Wednesday 10 th June 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
कपालभाति प्राणायाम भाग १
कपालभातिचे शरिरावर होणारे परिणाम : सामान्य श्वसनात प्रत्येकवेळी ४५० ते ५०० मि.ली. हवा घेतली जाते व सोडली जाते. तर कपालभातिमध्ये फक्त १५० ते २०० मि.ली. हवा अर्ध्या सेकंदात घेतली व सोडली जाते. कपालभातिमध्ये श्वसन उथळ होते. परंतु श्वसनाची गती वाढल्याने दर मिनिटात घेतल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण जवळ जवळ तिप्पट होते. सामान्य श्वसनात दर मिनिटाला ७.५ ते ८ लिटर हवा घेतली जाते व कपालभातिमध्ये २० ते २१ लिटर हवा दर मिनिटाला घेतली जाते. त्यामुळे श्वसनतंत्राचे काम वाढल्याने प्राणवायु जास्त घेतला जातो. कर्बाम्लवायुही भरपुर प्रमाणात बाहेर टाकला जातो. कर्बाम्लबायु जास्त प्रमाणात बाहेर टाकला जात असल्याने कर्बाम्लवायुचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कपालभाति नंतर मेंदूतील श्वसनकेंद्र उत्तेजित होऊ शकत नाहीत.
कपालभाति नंतर बराच वेळ पर्यंत साधकास श्वास घेण्याची किंवा सोडण्याची गरज पडत नाही. यासच 'केवल' कुंभकाची स्थिती म्हणतात. त्यामुळे कपालभाति
नंतरचा आंतरकुंभक ३० ते ४५ सेकंद सहजतेने होतो. तर सामान्यतः कपालभाति न करता केलेला आंतरकुंभक १० ते १५ सेकंदाचा होतो. छातीचा भाग थोडा वर उचलून, फुलवून त्याच अवस्थेत कायम ठेवल्याने प्रत्येक रेचकाच्या वेळी मिळणाऱ्या धक्क्याचा दाग बरोबर फुफ्फुसावर वरच्या देशेने
सरळ रेखेत पडतो व श्वसनमार्ग प्रभावी रितीने स्वच्छ होतो.
कपालभाति सुरु असतांना हृदयाची गती १५ ते २५ ठोके प्रति मिनिट याप्रमाणे वाढते. सिस्टॉलिक (Systolic) रक्तदाब १० ते १२ मि.मी. ने वाढतो. हृदयाच्या खालच्या बाजूस श्वासपटलाच्या धक्क्याने दाब वाढण्याचाही संभव असतो. म्हणून उच्च रक्तदाब व हृदय रोग असणाऱ्यांनी कपालभाति हळुवार व योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा.
कपालभातिमधील पोटाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे मुलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्रावर विशेष दाब पडतो.
ज्या लोकांना तीर्व दमा किंवा दिर्घकालीन जुनाट फुफ्फुसांचे आजार असतात त्यांना सामान्य श्वसनाच्या वेळीही बरगड्यांच्या स्नायुंची जोरात हालचाल करावी
लागते. श्वसनाच्या स्नायुंना श्वास जोरात घेण्यासाठी जास्त शक्ती खर्च करावी लागते. त्यामुळे हे स्नायु लवकर थकतात. अशा लोकांनी दम्याचा त्रास नसतांना कपालभाति
सराव केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन :
१) कपालभातिचा अभ्यास जर शक्तिपूर्ण स्वरुपात १ ते ५ मिनिटासाठी केला तर शरिरातील जवळ जवळ प्रत्येक पेशीत कंपन निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक अवयव सक्रिय बनतात.
