Friday, 5 June 2020

योग विज्ञान भ्रामरी प्राणायाम भाग २

Sunday 31 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
भ्रामरी प्राणायाम भाग २
आपण १२५ Hz ते ६००० Htz वारंवारतेचे (Frequencies) आवाज ऐकू शकतो. परंतु १२५Htz पेक्षा कमी व ६००० Htz पेक्षा जास्त वारंवारतेच्या आवाजांचेही परिणाम आपल्या स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारण शरीरावर होत असतात.
षटचक्रावरील पाकळ्यांवर जी वर्णाक्षरे आहेत त्या वर्णाक्षरांच्या उच्चारणाने त्या चक्रांच्या पाकळ्यांवर परिणाम होऊन त्या उत्तेजित होतात. जसे अनेक मंत्रांचा परिणाम
चक्रांवर होतो. देवनागरी लिपीची संस्कृतमध्ये एकूण ५० वर्णाक्षरे आहेत. आणि ६ चक्रांच्या एकूण ५० पाकळ्या आहेत. त्या त्या वर्णाक्षरांचा त्या त्या पाकळीशी संबंध येतो व ते चक्र उद्दिपित होते.
       ध्वनी उर्जा ही इलेक्ट्रीक (Electric) आणि इलेक्ट्रोमॅग्नेटीक (Electromagnetic) उर्जेमध्ये बदलू शकते. जसे रिमोटद्वारे टेप लावणे, टि.व्ही. चालू-बंद करणे,
कार चालविणे. ह्यावेळी ध्वनी हा अल्ट्रासोनिक (Ultra sonic wave) मध्ये बदलतो. ध्वनी हा मंत्राचा आणि भ्रामरी प्राणायामाचा पाया असून त्यातून अद्भूत उर्जा निर्माण होते.
       नाकातून घुमणाऱ्या आवाजामुळे (मकार) शरीरात नायट्रीक ऑक्साईडची (Nitric Oxide) वाढ होते. बीज मंत्रावरील अनुस्वारांचा परिणाम जास्त होतो म्हणून ती
प्रभावशाली असतात. या नायट्रीक ऑक्साईडमुळे शरीरातील ५० ट्रिलीयन (Trillion -१ वर १२ शून्य) इतक्या पेशी एकमेकांना संवेदनामार्फत जोडल्या जातात. त्यामुळे पूर्ण
शरीराला संवेदना पोहोचते. हे फक्त नाकाने श्वास घेतल्यास (Nasal breathing) शक्य असून नायट्रीक ऑक्साईड सायनसेस (Sinuses) मध्ये तयार होते.
        भ्रामरी प्राणायामाने परानुकंपा स्वायत्त मज्जासंस्थेचा परिणाम वाढतो. भ्रामरी प्राणायामात छातीवरील दाब (Intrathorasic Pressure) वाढल्याने कॅरॉटीड (Carotid) सायनस मधील बॅरोरिसेप्टर (Baroreceptor) वर परिणाम होऊन रक्तदाब सामान्य होतो.
         संगीतातील किंवा बाह्य ध्वनीमुळे होणाऱ्या चक्रावरील परिणामापेक्षा कंठस्थ ध्वनीचा परिणाम चक्रावर जास्त होतो. जसे भ्रामरी, उज्जायी, ओंकार उच्चारण, मंत्र उच्चारण
वगैरे.
     ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी माध्यमाची गरज असते. जसे घन, द्रव, वायूरुप. या माध्यमाशिवाय आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
जाऊ शकत नाही. आपल्या शरीरात ७०% पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे आपले शरीर ध्वनी कंपनाचे चांगले वाहक आहे. त्यामुळे भ्रामरी प्राणायामात निर्माण झालेल्या ध्वनी
कंपनांचे, संवेदनांचे प्रक्षेपण सर्व शरीरभर पसरते.

Sharadyogvigyan.blogspot.com

No comments:

Post a Comment