Sunday 21 June 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग १
श्वासामुळे घस्यातील स्वरतंतु कंपन पावल्यामुळे ध्वनि लहरी निर्माण होतात.या ध्वनीचे घस्यांमध्ये व नाकामध्ये वेगवेगळ्या स्वरात रूपांतर होते.याचाच अर्थ आपणास बोलता येते.ही क्षमता किंवा वरदान हे परमेश्वराने मानवासच दिले आहे. जगातील इतर प्राणी आवाज काढू शकतात.परंतु मानवाप्रमाणे ते बोलू शकत नाहीत किंवा त्यांना मन व बुद्धी दिलेली नाही. मानवाची वाक् शैली ,वैचारिक शक्ती ,मन व बुद्धी यामुळे त्याचे स्थान जगात परमश्रेष्ठ आहे. वाक् शैलीतून भाषेची निर्मिती झाली. ज्याच्यामुळे मानवाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. वैदिक काळात भारताने भौतिक शास्त्रातच नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रातही प्रगतीचे अत्युच्य शिखर गाठले आहे.
ध्वनी कंपनाचा शरिराच्या विविध भागावर उत्तेजन निर्माण करणाऱ्या परिणामाचा योगीक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या मंत्रोच्चारामध्ये चपलखपणे व चतुरपणे उपयोग करण्यात
आला आहे. फक्त साडे तीन अक्षराव्दारे निर्माण होणाऱ्या "ओम" (ॐ) मंत्रामध्ये सर्व ३ स्थिती, ३ रचनारुपे, आणि जाणिवेच्या ३ पातळी उत्तेजित करण्याचे सामर्थ्य आहे, वैदिक ऋषींनी स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे की, मानवाच्या गर्भावस्तेमध्ये मेरुदंडामध्ये (Vertebral Column) ध्वनीची निर्मिती होते.
मान, पाठ. कंबर सरळ ठेऊन बसणे किंवा उभे राहिल्याने ऐकण्याच्या प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त नियंत्रण प्राप्त होते आणि मेंदू पूर्ण जाणीवावस्थेत उत्तेजित होतो.
ओम् चा जप केल्याने षट्चक्रांना ज्या आपल्या शरिरातील मूळ उर्जा आहेत त्यांना विशिष्ट शाक्तिच्या ध्वनिलहरीव्दारे उत्तेजित करता येते.
आपण जे ध्वनी ऐकतो ते साधारण २५० ते ४००० या वारंवारतेचे (Frequency) असतात. परंतु २५० च्या खाली व ४००० Hz च्या वर असलेल्या ध्वनीलहरी ऐकण्यास येत नाहीत, परंतु त्याचा आपल्या शरिरावर परिणाम होतो.
आपण जे बोलतो त्याची वारंवारता साधारण २५० ते ४००० Htz असते.
डॉ. आल्फ्रेड टोमॅटीस फ्रेंच इ.एन.टी. स्पेशालिस्ट यांनी श्रवण प्रणालीच्या दीर्घ अभ्यासाब्दारे सांगितले की, ४००० ते 1000Htz- किंवा यापेक्षा अधिक अशा उच्च कंपन शक्तिचे ध्वनी विचारशक्ती, आकलन, स्मरणशक्ती यासारख्या
कार्यावर परिणाम करतात. ७५० ते ३००० Hz - कंपनशक्तीचे ध्वनी हृदय, फुफ्फुसे व भावना उत्तेजित करतात. तर १२५ ते ७५० Hz पेक्षा कमी कंपनशक्तीचे ध्वनी शारिरीक चलन चलनावर परिणाम करतात.
ओंकारामधे 'अ' चा जागृत अवस्थेत स्थुल शरिरावर परिणाम होतो. 'उ' अक्षराचा स्वप्नावस्थेत सुक्ष्म शरिरावर परिणाम होतो. तर 'म' अक्षराचा परिणाम गाढ निद्रावस्तेत कारण शरिरावर परिणाम होतो.
ज्याप्रमाणे प्रकाशातील कांही किरण आपणास दिसत नाहीत जसे क्ष किरण (X ray ) ,इन्फ्रारेड (Infrared),अल्ट्राव्हायोलेट ( Altraviolet) परंतु या किरणांचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आपणास दिसतात .तसेच १२५ हर्ट्स पेक्षा कमी व ४००० हर्ट्स पेक्षा जास्त हर्ट्स असलेल्या ध्वनी आपणास ऐकू येत नाहीत परंतु त्यांचे परिणाम आपल्या शरीरावर (स्थूल देह -ग्रॉस बॉडी),सूक्ष्म देह (Subtle Body) , कारण शरीर (Causal Body) यावर होतो.
