Tuesday 12th May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ६
नाकाने श्वास घेतल्यामुळे १० ते १५ % प्राणवायू रक्तामध्ये जास्त प्रमाणात मिसळतो.हे नाकातील सायनसेस मध्ये तयार होणाऱ्या नायट्रिक ऑक्साईडमूळे (Nitric Oxide) शक्य होते.हा शोध १९९५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या तीन शास्त्रज्ञानी लावला.हा शोध लागण्यापूर्वी नायट्रिक ऑक्साईड म्हणजे वातावरणातील दूषित वायू समजला जात असे.परंतु या शोधामुळे हा नायट्रिक ऑक्साईड वायू महत्वाचा असून तो नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातच तयार होतो. ह्या वायूमुळे शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व रक्त प्रवाह वाढतो.जेव्हा नायट्रिक ऑक्साईड नाकामधून हवेबरोबर फुफ्फुसात जातो त्यावेळी वायुकोषातील (Alveoli) रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो व ऑक्सिजन व कर्बाम्लवायूची देवाणघेवाण वाढते.तोंडाने श्वास घेतल्यावर हे शक्य होत नाही.हे फक्त नाकाने श्वास घेतल्यावरच शक्य होते.कारण नायट्रिक ऑक्साईड नाकातच तयार होते.जेंव्हा एखादा व्हेंटिलेटरवर (Respirator) असेल तरी हा परिणाम दिसत नाही.कारण श्वासोच्छवास हा तोंडाने चालू असतो.अशावेळी बाहेरून नायट्रिक ऑक्साईड दिले तरी हा परिणाम दिसत नाही.कारण हा नायट्रिक ऑक्साईड नैसर्गिक नसतो.नायट्रिक ऑक्साईडमुळे रक्ताभिसरण वाढते,वेदना कमी होतात,वजन कमी होते,ऊर्जा शक्ती वाढते,रोग प्रतिकारक शक्ती वाढते,पचनक्रिया सुधारते,आळस कमी होतो,मेंदूचे कार्य सुधारते याचाच अर्थ हे सर्व फायदे नाकाने श्वास घेतल्याने होतात.
उज्जयी प्राणयामामुळे १७ % ने हृदयाचे उत्पादन (cardiac output) वाढते व हृदयाची गती कमी होते.जेंव्हा कुंभकाशिवाय उज्जयी प्राणायाम केला जातो.
प्राणायमच्या अभ्यासाने प्राण आणि अपान एकत्र येवून वरच्या दिशेने प्रवाहित होतात.त्यावेळी इडा आणि पिंगळा स्वर सम स्थितीत येतात.अशावेळी प्राण हा सुषुम्नेतून वाहू लागतो. त्यावेळी ज्ञानप्रकाश प्रदीप्त होतो.कुंडलिनी जागृत होते.मन विचारशून्य अवस्थेत येते.कर्म बीज जळून भस्म होतात आणि मस्तिष्कामधील सुप्त केंद्र जागृत होतात. ज्ञानाचा प्रकाश प्रदीप्त होतो.साधारणपणे आपणास ज्ञान है सर्व इन्द्रीयपासुन प्राप्त होते.परंतु योगामधे मस्तिष्क,मन आणि चेतना यांना इन्द्रीयपासुन परावृत्त करून ज्ञान प्राप्ति होते.यालाच कुंडलिनी शक्ति जागृति म्हणतात.
विज्ञानानुसार मानवाचा जेंव्हा विकास सामान्यतः होत असतो त्यावेळी त्याच्या मेंदुमधील ग्रेमॅटर (Grey matter) मध्ये परिवर्तन होत असते. प्राणायमच्या ह्या अभ्यासाने हा विकास स्वाभाविक पेक्षा जलद गतीने होतो.
सामान्य श्वसन ही एक अनैच्छिक क्रिया असून अचेतन मनाने ती चालू असते. त्यावेळी मोठा मेंदू (cerebral cortex) ऐवजी लहान मेंदू द्वारे (Medulla Oblongata) कार्य चालू असते.प्रणायामामधे सजगता ही कायम श्वासावर असते.त्यामुळे चेतन श्वसन (ऐच्छिक श्वसन )हे मोठा मेंदुच्या नियंत्रणाखाली कार्य करते.नियमित प्राणायमाच्या अभ्यासाने मोठ्या मेंदुचे नियंत्रण कार्य जास्त प्रभावशाली बनते व जास्त विकसित होतो.या प्रक्रियेस टेलीन्सफलायझेशन (telencephalization) असे म्हणतात.चेतन श्वसन है मनावर शांतिदायक परिणाम करतो.त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.म्हणूनच क्रोधामधे ,भीतिमधे,वेदनेमधे लांब लांब - दीर्घ श्वास घ्यावयास सांगीतले जाते.त्यामुळे मन शांत होते.
