Monday, 11 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ५


Sunday, 10th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ५
      समुद्रसपाटीवर हवेचा दाब ७६० mm Hg आणि ऑक्सिजनचा दाब१५० mm Hg असतो. समुद्रसपाटीपासून जितके उंच जावे तितका हवेचा दाब कमी होत जातो.हवेतील प्राणवायूचे प्रमाण ही कमी होत जाते.हिमालयसारख्या उंच पर्वतीय भागात माउंट एव्हरेस्टवर हवेचा दाब २२५ mmHg    तर ऑक्सिजनचा ४२ mm Hg एव्हढा असतो.समुद्राखाली १६५ फूट खोलवर हवेचा दाब ४५०० mm Hg, तर ऑक्सिजनचा ९००mm Hg एवढाअसतो.हिमालायसारख्या उंच पर्वतीय भागावर कुठलेही काम करतांना जास्त थकवा जाणवतो.श्वसनाच्या आणि रक्ताभिसरणाच्या क्रियेवर, प्राणवायूच्या कमतरतेमुळे जास्त ताण जाणवतो. प्राणायामाचा समुद्रसपाटीवर असताना चांगला अभ्यास केलेला असल्यास उंच पर्वतीय प्रदेशात गेल्यावर येणारा हा ताण कमी जाणवतो.व बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन शरीरास समस्थिती राखण्याचे काम जास्त लवकर व जास्त चांगल्या प्रकारे हाऊ शकते.
       सर्वसाधारणपणे हृदयाचे कार्य, रक्ताभिसरण,चयापचय क्रियेचा वेग आणि नियमनहे स्वायत्त (अनैच्छिक) मज्जासंस्थेद्वारे होत असते. परंतु प्राणायामाच्या। विशेषकरून कुंभकस्थितीचा दीर्घकाळ अभ्यास केल्याने एरवी या अनैच्छिक नियंत्रणाबाहेर असणाऱ्या क्रियांवर हवा तसा प्रभाव पाडण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. त्याद्वारे हृदयगतीचा वेग कमी करता येणे,श्वासोच्छश्वासाची गती कमी होणे,शरीरातील वेगवेगळ्या भागात रक्ताचे अभिसरंण कमी जास्त करता येणे,चयापचय क्रियेचा वेग कमी करून शाररिक उर्जेचा कमीत कमी वापर होईल असे करता येणे या गोष्टी साध्य होऊ शकतात.
        उज्जयी, भ्रामरी, भस्त्रिका , कपालभाती अनुलोम- विलोम यांचा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम जवळजवळ सारखाच असतो.सर्व परीक्षणात मेंदूच्या विद्युत आलेखात (E.E.G) अल्फा तरंगाची प्रकर्षाने वाढ झाल्याचे दिसते.ज्यावेळी मन हे अतिशय सजग परंतु शांत अश्या ध्यानाच्या अवस्थेत जाते त्यावेळी हे अल्फा तरंग अधिक प्रमाणात असतात.
     मेंदूवर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून घेण्यासाठी एक प्रयोग केला गेला.ज्यामध्ये आठ योग साधकांच्या समूहाने रोज दोन वेळेस ५ ते १० मिनिटे भ्रामरी प्राणायाम चार महिने केला.मेंदूतील थिटा आणि अल्फा तरंग वाढले होते जे साधारण खोल ध्यानाच्या अवस्थेत दिसून येतात.त्यामुळे परमानंदाची भावना येते.सजग असूनही विचारशून्य अवस्था निर्माण होते.ताणतणाव नष्ट होतो.म्हणून भ्रामरी प्राणायामाचा तणाव घालविण्यासाठी प्रभावी उपचार म्हणून केला जातो.
     आपल्या शरीरात लागणारी ऊर्जा फक्त आपल्या आहारातूनच मिळते असे नाही तर श्वासावाटे घेतलेल्या हवेतूनही मिळते.शास्त्रज्ञांच्या शोधातून असे निष्पन्न झाले आहे की, आपल्या शरीरात असणारे Adenosine Tri Phosphate (A T P) ह्या रसायनापासून ऊर्जा मिळते आणि हे A T P कमी किंवा हे रसायन तयार होण्यास कांही समस्या निर्माण झाल्यास जीवनशक्ती, उत्साह कमी होतो व रोग होऊ शकतो. हे A T P रसायन तयार होण्यासाठी प्राणवायूची (Oxigen) ची नितांत गरज असते. प्राणायमामध्ये ह्या महत्वाच्या A T P मध्ये वाढ होते.

Sharad yogvigyan.blogspot.com

2 comments:

  1. Thanks for sharing this scientific & valuable information....Hari Om

    ReplyDelete