sharadyogvigyan.blogspot.com
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
मंत्र विज्ञान भाग १
श्वासामुळे घस्यातील स्वरतंतु कंपन पावल्यामुळे ध्वनि लहरी निर्माण होतात.या ध्वनीचे घस्यांमध्ये व नाकामध्ये वेगवेगळ्या स्वरात रूपांतर होते.याचाच अर्थ आपणास बोलता येते.ही क्षमता किंवा वरदान हे परमेश्वराने मानवासच दिले आहे. जगातील इतर प्राणी आवाज काढू शकतात.परंतु मानवाप्रमाणे ते बोलू शकत नाहीत किंवा त्यांना मन व बुद्धी दिलेली नाही. मानवाची वाक् शैली ,वैचारिक शक्ती ,मन व बुद्धी यामुळे त्याचे स्थान जगात परमश्रेष्ठ आहे. वाक् शैलीतून भाषेची निर्मिती झाली. ज्याच्यामुळे मानवाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. वैदिक काळात भारताने भौतिक शास्त्रातच नव्हे तर आध्यात्मिक क्षेत्रातही प्रगतीचे अत्युच्य शिखर गाठले आहे.
ध्वनी कंपनाचा शरिराच्या विविध भागावर उत्तेजन निर्माण करणाऱ्या परिणामाचा योगीक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या मंत्रोच्चारामध्ये चपलखपणे व चतुरपणे उपयोग करण्यात
आला आहे. फक्त साडे तीन अक्षराव्दारे निर्माण होणाऱ्या "ओम" (ॐ) मंत्रामध्ये सर्व ३ स्थिती, ३ रचनारुपे, आणि जाणिवेच्या ३ पातळी उत्तेजित करण्याचे सामर्थ्य आहे, वैदिक ऋषींनी स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे की, मानवाच्या गर्भावस्तेमध्ये मेरुदंडामध्ये (Vertebral Column) ध्वनीची निर्मिती होते.
मान, पाठ. कंबर सरळ ठेऊन बसणे किंवा उभे राहिल्याने ऐकण्याच्या प्रक्रियेमुळे जास्तीत जास्त नियंत्रण प्राप्त होते आणि मेंदू पूर्ण जाणीवावस्थेत उत्तेजित होतो.
ओम् चा जप केल्याने षट्चक्रांना ज्या आपल्या शरिरातील मूळ उर्जा आहेत त्यांना विशिष्ट शाक्तिच्या ध्वनिलहरीव्दारे उत्तेजित करता येते.
आपण जे ध्वनी ऐकतो ते साधारण २५० ते ४००० या वारंवारतेचे (Frequency) असतात. परंतु २५० च्या खाली व ४००० Hz च्या वर असलेल्या ध्वनीलहरी ऐकण्यास येत नाहीत, परंतु त्याचा आपल्या शरिरावर परिणाम होतो.
आपण जे बोलतो त्याची वारंवारता साधारण २५० ते ४००० Htz असते.
डॉ. आल्फ्रेड टोमॅटीस फ्रेंच इ.एन.टी. स्पेशालिस्ट यांनी श्रवण प्रणालीच्या दीर्घ अभ्यासाब्दारे सांगितले की, ४००० ते 1000Htz- किंवा यापेक्षा अधिक अशा उच्च कंपन शक्तिचे ध्वनी विचारशक्ती, आकलन, स्मरणशक्ती यासारख्या
कार्यावर परिणाम करतात. ७५० ते ३००० Hz - कंपनशक्तीचे ध्वनी हृदय, फुफ्फुसे व भावना उत्तेजित करतात. तर १२५ ते ७५० Hz पेक्षा कमी कंपनशक्तीचे ध्वनी शारिरीक चलन चलनावर परिणाम करतात.
ओंकारामधे 'अ' चा जागृत अवस्थेत स्थुल शरिरावर परिणाम होतो. 'उ' अक्षराचा स्वप्नावस्थेत सुक्ष्म शरिरावर परिणाम होतो. तर 'म' अक्षराचा परिणाम गाढ निद्रावस्तेत कारण शरिरावर परिणाम होतो.
ज्याप्रमाणे प्रकाशातील कांही किरण आपणास दिसत नाहीत जसे क्ष किरण (X ray ) ,इन्फ्रारेड (Infrared),अल्ट्राव्हायोलेट ( Altraviolet) परंतु या किरणांचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम आपणास दिसतात .तसेच १२५ हर्ट्स पेक्षा कमी व ४००० हर्ट्स पेक्षा जास्त हर्ट्स असलेल्या ध्वनी आपणास ऐकू येत नाहीत परंतु त्यांचे परिणाम आपल्या शरीरावर (स्थूल देह -ग्रॉस बॉडी),सूक्ष्म देह (Subtle Body) , कारण शरीर (Causal Body) यावर होतो.
sharadyogvigyan.blogspot.com
खुप सुंदर आहे अ उ अणि म चा शरिरावर होनरा परिणाम
ReplyDelete