठी पद्मासन, सिद्धासन या आसनांचा आणि ज्ञानमुद्रा किंवा चिनमुद्रा यांचा प्रकर्षाने उपयोग केला जातो.
ज्याप्रमाणे प्रकाश ऊर्जा ही आरस्यातुन परावर्तित होते किंवा ध्वनि ऊर्जा ही एखाद्या ऊंच कड़ा किंवा भींत यावरून वळविन्यात येते त्याचप्रमाणे मुद्राद्वारे प्राणशक्ति ही शरीरात वळवून इच्छित हालचाल घडवून आणण्यासाठी वापरली जाते.तसेच ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी भिंतीवर टोर्चचा प्रकाश टाकल्यानंतर तो पसरतो त्याचप्रमाणे मुद्रामध्ये प्राणशक्तिस मिळालेल्या अडथळ्यामुळे ती शरीरात सर्वत्र पसरते. शरीरातील नाडी आणि शक्तीचक्रे ही टॉर्चप्रमाणे सतत उर्जाप्रवाहाचे काम करीत असतात.यामधील शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा ही मुद्राद्वारे परत शरीरात पाठविली जाते. ज्याप्रमाणे षण्मुखी मुद्रामध्यें आपण डोक्यामधील काही द्वार बंद करतो विशेष करून डोळे.त्यामधून बरीच ऊर्जा खर्च होत असते. डोळे बंद केल्यामुळे ती ऊर्जा खर्च न होता शरीरात पसरते. प्राणशक्ती नियमित आणि नियंत्रित झाल्यामुळे मानसिक क्रिया कमी होतात व मानसिक शांती आणि मानसिक एकाग्रता वाढते.
sharadyogvigyan.blogspot.com
No comments:
Post a Comment