कपालभातित निर्माण केलेली स्पंदने रोहिणी, निला व केशरक्तवाहिन्यांपर्यंतही पोहोचतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये जमलेल्या रक्ताच्या गाठी (Thrombus) विरघळतात, कपालभातिमुळे हृदयातील रोहिणीतील (Coronary Artery) अवरोध (Blockage) दूर होतो. ही क्रिया आपणांस अशाप्रकारे समजून घेता येईल की, जेंव्हा मोटरकार उभी असते आणि गाडीचे इंजिन सुरु असते. त्यावेळी गाडीची नैसर्गिक कंपने (Frequency) आणि इंजिनची शक्ती कंपने लयबध्द झाल्याने मोटरकारमधे कंपने येतात. या कंपनास गाडीतील प्रवाशी सहजपणे अनुभवतात. ज्याप्रमाणे गाडीतील प्रवाश्यांना ही कंपने जाणवतात त्याच प्रमाणे कपालभातिमुळे झालेल्या कंपनांचा परिणाम शरिरातील रक्तवाहिन्यांमध्ये जर रक्तांच्या गाठी असतील तर त्यावर होतो. या कंपनामुळे त्या गाठी विरघळतात. अशाप्रकारे कपालभातिमुळे हदयातील रोहिणीमधील अवरोध दूर होतात आणि हार्टएटॅकचा धोका टळतो.
२) सामान्य शासनामध्ये श्वास घेण्याची क्रिया ही सक्रीय असते तर श्वास सोडण्याची क्रिया ही निष्क्रीय असते. परंतु कपालभातिमध्ये ही नैसर्गिक क्रिया विरुध्द होते. म्हणजेच श्वास सोडण्याची (रेचक) ही क्रिया सक्रीय असते आणि श्वास घेण्याची (पूरक) ही क्रिया निष्क्रीय होते. ह्यामुळे संवेदना मज्जातंतु (Sensary nerve) आणि आज्ञा मज्जातंतु (Motor nerve) या मध्ये बदल होतो. ह्यामुळे मेंदूत लंब मज्जामधील श्वास आणि प्रश्वास केंद्र सक्रीय बनतात.
Sharad yog vigyan.blogspot.com
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
कपालभाति प्राणायाम भाग १
कपालभातिचे शरिरावर होणारे परिणाम : सामान्य श्वसनात प्रत्येकवेळी ४५० ते ५०० मि.ली. हवा घेतली जाते व सोडली जाते. तर कपालभातिमध्ये फक्त १५० ते २०० मि.ली. हवा अर्ध्या सेकंदात घेतली व सोडली जाते. कपालभातिमध्ये श्वसन उथळ होते. परंतु श्वसनाची गती वाढल्याने दर मिनिटात घेतल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण जवळ जवळ तिप्पट होते. सामान्य श्वसनात दर मिनिटाला ७.५ ते ८ लिटर हवा घेतली जाते व कपालभातिमध्ये २० ते २१ लिटर हवा दर मिनिटाला घेतली जाते. त्यामुळे श्वसनतंत्राचे काम वाढल्याने प्राणवायु जास्त घेतला जातो. कर्बाम्लवायुही भरपुर प्रमाणात बाहेर टाकला जातो. कर्बाम्लबायु जास्त प्रमाणात बाहेर टाकला जात असल्याने कर्बाम्लवायुचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कपालभाति नंतर मेंदूतील श्वसनकेंद्र उत्तेजित होऊ शकत नाहीत.
कपालभाति नंतर बराच वेळ पर्यंत साधकास श्वास घेण्याची किंवा सोडण्याची गरज पडत नाही. यासच 'केवल' कुंभकाची स्थिती म्हणतात. त्यामुळे कपालभाति
नंतरचा आंतरकुंभक ३० ते ४५ सेकंद सहजतेने होतो. तर सामान्यतः कपालभाति न करता केलेला आंतरकुंभक १० ते १५ सेकंदाचा होतो. छातीचा भाग थोडा वर उचलून, फुलवून त्याच अवस्थेत कायम ठेवल्याने प्रत्येक रेचकाच्या वेळी मिळणाऱ्या धक्क्याचा दाग बरोबर फुफ्फुसावर वरच्या देशेने
सरळ रेखेत पडतो व श्वसनमार्ग प्रभावी रितीने स्वच्छ होतो.
