Wednesday 13th May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ७
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ७
कुंडलीनी शक्तीचे निवासस्थान मूलाधार चक्रात आहे सामान्यतः कुंडलिनी ही मूलाधार चक्रामध्ये सुप्तावस्थेत असते. प्राणायमातील कुंभकाच्यावेळी मूलाधार चक्रातील तापमान वाढते आणि ऑक्सीजनचेही प्रमाण कमी होवून नगण्य होते.त्यामुळे कुण्डलिनीचे घुटन होते.मस्तिष्क मधील मेंदू तरंग न्यूनतम होतात. त्यावेळी मूलाधारमधे तरंगे उत्पन्न होतात.यासच कुण्डलिनी जागरण म्हणतात.
श्वासोच्छवासाचा वेग,हृदय स्पंदनाची गति आणि स्वायत्तमज्जासंस्था यांचा परस्पराशी संबंध आहे.जेंव्हा श्वासोच्छवासाचा दर कमी होतो,५ ते ६ श्वासोच्छवास / मिनिट त्यावेळी सर्वांचिच तालबध्दता (Rhythm) कमी होते.त्यावेळी निश्चलता ,शांतता व हॄदयाचे स्पंदन मंद होते. (Bradicardia) ,ब्लडप्रेसर कमी होते (Hypotention),रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.(Hypoglycemia) हे परिणाम दिसून येतात.प्राणायमच्या अभ्यासाने श्वसनाचा दर कमी करता येतो याचाच अर्थ वरील सर्व परिणाम प्राणायामाने दिसून येतात.
बहुतांशी लोक चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करतात. ते त्यांच्या फुफ्फुसाच्या क्षमतेच्या कांही भागाचाच वापर करतात.अशा माणसांचा श्वास खूप उथळ असतो. अशा श्वासातून मिळणारा ऑक्सिजन हा अपुरा असतो.त्यामुळे कार्य करण्यास प्राणशक्ती कमी पडते.त्यामुळे योग्य पद्धतीने श्वास घेण्याची आणि सोडण्याचे तंत्र शिकून घेणे आवश्यक आहे .जे प्राणायामाच्या माध्यमातून शिकवले जाते.जेंव्हा योग्य पद्धतीने श्वास चालू रहातो त्यावेळी त्यास चांगले वाटावयास लागते.जेंव्हा श्वास अयोग्य पद्धतीने व बिना जाणिवेणे घेण्याची सवय लागते त्यावेळी रोग निर्माण होतात.
प्राचीन काळी योगी आणि ऋषी यांच्या निदर्शनास आले की, अजगर,हत्ती,कासव या सारख्या प्राण्यांचा श्वास अगदी मंद गतीने चालतो.त्यामुळे हे प्राणी जास्त दिवस जगतात.या उलट पक्षी,कुत्रा,ससा यांचा श्वास जलद गतीने चालतो.त्यामुळे त्यांचे आयुष्यमान कमी असते.यापासून योगीच्या लक्षात आले की मंद श्वासामुळे दीर्घायुष्य लाभते.
भौतिक दृष्ट्या श्वासाचा थेट संबंध हृदयाशी येतो.मंद श्वास गतीमुळे हृदयास विश्रांती मिळते.त्यामुळे त्याचे चांगले पोषण होते.व ते मजबूत बनते,त्यामुळे दीर्घायुषी बनण्यास त्याचे योगदान मिळते.
प्राणायामाच्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेस यौगिक श्वसन (yogic breathing) करावयास सांगितले जाते.ज्यामध्ये जास्तीतजास्त हवा फुफ्फुसात घेतली जाते.त्यामुळे वायूकोष (Alveoli) जास्तीतजास्त फुगतात.त्यामुळे जास्तीतजास्त हवेची देवाणघेवाण होते.सामान्य श्वसनामध्ये ५०० ml हवा घेतली जाते.तर यौगिक श्वसनामध्ये ५००० ml हवा घेतली जाते.त्यामुळे शरीरास जास्तीतजास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो.सामान्य श्वसनामध्ये ज्या वायू कोषापर्यंत पर्यंत हवा जात नाही त्या वायूकोषापर्यंत यौगिक श्वसनामध्ये हवा पोहोंचते. व त्या सक्रिय बनतात.वायूकोष बरेच दिवस बंद स्थितीत राहिल्यास तेथे स्त्राव जमा होतो व त्याचा संसर्ग होऊन रोग निर्माण होऊ शकतो.
