Saturday 23 May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान भाग ७
ध्यान आणि मेंदूतील रसायने :
मेंदूतून तयार होणाऱ्या रसायनांना न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmeter) म्हणतात. आपल्या भावना या रसायनांवर अवलंबुन असतात. मेंदूतील सेरेटोनीन नावाचे रसायन कमी झाले तर औदासिन्य (डिप्रेशन) हा आजार होतो. या रसायनांवर ध्यानाचा काय परिणाम होतो याचे संशोधन अनेक ठिकाणी चालू आहे. मेलाटोनिन (Melatonin) हे मेंदूतील एक महत्वाचे रसायन आहे. हे मेंदूतील पिनीअल ग्रंथीत (Pineal gland) ते तयार होते. ते रात्रीतून किंवा अंधारात असताना पाझरते. त्याचा संबंध आपल्या शरीरातील जैविक घड्याळाशी येतो. दिवस व रात्र यानुसार आपल्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. विमानाने दूरच्या देशातील प्रवास केला तर एक-दोन दिवस 'जेट लाँग' चा त्रास होतो. म्हणजे तिथली वेळ वेगळी असली तरी आपले शरीराचे घड्याळ पूर्वीच्या वेळेशी जोडलेले असते.त्यामुळे भारतातून अमेरिकेत गेलेल्या माणसाला दिवसा झोप येते व रात्र जागवावी लागते. हे सर्व मेलाटोनिनमुळे होते. मेलाटोनिनचा संबंध सेरेटोनीनशी आहे. मेलाटोरिन कमी झाले तर सेरेटोनीनही कमी होऊ लागते आणि त्यामुळे डिप्रेशन येऊ शकते. ध्यानाने हे टाळता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. मेंदूतील Dehydroepiandrosterone (DHEA) हे रसायन स्मृतीशी संबंधीत आहे. हे कमी झाले तर स्मरणशक्तीवर परिणाम होतो, थकवा येतो. रोगप्रतिकारक शक्तीदेखील या रसायनावर अवलंबून असते. ध्यानाच्या नियमित अभ्यासाने हे रसायन वाढते. मेंदूमध्ये Gamma Amino Butyric Acid (GABA) हे देखिल मेंदूतील एक महत्त्वाचे रसायन आहे. हे रसायन कमी झाल्यास विनाकारण भिती वाटत राहणे पेनिक डिसऑर्डर, दारू, तंबाखू, जुगार याचे व्यसन लागणे, गरज नसताना खरेदी करणे असे प्रकार आढळून येतात. हे रसायन इच्छा नियंत्रित ठेवण्यासाठी व आंतरिक शिस्तीसाठी आवश्यक असते. ध्यानाच्या अभ्यासाने याचेही नियंत्रण होते. ध्यानामुळे शरीर-मन युद्धस्थितीत न राहता शांतता स्थितीत राहते. युद्धस्थितीत पाझरणारी अड्रेनलीन, नॉरोंड्रेनलीन आणि इफिड्रिन ही रसायने ध्यानामुळे कमी होतात आणि शांतता स्थितीतील डोपामाईन (Dopamine), असेटलकोलीन (Acetylcoline) ही रसायने वाढतात. शांतता स्थितीत पाझरणारे असेटलकोलीन (Acetylcoline) स्मृती, ज्ञान, प्रेरणा आणि लक्षकेंद्रित करण्यासाठी हे रसायन आवश्यक असते. याच्या अभावाने
स्मृतीभ्रंश आणि अल्झायमर हा आजार होऊ शकतो. या रसायनाचा आणि वयाचा परिणाम म्हणून मेंदूचा स्मृतीसाठी आवश्यक असणारा सर्वात बाहेरचा थर म्हणजेच कॉर्टेक्स, हळूहळू झिजू लागते व त्याची जाडी कमी होते. ध्यान करणाऱ्या माणसामध्ये अशी झीज दिसत नाही किंवा टाळता येते, असे डॉ. सारा लासार यांना वाटते. २०१४ मध्ये अमेरिकन एजन्सी फॉर हेल्थकेअर रिसर्च यांनी एक अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी २९९३ माणसांवर केलेले संशोधन लक्षात घेतले आहे. त्यानुसार सजगता ध्यान हे चिंता आणि औदासिन्य आजारातील नकारात्मकता कमी करते आणि हा प्रभाव तीन ते चार महिने टिकतो. वेदनांचे दुष्परिणाम कमी करायला देखील हे ध्यान उपयोगी पडते.