कपालभाति सुरु असतांना हृदयाची गती १५ ते २५ ठोके प्रति मिनिट याप्रमाणे वाढते. सिस्टॉलिक (Systolic) रक्तदाब १० ते १२ मि.मी. ने वाढतो. हृदयाच्या खालच्या बाजूस श्वासपटलाच्या धक्क्याने दाब वाढण्याचाही संभव असतो. म्हणून उच्च रक्तदाब व हृदय रोग असणाऱ्यांनी कपालभाति हळुवार व योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा.
कपालभातिमधील पोटाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे मुलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्रावर विशेष दाब पडतो.
ज्या लोकांना तीर्व दमा किंवा दिर्घकालीन जुनाट फुफ्फुसांचे आजार असतात त्यांना सामान्य श्वसनाच्या वेळीही बरगड्यांच्या स्नायुंची जोरात हालचाल करावी
लागते. श्वसनाच्या स्नायुंना श्वास जोरात घेण्यासाठी जास्त शक्ती खर्च करावी लागते. त्यामुळे हे स्नायु लवकर थकतात. अशा लोकांनी दम्याचा त्रास नसतांना कपालभाति
सराव केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन :
१) कपालभातिचा अभ्यास जर शक्तिपूर्ण स्वरुपात १ ते ५ मिनिटासाठी केला तर शरिरातील जवळ जवळ प्रत्येक पेशीत कंपन निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक अवयव सक्रिय बनतात.
कपालभातित निर्माण केलेली स्पंदने रोहिणी, निला व केशरक्तवाहिन्यांपर्यंतही पोहोचतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये जमलेल्या रक्ताच्या गाठी (Thrombus) विरघळतात, कपालभातिमुळे हृदयातील रोहिणीतील (Coronary Artery) अवरोध (Blockage) दूर होतो. ही क्रिया आपणांस अशाप्रकारे समजून घेता येईल की, जेंव्हा मोटरकार उभी असते आणि गाडीचे इंजिन सुरु असते. त्यावेळी गाडीची नैसर्गिक कंपने (Frequency) आणि इंजिनची शक्ती कंपने लयबध्द झाल्याने मोटरकारमधे कंपने येतात. या कंपनास गाडीतील प्रवाशी सहजपणे अनुभवतात. ज्याप्रमाणे गाडीतील प्रवाश्यांना ही कंपने जाणवतात त्याच प्रमाणे कपालभातिमुळे झालेल्या कंपनांचा परिणाम शरिरातील रक्तवाहिन्यांमध्ये जर रक्तांच्या गाठी असतील तर त्यावर होतो. या कंपनामुळे त्या गाठी विरघळतात. अशाप्रकारे कपालभातिमुळे हदयातील रोहिणीमधील अवरोध दूर होतात आणि हार्टएटॅकचा धोका टळतो.
२) सामान्य शासनामध्ये श्वास घेण्याची क्रिया ही सक्रीय असते तर श्वास सोडण्याची क्रिया ही निष्क्रीय असते. परंतु कपालभातिमध्ये ही नैसर्गिक क्रिया विरुध्द होते. म्हणजेच श्वास सोडण्याची (रेचक) ही क्रिया सक्रीय असते आणि श्वास घेण्याची (पूरक) ही क्रिया निष्क्रीय होते. ह्यामुळे संवेदना मज्जातंतु (Sensary nerve) आणि आज्ञा मज्जातंतु (Motor nerve) या मध्ये बदल होतो. ह्यामुळे मेंदूत लंब मज्जामधील श्वास आणि प्रश्वास केंद्र सक्रीय बनतात.
Sharad yog vigyan.blogspot.com
खुप सुंदर माहित कपालभती बद्दल
ReplyDelete