प्राणायामाच्या अभ्यासाने शाररिक व भौतिक लाभ होतात हे विज्ञानाने सिद्ध झालेच असून शिवाय त्याचा शरीरातील आंतरिक अवयव तसेच शाररिक क्रिया प्रणाली वर सकारात्मक परिणाम होतो.तसेच प्राणिक आणि मानसिक संतुलन साधुन जानिवेचि उच्च पातळी आणि मेंदुतील केंद्र जागृत करणे हाच प्राणायामाचा मुख्य उद्देश्य आहे. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्ति(जीवनी शक्ति) पोहोंचवणे हा प्राणायमाचा हेतु आहे.
Sharadyogvigyan.blogspot.com
बहुतांशी लोक चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करतात. ते त्यांच्या फुफ्फुसाच्या क्षमतेच्या कांही भागाचाच वापर करतात.अशा माणसांचा श्वास खूप उथळ असतो. अशा श्वासातून मिळणारा ऑक्सिजन हा अपुरा असतो.त्यामुळे कार्य करण्यास प्राणशक्ती कमी पडते.त्यामुळे योग्य पद्धतीने श्वास घेण्याची आणि सोडण्याचे तंत्र शिकून घेणे आवश्यक आहे .जे प्राणायामाच्या माध्यमातून शिकवले जाते.जेंव्हा योग्य पद्धतीने श्वास चालू रहातो त्यावेळी त्यास चांगले वाटावयास लागते.जेंव्हा श्वास अयोग्य पद्धतीने व बिना जाणिवेणे घेण्याची सवय लागते त्यावेळी रोग निर्माण होतात.
प्राचीन काळी योगी आणि ऋषी यांच्या निदर्शनास आले की, अजगर,हत्ती,कासव या सारख्या प्राण्यांचा श्वास अगदी मंद गतीने चालतो.त्यामुळे हे प्राणी जास्त दिवस जगतात.या उलट पक्षी,कुत्रा,ससा यांचा श्वास जलद गतीने चालतो.त्यामुळे त्यांचे आयुष्यमान कमी असते.यापासून योगीच्या लक्षात आले की मंद श्वासामुळे दीर्घायुष्य लाभते.
भौतिक दृष्ट्या श्वासाचा थेट संबंध हृदयाशी येतो.मंद श्वास गतीमुळे हृदयास विश्रांती मिळते.त्यामुळे त्याचे चांगले पोषण होते.व ते मजबूत बनते,त्यामुळे दीर्घायुषी बनण्यास त्याचे योगदान मिळते.
प्राणायामाच्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेस यौगिक श्वसन (yogic breathing) करावयास सांगितले जाते.ज्यामध्ये जास्तीतजास्त हवा फुफ्फुसात घेतली जाते.त्यामुळे वायूकोष (Alveoli) जास्तीतजास्त फुगतात.त्यामुळे जास्तीतजास्त हवेची देवाणघेवाण होते.सामान्य श्वसनामध्ये ५०० ml हवा घेतली जाते.तर यौगिक श्वसनामध्ये ५००० ml हवा घेतली जाते.त्यामुळे शरीरास जास्तीतजास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो.सामान्य श्वसनामध्ये ज्या वायू कोषापर्यंत पर्यंत हवा जात नाही त्या वायूकोषापर्यंत यौगिक श्वसनामध्ये हवा पोहोंचते. व त्या सक्रिय बनतात.वायूकोष बरेच दिवस बंद स्थितीत राहिल्यास तेथे स्त्राव जमा होतो व त्याचा संसर्ग होऊन रोग निर्माण होऊ शकतो.
प्राणायामाच्या अभ्यासाने शाररिक व भौतिक लाभ होतात हे विज्ञानाने सिद्ध झालेच असून शिवाय त्याचा शरीरातील आंतरिक अवयव तसेच शाररिक क्रिया प्रणाली वर सकारात्मक परिणाम होतो.तसेच प्राणिक आणि मानसिक संतुलन साधुन जानिवेचि उच्च पातळी आणि मेंदुतील केंद्र जागृत करणे हाच प्राणायामाचा मुख्य उद्देश्य आहे. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्ति(जीवनी शक्ति) पोहोंचवणे हा प्राणायमाचा हेतु आहे.
Sharadyogvigyan.blogspot.com
No comments:
Post a Comment