Thursday, 11 June 2020

योगविज्ञान कपालभाती भाग २

Thursday 11th June  2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)


कपालभाती भाग २ 
   ३) कपालभातिमध्ये हृदयाचे उत्पादन (Cardiac Output) वाढते. त्यामुळे मेंदूचे भालीय प्रदेशात (Frontal Cortex) रक्तप्रवाह वाढतो. कपाळावर ओज, तेज,
आभा आणि चमक वाढते. यास भाल भाति असेही म्हणतात. त्याचप्रमाणे सुक्ष्म पातळीवर
पाहिल्यास मेंदूमध्ये प्राणशक्तिचा प्रवाह वाढतो. श्वसन संस्था आणि पचन संस्था चांगली कार्यान्वित रहाते.
   ४) कपालभातिमध्ये पोटांच्या स्नायुंची हालचाल झाल्यामुळे पाटातील महत्त्वाचे अवयवांचा सौम्य मसाज होतो व ते सक्रीय रहातात.
    ५) सामान्य शासनामध्ये श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. ऍन्ड्रे व्हॅन स्वेथ यांच्या प्राणायामावरील "The Yoga of Breathing" या पुस्तकात श्वासाचा परिणाम मेंदूवर होतो असे सांगितले आहे. मेंदूच्या भोवती जो द्रव (Cerebrospinal Fluid) असतो, ज्यामुळे मंदूचे संरक्षण होते. प्रत्येक शासाबरोबर (Inhalation) ह्या द्रवाचे आकुंचन होते आणि मेंदूवर सुक्ष्म दाब येतो आणि प्रश्वासाबरोबर रेचक (Exhalation) द्रवाचे प्रसरण होते. मेंदूवरील दाब कमी होतो. हा एक यांत्रिक प्रभाव असून प्रत्येक श्वास प्रश्वासाच्या क्रिया चक्राबरोबर हा
परिणाम दिसून येत असतो. कपालभातिमधील सक्रिय आणि प्रभावी रेचकाच्या क्रियेमुळे मेंदूवरील परिणाम सामान्य श्वसन क्रियेच्या काही पटीत वाढतो. त्यामुळे मेंदूचे कार्य
आणि सर्व मेंदू केंद्र सक्रिय होतात.कपालभातीमधील 50 ते 100 आवृत्तीबरोबर मेंदू ३ ते ७ पट उत्तेजित होतो.त्यामुले मन शांत, निर्विचारी आणि आकलनव ग्रहणशक्ती वाढते.
   ६)कपालभाती मध्ये प्राणवायूंचा वापर १.१  ते १.८ पट वाढतो. त्याचप्रमाणे मेंदूला ऑक्सिजन पूरवठा वाढतो.परानुकम्पा मज्जासंस्थाचा परिणाम अनुकंपा.          मज्जासंस्थेपेक्षा जास्त प्रभावी होतो.त्यामुळे मानसिक शांती  आणि भावनिक स्थिरता प्रदान होते.
     ७) कपालभातिमधील जलद हालचालीमुळे आम्ल आणि अल्कली यांचे प्रमाण (Acid base balance) समतोल रहाते.
      ८) कपालभातिमध्ये पायाभूत चयापचय दर (BMR) हा वाढतो. त्यामुळे शरिरात मेद (Fat) जमा होणे कमी होते. तसेच यकृतामध्ये Lipoprotein Lipase ची वाढ होते. ज्यामुळे रक्तामधील Triglycerides चे प्रमाण कमी होते. पोटाच्या हालचालीमुळे स्वादुपिंडाची मसाज होते. त्यामुळे Pancreatic Cell पून: निर्माण होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
    ९) सामान्य श्वसनामध्ये मेंदुमधील लम्ब मज्जा मध्ये  ( Medulla Oblongata) ज्याप्रमाणात काम करीत असतात त्यापेक्षा कपालभतीच्या श्वसनाच्या अभ्यासाने जास्त सक्रिय बनतात.
  १०) सामान्य स्वसनामध्ये श्वास घेताना (पूरक) स्वासपटल ,बरगड्यांचे स्नायु , श्वासनाचे स्नायु हे सक्रिय असतात.तर हेच स्नायु श्वास सोडताना (रेचक) निष्क्रिय किंवा शिथिल असतात. याचाच अर्थ श्वास घेताना प्रयत्न करावे लागतात.तर श्वास सोडताना प्रयत्नाविना ही क्रिया स्वयंचलित होते. वातक्रम कपालभाति मध्ये ही क्रिया उलट होते.याचा अर्थ रेचक प्रयत्नपूर्वक करावा लागतो,व पूरक आपोआप प्रयत्नाविना होतो. ह्या बदललेल्या क्रियेमुळे मेंदुमधील संवेदना मज्जातंतु व आज्ञामज्जातन्तु यांचा मार्ग बदलतो. त्यामुळे मेंदुतिल सुप्त मेन्दूकेंद्रे जागृत होतात.
   ११) सामान्य श्वसनामध्ये साधरण एक मिनीटाला पंधरावेळेस श्वास घेतला व सोडला जातो. कपालभाति मध्ये तो एका मिनिटाला ५० ते १०० वेळेस श्वास घेतला व सोडला जातो. त्यामुळे ही क्रिया सामान्य श्वसनापेक्षा ३ ते ७ पटीने होते. त्यामुळे जास्तीत जास्त कार्बन डाय ऑक्साइड व अनावश्यक वायु फुफ्फुसातुंन व शरीरातील पेशी पासून बाहेर फेकला जातो.

Sharad yog vigyan.blogspot.com

1 comment: