Friday 5th June 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
ओंकार विज्ञान भाग १
योग साधनेत ओमकाराचे फार महत्व आहे. त्याच्या जपाने मनाची एकाग्रता साधन्यास व चित्तसमाधि अवस्थेत जाण्यास मदत होते. योग वशिष्ठ ग्रंथात म्हटलेले आहे की, मन व विचारांची गती आपण वेगळी करु शकत नाही. मात्र एकाची गती रोखली की, दुसऱ्याची म्हणजेच विचारांची गती रोखु शकतो. मन आणि प्राण यांचा फार जवळचा संबंध आहे. चित्तातील वृत्तीमुळे प्राणाला व पर्यायाने मनाला म्हणजेच विचारांना गती येते. प्राणाला नियंत्रित केले तर मनावरही नियंत्रण येते व विचारही थांबतात. प्राणाची गती विशिष्ठ श्वसनाने म्हणजेच प्राणायामाने रोखू शकतो. तद्वत् ॐकार जप केल्यानेही प्राणावर नियंत्रण आणू शकतो. म्हणजेच ऊँ चा उच्चार करणे हा देखील एक प्रकारचा प्राणायाणच आहे.
ॐ कारावरील संशोधन : ॐ कार जपावर आजपर्यंत बरेच संशोधन झाले आहे. त्याचे निष्कर्ष असे आहेत की, अगदी खालच्या आवाजात (खर्जात) जप १० वेळा केला तर मन आतमध्ये वळते, शांत व एकाग्र होते. याच्या उलट जर ॐ चा उच्चार उच्च स्वरात केला तर मात्र लक्ष बाहेरच अधिक राहते व उत्तेजित अवस्थेत राहते. मेंदूचा आलेख, रक्तदाब, हृदयगती, त्वचेचा विद्युत प्रतिरोध यावरुन असे आढळले आहे की, 'ॐ' कार खालच्या आवाजात व 'म' कार लांबवून केल्याने परानुकंपी स्वायत्तमज्जा संस्थेचा प्रभाव वाढतो. म्हणूनच हृदयगती, रक्तदाब, श्वसनगती कमी होते. मात्र उच्चस्वरात १० वेळा ॐ म्हंटल्यास हृदयगती, श्वसनगती व जबड्यांच्या स्नायुंचे कार्य किंचित वाढते. उत्तेजना वाढते म्हणजे अनुकंपी स्वायत्त मज्जा संस्थेचा पगडा जास्त होतो. खालच्या आवाजात ॐ कार म्हंटल्याने मानसिक शांतीचा अनुभव जास्तीत जास्त मिळतो. अवर्णनीय आनंद व प्रसन्नता अंतर्मनास अनुभवास येते. रोज सकाळ संध्याकाळ २०-२० वेळा मध्यम आवाजात ॐ जप केल्याने नैराश्य (Depression) व चिंतारोग (Anxiety) कमी होते. मानसिक स्थिरता, संतुलन वाढते. स्मरणशक्ति, आकलन शक्ति वाढते. ॐ जप केल्याने मतिमंद मुलाची बुध्दी कुशाग्र होते.
भारतातील दोन शास्त्रज्ञांनी अजय गुर्जर आणि सिध्दार्थ लढाके यांनी ओम् कार (Om Chanting) यावर संशोधन करुन २००८ मधे International Journal of Computer Science and Network Security मधे एक पेपर लिहिला. त्या पेपरचे नाव " Time Frequency Analysis of Chanting Sanskrit Divine Sound "Om" असे आहे. दोन्ही शास्त्रज्ञ Electronic Signal Processing मधील तज्ञ असून त्यांनी सांगितले की, ओंकार हा अध्यात्मिक मंत्र असून त्याच्या उच्चाराने मानसिक शांती
मिळते तसेच अनावश्यक विचार कमी होतात. त्यांनी सामान्य माणसाची ओम उच्चारणाच्या वेळी डिजिटल रेकॉर्डिक केली आणि नंतर काही दिवसांच्या सरावा नंतर डिजिटल रेकॉर्डिंग केली. त्या दोन्हीमध्ये फरक दिसून आला. ओम् उच्चाराने मेंदूतील लहरी अल्फा लहरी प्रमाणे लहान होतात व त्यामुळे मानसिक शांतता मिळते.तसेच योगीमध्ये मानसिक स्थिरता, एकाग्रता , सजगता वाढते. हे सिद्ध झाले.
Sharadyogigyan.blogspot.com
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
ओंकार विज्ञान भाग १
योग साधनेत ओमकाराचे फार महत्व आहे. त्याच्या जपाने मनाची एकाग्रता साधन्यास व चित्तसमाधि अवस्थेत जाण्यास मदत होते. योग वशिष्ठ ग्रंथात म्हटलेले आहे की, मन व विचारांची गती आपण वेगळी करु शकत नाही. मात्र एकाची गती रोखली की, दुसऱ्याची म्हणजेच विचारांची गती रोखु शकतो. मन आणि प्राण यांचा फार जवळचा संबंध आहे. चित्तातील वृत्तीमुळे प्राणाला व पर्यायाने मनाला म्हणजेच विचारांना गती येते. प्राणाला नियंत्रित केले तर मनावरही नियंत्रण येते व विचारही थांबतात. प्राणाची गती विशिष्ठ श्वसनाने म्हणजेच प्राणायामाने रोखू शकतो. तद्वत् ॐकार जप केल्यानेही प्राणावर नियंत्रण आणू शकतो. म्हणजेच ऊँ चा उच्चार करणे हा देखील एक प्रकारचा प्राणायाणच आहे.
ॐ कारावरील संशोधन : ॐ कार जपावर आजपर्यंत बरेच संशोधन झाले आहे. त्याचे निष्कर्ष असे आहेत की, अगदी खालच्या आवाजात (खर्जात) जप १० वेळा केला तर मन आतमध्ये वळते, शांत व एकाग्र होते. याच्या उलट जर ॐ चा उच्चार उच्च स्वरात केला तर मात्र लक्ष बाहेरच अधिक राहते व उत्तेजित अवस्थेत राहते. मेंदूचा आलेख, रक्तदाब, हृदयगती, त्वचेचा विद्युत प्रतिरोध यावरुन असे आढळले आहे की, 'ॐ' कार खालच्या आवाजात व 'म' कार लांबवून केल्याने परानुकंपी स्वायत्तमज्जा संस्थेचा प्रभाव वाढतो. म्हणूनच हृदयगती, रक्तदाब, श्वसनगती कमी होते. मात्र उच्चस्वरात १० वेळा ॐ म्हंटल्यास हृदयगती, श्वसनगती व जबड्यांच्या स्नायुंचे कार्य किंचित वाढते. उत्तेजना वाढते म्हणजे अनुकंपी स्वायत्त मज्जा संस्थेचा पगडा जास्त होतो. खालच्या आवाजात ॐ कार म्हंटल्याने मानसिक शांतीचा अनुभव जास्तीत जास्त मिळतो. अवर्णनीय आनंद व प्रसन्नता अंतर्मनास अनुभवास येते. रोज सकाळ संध्याकाळ २०-२० वेळा मध्यम आवाजात ॐ जप केल्याने नैराश्य (Depression) व चिंतारोग (Anxiety) कमी होते. मानसिक स्थिरता, संतुलन वाढते. स्मरणशक्ति, आकलन शक्ति वाढते. ॐ जप केल्याने मतिमंद मुलाची बुध्दी कुशाग्र होते.
भारतातील दोन शास्त्रज्ञांनी अजय गुर्जर आणि सिध्दार्थ लढाके यांनी ओम् कार (Om Chanting) यावर संशोधन करुन २००८ मधे International Journal of Computer Science and Network Security मधे एक पेपर लिहिला. त्या पेपरचे नाव " Time Frequency Analysis of Chanting Sanskrit Divine Sound "Om" असे आहे. दोन्ही शास्त्रज्ञ Electronic Signal Processing मधील तज्ञ असून त्यांनी सांगितले की, ओंकार हा अध्यात्मिक मंत्र असून त्याच्या उच्चाराने मानसिक शांती
मिळते तसेच अनावश्यक विचार कमी होतात. त्यांनी सामान्य माणसाची ओम उच्चारणाच्या वेळी डिजिटल रेकॉर्डिक केली आणि नंतर काही दिवसांच्या सरावा नंतर डिजिटल रेकॉर्डिंग केली. त्या दोन्हीमध्ये फरक दिसून आला. ओम् उच्चाराने मेंदूतील लहरी अल्फा लहरी प्रमाणे लहान होतात व त्यामुळे मानसिक शांतता मिळते.तसेच योगीमध्ये मानसिक स्थिरता, एकाग्रता , सजगता वाढते. हे सिद्ध झाले.
Sharadyogigyan.blogspot.com
This is really wonderful information about omkar the thing which we chant regularly but don't know the different aspects of are depicted beautifully .thank you sir .
ReplyDeleteDr Archana Mudkhedkar
ReplyDelete