*योग विज्ञान शृंखला* 🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग ४
स्नायूंचे शिथलिकारण ही एक सक्रिय क्रिया आहे. तरुणांमध्ये कांही स्नायू कायम आकुंचनाच्या स्थितीत असतात. जसे पाठीचे स्नायू(Erector spinae) जे बसण्याच्या आणि उभे राहण्याच्या स्थितीत राहण्यासाठी मदत करतात.त्यांच्यावर स्वेच्छेने नियंत्रण प्राप्त करता येते. शिथलिकरणासाठी लागणारी ऊर्जा कॅल्शियमचे आयन (ca++) पासून मिळते. जे स्नायूमधील सारकोप्लाजमिक रेटिकुलम (sarcoplasmic Reticulum) मधील ऍक्टिनॉमिओसीन (Actinomyocin) पासून कॅल्शिअम आयन मिळतात. रक्तातील कॅल्शिअम कमी झाल्यास स्नायूमधील ताण वाढतो.
शवासनामध्ये आपण मुद्दाम एका नंतर एक स्नायूंचे शितलीकरण करीत जातो. शितलीकरणाची क्रिया हळूहळू रक्तवाहिन्यातील स्नायू (Smooth muscles) पर्यंत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो.
आसनामध्ये स्नायू जास्त वेळ आकुंचन स्थितीमध्ये राहिल्यामुळे तेथे हैपोक्सिया (Hypoxia कमी ऑक्सिजन असण्याची स्थिती) होतो. असे निदर्शनास आले आहे की, स्नायूपासून मिळालेला स्टेम सेल्स( stem cells) जर हैपोक्सिक वातावरणात ( ६% ऑक्सिजन) राहिला तर ते माँयोसाईट्स मध्ये (Myocytes) रूपांतरित होतात आणि त्यापासून स्नायू बनतो. परंतु तोच स्टेम सेल २०% ऑक्सिजनच्या वातावरणात वाढला तर त्याचा ऍडीपोसाईट्स (Adipocytes) म्हणजेच मेद ( Fat) वृद्धिमध्ये रुपांतरित होते. म्हणून नेहमी आसन कारणाऱ्यात लठ्ठपणा दिसून येत नाही.कारण आसनामुळे स्नायू हायपोक्सिया स्थितीत जातात.
आसन ही शरीराची विशिष्ट स्थिती असून त्याचा प्राण प्रवाह मेंदूच्या ठराविक केंद्रापर्यंत जातो. हाटयोगामध्ये आसनात प्राण प्रवाहाचे शुद्धीकरण करून पुन:रचनेद्वारा शरीरावर नियंत्रण आणले जाते.
आसनाच्या सततच्या सरावाने आसनामध्ये स्थिरता येते. कारण प्राण प्रवाह हा मुक्तपणे होतो. त्यामुळे कुठलीही व्याधी होत नाही. ज्याप्रमाणे साचलेल्या पाण्यात अप्रवाहित किंवा साठून राहिलेल्या पाण्यामुळे व्याधी किंवा विकार निर्माण होतो. म्हणून प्राण हा नेहमी पाण्याप्रमाणे प्रवाहित असावा.
जेंव्हा प्राण प्रवाह हा मुक्त किंवा प्रवाहित असतो त्यावेळी शरीर लवचिक असते. जेंव्हा शरीर ताठ किंवा कडक असते त्यावेळी प्राण प्रवाहामध्ये अडथळा असतो व विषद्रव्ये साठलेली असतात. जेंव्हा प्राण प्रवाह सुरळीत होतो (आसनाच्या सरावाने) त्यावेळी ही विषद्रव्ये निघून जातात व शरीर वाकू शकते, ताणू शकते व हालचाल तणावरहित होते व शरीर लवचिक बनते.
sharadyogvigyan.blogspot.com
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग ४
स्नायूंचे शिथलिकारण ही एक सक्रिय क्रिया आहे. तरुणांमध्ये कांही स्नायू कायम आकुंचनाच्या स्थितीत असतात. जसे पाठीचे स्नायू(Erector spinae) जे बसण्याच्या आणि उभे राहण्याच्या स्थितीत राहण्यासाठी मदत करतात.त्यांच्यावर स्वेच्छेने नियंत्रण प्राप्त करता येते. शिथलिकरणासाठी लागणारी ऊर्जा कॅल्शियमचे आयन (ca++) पासून मिळते. जे स्नायूमधील सारकोप्लाजमिक रेटिकुलम (sarcoplasmic Reticulum) मधील ऍक्टिनॉमिओसीन (Actinomyocin) पासून कॅल्शिअम आयन मिळतात. रक्तातील कॅल्शिअम कमी झाल्यास स्नायूमधील ताण वाढतो.
शवासनामध्ये आपण मुद्दाम एका नंतर एक स्नायूंचे शितलीकरण करीत जातो. शितलीकरणाची क्रिया हळूहळू रक्तवाहिन्यातील स्नायू (Smooth muscles) पर्यंत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो.
आसनामध्ये स्नायू जास्त वेळ आकुंचन स्थितीमध्ये राहिल्यामुळे तेथे हैपोक्सिया (Hypoxia कमी ऑक्सिजन असण्याची स्थिती) होतो. असे निदर्शनास आले आहे की, स्नायूपासून मिळालेला स्टेम सेल्स( stem cells) जर हैपोक्सिक वातावरणात ( ६% ऑक्सिजन) राहिला तर ते माँयोसाईट्स मध्ये (Myocytes) रूपांतरित होतात आणि त्यापासून स्नायू बनतो. परंतु तोच स्टेम सेल २०% ऑक्सिजनच्या वातावरणात वाढला तर त्याचा ऍडीपोसाईट्स (Adipocytes) म्हणजेच मेद ( Fat) वृद्धिमध्ये रुपांतरित होते. म्हणून नेहमी आसन कारणाऱ्यात लठ्ठपणा दिसून येत नाही.कारण आसनामुळे स्नायू हायपोक्सिया स्थितीत जातात.
आसन ही शरीराची विशिष्ट स्थिती असून त्याचा प्राण प्रवाह मेंदूच्या ठराविक केंद्रापर्यंत जातो. हाटयोगामध्ये आसनात प्राण प्रवाहाचे शुद्धीकरण करून पुन:रचनेद्वारा शरीरावर नियंत्रण आणले जाते.
आसनाच्या सततच्या सरावाने आसनामध्ये स्थिरता येते. कारण प्राण प्रवाह हा मुक्तपणे होतो. त्यामुळे कुठलीही व्याधी होत नाही. ज्याप्रमाणे साचलेल्या पाण्यात अप्रवाहित किंवा साठून राहिलेल्या पाण्यामुळे व्याधी किंवा विकार निर्माण होतो. म्हणून प्राण हा नेहमी पाण्याप्रमाणे प्रवाहित असावा.
जेंव्हा प्राण प्रवाह हा मुक्त किंवा प्रवाहित असतो त्यावेळी शरीर लवचिक असते. जेंव्हा शरीर ताठ किंवा कडक असते त्यावेळी प्राण प्रवाहामध्ये अडथळा असतो व विषद्रव्ये साठलेली असतात. जेंव्हा प्राण प्रवाह सुरळीत होतो (आसनाच्या सरावाने) त्यावेळी ही विषद्रव्ये निघून जातात व शरीर वाकू शकते, ताणू शकते व हालचाल तणावरहित होते व शरीर लवचिक बनते.
sharadyogvigyan.blogspot.com
No comments:
Post a Comment