Sharad yog vigyan.blogspot.com
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ६
नाकाने श्वास घेतल्यामुळे १० ते १५ % प्राणवायू रक्तामध्ये जास्त प्रमाणात मिसळतो.हे नाकातील सायनसेस मध्ये तयार होणाऱ्या नायट्रिक ऑक्साईडमूळे (Nitric Oxide) शक्य होते.हा शोध १९९५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या तीन शास्त्रज्ञानी लावला.हा शोध लागण्यापूर्वी नायट्रिक ऑक्साईड म्हणजे वातावरणातील दूषित वायू समजला जात असे.परंतु या शोधामुळे हा नायट्रिक ऑक्साईड वायू महत्वाचा असून तो नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातच तयार होतो. ह्या वायूमुळे शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व रक्त प्रवाह वाढतो.जेव्हा नायट्रिक ऑक्साईड नाकामधून हवेबरोबर फुफ्फुसात जातो त्यावेळी वायुकोषातील (Alveoli) रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो व ऑक्सिजन व कर्बाम्लवायूची देवाणघेवाण वाढते.तोंडाने श्वास घेतल्यावर हे शक्य होत नाही.हे फक्त नाकाने श्वास घेतल्यावरच शक्य होते.कारण नायट्रिक ऑक्साईड नाकातच तयार होते.जेंव्हा एखादा व्हेंटिलेटरवर (Respirator) असेल तरी हा परिणाम दिसत नाही.कारण श्वासोच्छवास हा तोंडाने चालू असतो.अशावेळी बाहेरून नायट्रिक ऑक्साईड दिले तरी हा परिणाम दिसत नाही.कारण हा नायट्रिक ऑक्साईड नैसर्गिक नसतो.नायट्रिक ऑक्साईडमुळे रक्ताभिसरण वाढते,वेदना कमी होतात,वजन कमी होते,ऊर्जा शक्ती वाढते,रोग प्रतिकारक शक्ती वाढते,पचनक्रिया सुधारते,आळस कमी होतो,मेंदूचे कार्य सुधारते याचाच अर्थ हे सर्व फायदे नाकाने श्वास घेतल्याने होतात.
उज्जयी प्राणयामामुळे १७ % ने हृदयाचे उत्पादन (cardiac output) वाढते व हृदयाची गती कमी होते.जेंव्हा कुंभकाशिवाय उज्जयी प्राणायाम केला जातो.
प्राणायमच्या अभ्यासाने प्राण आणि अपान एकत्र येवून वरच्या दिशेने प्रवाहित होतात.त्यावेळी इडा आणि पिंगळा स्वर सम स्थितीत येतात.अशावेळी प्राण हा सुषुम्नेतून वाहू लागतो. त्यावेळी ज्ञानप्रकाश प्रदीप्त होतो.कुंडलिनी जागृत होते.मन विचारशून्य अवस्थेत येते.कर्म बीज जळून भस्म होतात आणि मस्तिष्कामधील सुप्त केंद्र जागृत होतात. ज्ञानाचा प्रकाश प्रदीप्त होतो.साधारणपणे आपणास ज्ञान है सर्व इन्द्रीयपासुन प्राप्त होते.परंतु योगामधे मस्तिष्क,मन आणि चेतना यांना इन्द्रीयपासुन परावृत्त करून ज्ञान प्राप्ति होते.यालाच कुंडलिनी शक्ति जागृति म्हणतात.
विज्ञानानुसार मानवाचा जेंव्हा विकास सामान्यतः होत असतो त्यावेळी त्याच्या मेंदुमधील ग्रेमॅटर (Grey matter) मध्ये परिवर्तन होत असते. प्राणायमच्या ह्या अभ्यासाने हा विकास स्वाभाविक पेक्षा जलद गतीने होतो.
सामान्य श्वसन ही एक अनैच्छिक क्रिया असून अचेतन मनाने ती चालू असते. त्यावेळी मोठा मेंदू (cerebral cortex) ऐवजी लहान मेंदू द्वारे (Medulla Oblongata) कार्य चालू असते.प्रणायामामधे सजगता ही कायम श्वासावर असते.त्यामुळे चेतन श्वसन (ऐच्छिक श्वसन )हे मोठा मेंदुच्या नियंत्रणाखाली कार्य करते.नियमित प्राणायमाच्या अभ्यासाने मोठ्या मेंदुचे नियंत्रण कार्य जास्त प्रभावशाली बनते व जास्त विकसित होतो.या प्रक्रियेस टेलीन्सफलायझेशन (telencephalization) असे म्हणतात.चेतन श्वसन है मनावर शांतिदायक परिणाम करतो.त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.म्हणूनच क्रोधामधे ,भीतिमधे,वेदनेमधे लांब लांब - दीर्घ श्वास घ्यावयास सांगीतले जाते.त्यामुळे मन शांत होते.
Sharad yog vigyan.blogspot.com
No comments:
Post a Comment