Sharad yog vigyan.blogspot.com
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान भाग ७
ध्यान आणि मेंदूतील रसायने :
मेंदूतून तयार होणाऱ्या रसायनांना न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmeter) म्हणतात. आपल्या भावना या रसायनांवर अवलंबुन असतात. मेंदूतील सेरेटोनीन नावाचे रसायन कमी झाले तर औदासिन्य (डिप्रेशन) हा आजार होतो. या रसायनांवर ध्यानाचा काय परिणाम होतो याचे संशोधन अनेक ठिकाणी चालू आहे. मेलाटोनिन (Melatonin) हे मेंदूतील एक महत्वाचे रसायन आहे. हे मेंदूतील पिनीअल ग्रंथीत (Pineal gland) ते तयार होते. ते रात्रीतून किंवा अंधारात असताना पाझरते. त्याचा संबंध आपल्या शरीरातील जैविक घड्याळाशी येतो. दिवस व रात्र यानुसार आपल्या शरीरात अनेक बदल घडून येत असतात. विमानाने दूरच्या देशातील प्रवास केला तर एक-दोन दिवस 'जेट लाँग' चा त्रास होतो. म्हणजे तिथली वेळ वेगळी असली तरी आपले शरीराचे घड्याळ पूर्वीच्या वेळेशी जोडलेले असते.त्यामुळे भारतातून अमेरिकेत गेलेल्या माणसाला दिवसा झोप येते व रात्र जागवावी लागते. हे सर्व मेलाटोनिनमुळे होते. मेलाटोनिनचा संबंध सेरेटोनीनशी आहे. मेलाटोरिन कमी झाले तर सेरेटोनीनही कमी होऊ लागते आणि त्यामुळे डिप्रेशन येऊ शकते. ध्यानाने हे टाळता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे. मेंदूतील Dehydroepiandrosterone (DHEA) हे रसायन स्मृतीशी संबंधीत आहे. हे कमी झाले तर स्मरणशक्तीवर परिणाम होतो, थकवा येतो. रोगप्रतिकारक शक्तीदेखील या रसायनावर अवलंबून असते. ध्यानाच्या नियमित अभ्यासाने हे रसायन वाढते. मेंदूमध्ये Gamma Amino Butyric Acid (GABA) हे देखिल मेंदूतील एक महत्त्वाचे रसायन आहे. हे रसायन कमी झाल्यास विनाकारण भिती वाटत राहणे पेनिक डिसऑर्डर, दारू, तंबाखू, जुगार याचे व्यसन लागणे, गरज नसताना खरेदी करणे असे प्रकार आढळून येतात. हे रसायन इच्छा नियंत्रित ठेवण्यासाठी व आंतरिक शिस्तीसाठी आवश्यक असते. ध्यानाच्या अभ्यासाने याचेही नियंत्रण होते. ध्यानामुळे शरीर-मन युद्धस्थितीत न राहता शांतता स्थितीत राहते. युद्धस्थितीत पाझरणारी अड्रेनलीन, नॉरोंड्रेनलीन आणि इफिड्रिन ही रसायने ध्यानामुळे कमी होतात आणि शांतता स्थितीतील डोपामाईन (Dopamine), असेटलकोलीन (Acetylcoline) ही रसायने वाढतात. शांतता स्थितीत पाझरणारे असेटलकोलीन (Acetylcoline) स्मृती, ज्ञान, प्रेरणा आणि लक्षकेंद्रित करण्यासाठी हे रसायन आवश्यक असते. याच्या अभावाने
स्मृतीभ्रंश आणि अल्झायमर हा आजार होऊ शकतो. या रसायनाचा आणि वयाचा परिणाम म्हणून मेंदूचा स्मृतीसाठी आवश्यक असणारा सर्वात बाहेरचा थर म्हणजेच कॉर्टेक्स, हळूहळू झिजू लागते व त्याची जाडी कमी होते. ध्यान करणाऱ्या माणसामध्ये अशी झीज दिसत नाही किंवा टाळता येते, असे डॉ. सारा लासार यांना वाटते. २०१४ मध्ये अमेरिकन एजन्सी फॉर हेल्थकेअर रिसर्च यांनी एक अभ्यास केला. त्यामध्ये त्यांनी २९९३ माणसांवर केलेले संशोधन लक्षात घेतले आहे. त्यानुसार सजगता ध्यान हे चिंता आणि औदासिन्य आजारातील नकारात्मकता कमी करते आणि हा प्रभाव तीन ते चार महिने टिकतो. वेदनांचे दुष्परिणाम कमी करायला देखील हे ध्यान उपयोगी पडते.
Sharad yog vigyan.blogspot.com
No comments:
Post a Comment