Friday, 5 June 2020

योग विज्ञान भ्रामरी प्राणायाम भाग १

Saturday 30 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
भ्रामरी प्राणायाम भाग १
वैज्ञानिक तथ्य -
   एकदा सैनिकांचा एक दल कदमताल (मार्च पास्ट) करीत पूलावरून गेला.मा र्च पास्ट पूलावरून पुढे जाताच पूल खाली पडला. त्यावेळी जोराचा वारा किंवा नदीला पूर असे काहीच नव्हते. यावरून एक निष्कर्ष असा निघाला की, जेव्हा दोन किंवा अधिक ध्वनी निर्माण होतात त्यावेळी त्यांच्या ध्वनी तरंगाची आवृत्ती (Frequency) जेव्हा एकरूप होतात त्यावेळी त्याचा परिणाम नवीन उच्च ध्वनी तरंग निर्माण होण्यामध्ये होतो,व त्या नवीन उच्च ध्वनी तरंगाचे परिणाम हे काही पटीत असतात. म्हणूनच सैनिकांच्या पायाच्या कदमतालाने ध्वनीची तरंगे एकरुप झाली व जास्त शक्तिशाली ध्वनीतरंग तयार होऊन पूल खाली पडला. आणि हेच मुलभूत तत्त्व भ्रामरी प्राणायामात अनुभवास येते. एखादा खूप जड पदार्थ दोरीने अनेक लोकांकडून ओढताना एका तालात आवाज करीत तो ओढला जातो. ठराविक वेळेला ठराविक जोर (Force) लावला जातो त्यामुळे सर्वांची शक्ती एकवटल्यामुळे ती जड वस्तू जागेवरून हलते. जर तीच वस्तू प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी ओढली तर ती जागेवरून हलणारच नाही. येथे शक्तीच्या अनुरुपतेचा परिणाम दिसून येतो.
       भ्रामरी प्राणायामामध्ये ध्वनी तरंगाच्या अनुरुपतेचा परिणाम दिसून येतो. संगीतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वाद्यांमधून ध्वनी तरंग निघतात. ते जेव्हा अनुरुप (एकरुप) होतात त्यावेळी निरनिराळ्या वाद्यांमधून निघालेले आवाजही कानास सुश्राव्य वाटतात. माणूस ते ऐकून तल्लीन होतो, शांत होतो, आनंदी होतो. हे ध्वनी तरंगाचे शरीरावरील, मनावरील व मेंदूवरील होणारे परिणाम आहेत. काही ध्वनी स्वरांनी अंगावर
शहारे ही येतात.भ्रामरी प्राणायामामध्ये श्वास आणि प्रश्वासाच्या वेळी जेव्हा मधूर आवाज काढला जातो त्यावेळी ध्वनीची आवृत्ती (Frequency) शरीराच्या स्वाभाविक आवृत्तीशी एकरुप होते व त्याचे अनुरुप गुणात्मक परिणाम दिसून येतात. बरेच साधक ध्वनीच्या तीव्रतेचा
आणि दीर्घतेचा अभ्यास करतात. परंतु त्याचा लय, मधुरता व अनुनाद याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या प्राणायामामध्ये ज्या त्रिमित्तिय सजगतेचा विकास व्हावा तेवढा होत
नाही व ती न्यूयतम राहते.
        आपणांस रेचकाच्या वेळीच आवाज काढण्याचा सराव असतो. रेचकाच्या वेळी छातीतील (फुफ्फुसातील) हवेचा दाब जास्त असतो त्यावेळी श्वास सोडताना स्वरतंतू (Vocal cords) कंप पावतात आणि आपण बोलू शकतो किंवा स्वर काढू शकतो. परंतु पूरक करतेवेळी आपणास आवाज काढण्याची सवय नसते त्यामुळे पूरकाच्या वेळी
नरभ्रमरासारखा आवाज नवीन साधकांना अवघड जातो. त्यासाठी स्वरयंत्र (Larynx), घसा, नाकाची पोकळी येथे आकुंचन निर्माण करून व फुप्फुसामध्ये ऋणात्मक (NegativePressure) दाव निर्माण करून हवा फुप्फुसामध्ये ओढून घ्यावी लागते. त्यावेळी स्वरतंतूचे
कंपन होऊन ध्वनी निर्माण होतो. सततच्या सरावाने इच्छेनुसार ध्यनीच्या कंपनामध्ये
परिवर्तन घडवून आणता येते, जेणेकरून तो आवाज लयबद्ध, मधूर व दीर्घकाळ होईल.
        हे सर्व ज्ञात आहे की, मनुष्य जातीमध्ये स्त्री (नारी) स्वर हा पुरुष स्वरापेक्षा जास्त तारयुक्त किंवा उच्च आवृत्तीचा (High Frequency) आणि मधूर असतो. परंतु
पक्षी, किटक, भुंगा यामध्ये अगदी विरुद्ध आहे. म्हणजेच नर भुंग्याचा (भ्रमर) आवाज उच्च तारयुक्त किंवा अधिक आवृत्तीचा (High Frequency) म्हणजेच मनोहर व मधूर
असतो, तर मादी मुंग्याचा (भ्रमरी) आवाज हा कमी आवृत्तीचा {Lown Frequency or (Low Pitch) असतो. जसा भ्रामरी प्राणायामात रेषकाच्या वेळी आपला आवाज निघतो.
आवाज, नाद, ध्वनी यांचा शरीर, मेंदू व मनावर परिणाम होतो. संगीताने व स्वनिर्मित ध्वनीने मेंदूच्या लहरीमध्ये बदल घडवून आणता येतात. ज्या ध्वनीमुळे मेंदूमध्ये 8-13 Htz मेंदूतरंग निर्माण होतात त्यांना अल्फा तरंग म्हणतात. त्यावेळी शांतता संवेदनाचा अनुभव येतो. दीर्घ व मंद आवाजातील संगीत ऐकताना मनुष्य खोल आणि मंद श्वासाचा अनुभव घेतो आणि मन शांत होते. हृदयाची स्पंदने संगीताच्या विविधतेस प्रतिसाद देतात. डी.जे.च्या कर्णकर्कश आवाजाने, छातीत धडधड होते, कान बधीर होतात, डोके दुखते, मळमळ होते, उलटीही होऊ शकते.

Sharad yog vigyan.blogspot.com

No comments:

Post a Comment